शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

लग्न माेडल्यामुळेच महिला डॉक्टरने केली आत्महत्या; चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 18:04 IST

मुलाकडून ३ मार्च रोजी लग्न मोडण्यात आल्याचे डाॅ. नेहाच्या कानावर पडले व तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देचौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखलक्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून होत होता वाद

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम सेजगाव येथील महिला डॉ. नेहा हेमराज पारधी (३०) हिने शुक्रवारी (दि.४) गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. असे असतानाच लग्न मोडल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात लग्न मोडणाऱ्या उपवरासह चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. नेहा पारधी तिरोडा येथील शहीद मिश्रा वॉर्ड येथे भाड्याच्या खोलीत राहून आपले क्लिनिक चालवित होती. पारंपरिक पद्धतीने तिचा सारखपुडा १२ ङिसेंबर २०२१ रोजी बालाघाट येथील मनीष चुन्नीलाल टेंभरे (३०) याच्यासोबत करण्यात आला होता. साखरपुड्यानंतर दोघांचे एकमेकांशी बोलणे सुरू होते. सुरुवातीला एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून ते बाेलायला लागले. मात्र बोलता-बोलता त्या दोघांचे खटके उडू लागले होते. यात मनीषचा भाऊ आणि बहिणीही नाक खुपसत होत्या. त्यामुळे त्या दोघांमधील वाद आणखी वाढत गेले. अशातच मुलाकडून ३ मार्च रोजी लग्न मोडण्यात आल्याचे डाॅ. नेहाच्या कानावर पडले व तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेसंदर्भात डॉ. नेहाची बहीण प्रियंका बेनिराम धारंगे (३७) यांनी तिरोडा पोलिसात तक्रार केली असता आरोपी मनीष चुन्नीलाल टेंभरे (३०), मोहित चुन्नीलाल टेंभरे (२८), राणी चुन्नीलाल टेंभरे (४०), रितू चुन्नीलाल टेंभरे (३३, सर्व रा. बालाघाट) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते करीत आहेत.

खोलीत आढळले सुसाईड नोट

डॉ. नेहा पारधी हिने तिरोडा येथील भाड्याच्या खोलीत आत्महत्या करण्यामागील कारण सुसाईड नोटवर लिहून ठेवले होते. लग्न मोडल्यामुळेच धसका घेऊन आत्महत्या करीत असल्याचे त्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

क्षुल्लक कारणातून वाढला वाद

लग्न जुळल्यावर डॉ. नेहा व मनीष बोलत असताना त्यांच्यात क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून वाद होऊ लागले. लग्नानंतर ६ महिने तिरोडा येथे राहून मी प्रॅक्टिस करेल, असे डॉ. नेहाचे म्हणणे होते. तर मनीष तिला लग्न झाल्याबरोबर बालाघाटला येण्यास सांगत होता. डॉ. नेहा यांना लग्नानंतर केस कापता येणार नाही, केस वाढवावे लागतील असे मनीषच्या बहिणी म्हणत असल्याने यातून त्यांचा वाद झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूdoctorडॉक्टरgondiya-acगोंदिया