शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मुलाच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी वडिलांची वीरूगिरी; प्रशासनाची उडाली धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 17:15 IST

त्यांच्या या आंदोलनाने पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

ठळक मुद्देखातिया येथील घटना

खातिया (गोंदिया) : माझ्या मुलाचा अपघात नसून त्याला मारण्यात आले, असा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी. या मागणीला घेऊन वडिलाने मोबाईल टॉवरवर चढून वीरूगिरी केली. ही घटना गुरुवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील खातिया येथे घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर टॉवरवर चढलेल्या व्यक्तीला खाली उतरविण्यासाठी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.

वासुदेव रामु तावाडे (रा. खातिया) असे मोबाईल टॉवरवर चढून वीरूगिरी करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार: वासुदेव तावाडे हे गुरुवारी सकाळीच कुटुंबीयांना काहीही न सांगता बाहेर निघून गेले. दरम्यान, सकाळी ७ वाजताच्या सुमारास गावातील मोबाईल टॉवरवर एक व्यक्ती बसला असल्याचे गावकऱ्यांना दिसला. याची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी टॉवरजवळ गर्दी केली. दरम्यान, गावकऱ्यांनी या घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना दिली. यानंतर काही वेळातच रावणवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार उद्धव घबाळे हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

वासुदेव तावडे यांच्याजवळ असलेल्या मोबाईलवर फोन लावून त्यांच्या कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधून टॉवरवरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, ते कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हते. सायंकाळी ५ वाजतापर्यंत ते टॉवरवरच बसून होते. पोलीस उपअधीक्षक एम. बी. ताजने यांनी घटनास्थळी पोहोचत वासुदेव यांना खाली उतरण्याची विनंती केली, मात्र ते कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचे वीरूगिरी आंदोलन सुरूच होते. त्यांच्या या आंदोलनाने पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

काय आहे नेमके प्रकरण?

वासुदेव तावाडे यांच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. मात्र, माझ्या मुलाचा अपघात नसून त्याला मारण्यात आल्याचा आरोप तावाडे यांनी केला. मात्र, पोलीस विभागाने याप्रकरणाची योग्य चौकशी केली नसल्याचा आरोप केला. तसेच, याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. याच मागणीला घेऊन गुरुवारी त्यांनी मोबाईल टॉवर चढून वीरूगिरी आंदोलन केल्याची माहिती आहे.

कर्जाची उचलच केली नाही

वासुदेव तावाडे यांच्या नावावर विविध सेवा सहकारी सोसायटीचे १ लाख १४ हजार रुपयांचे कर्ज आहे. मात्र, वासुदेव तावाडे व त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कुठल्याच कर्जाची उचल केलेली नाही. मग हे कर्ज त्यांच्यावर नावावर कसे चढविण्यात आले, असा सवाल त्यांनी केला. तसेच या मुद्दाला घेऊन सुद्धा त्यांनी वीरूगिरी आंदोलन केले. दरम्यान, विविध सेवा सहकारी सोसायटीचे सचिव हत्तीमारे यांनी घटनास्थळी येऊन तावाडे यांचे काही कर्ज माफ झाले, व्याजासह १ लाख १४ हजार ७९४ रुपयांचे कर्ज शिल्लक असल्याचे सांगितले.

समस्या मार्गी लावू खाली उतरा

गोंदियाचे नायब तहसीलदार पालांदूरकर यांनी घटनास्थळी पोहोचून व सबंधित अधिकाऱ्यांना बोलावून वासुदेव तावाडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांना टॉवरवरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, तावाडे यांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि आमदार घटनास्थळी येऊन याबाबत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांचे वीरूगिरी आंदोलन सुरूच होते.

१२ तास चालले आंदोलन

वासुदेव तावाडे यांनी मुलाच्या मृत्यूची चौकशी आणि कर्जाची उचल न करता त्यांच्या नावावर दाखविलेल्या कर्जाच्या प्रश्नाला घेऊन सकाळी ७ वाजतापूर्वीच मोबाईल टॉवरवर चढले. सायंकाळी ६ वाजतापर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच होते. जवळपास १२ तास हे आंदोलन सुरूच होते, त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.

टॅग्स :agitationआंदोलनgondiya-acगोंदिया