शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

उपोषण करा, अथवा मरा..

By admin | Updated: December 20, 2014 01:47 IST

नियमबाह्य पद्धतीने झालेले घरकूल तसेच या प्रकरणात अडकलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बचावासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीची संपूर्ण यंत्रणा एकवटली आहे.

अर्जुनी मोरगाव : नियमबाह्य पद्धतीने झालेले घरकूल तसेच या प्रकरणात अडकलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बचावासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीची संपूर्ण यंत्रणा एकवटली आहे. चुकीच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी राजकीय गंध सुद्धा दरवळताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत उपोषण करा अथवा मरा, मात्र न्याय मिळणार नाही, अशीच काहीशी भूमिका प्रशासनाने स्वीकारल्यामुळे न्याय मागायचा कुणाकडे? असा प्रश्न बरडटोलीचे रवि कुदरुपाका यांच्यासमोर पडला आहे.प्राप्त माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव येथील वार्ड क्र.४ मध्ये घरकुल मंजूर झाले. हे घरकुल वॉर्ड क्र.४ ऐवजी वॉर्ड क्र.३ मधील झुडूपी जंगलाच्या जागेवर बांधकाम करण्यात आले. या घरकुलाची आपण प्रत्यक्ष पाहणी केली असून झालेल्या बांधकामाप्रमाणे रक्कम अदा करण्यास हरकत नाही, असे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिले. यावरून पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने लाभार्थ्याला ५० हजार रुपये अदा केले. या प्रकरणाची रवि कुदरुपाका यांनी जानेवारी २०१४ मध्ये तक्रार केली. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १२ मार्च रोजी केलेल्या तक्रारीवर त्यांनी ३० मार्चपूर्वी असा शेरा लिहिला.पंचायत समितीतर्फे शाखा अभियंता कचरे यांनी या प्रकरणात चौकशी केली. सचिव ग्रामपंचायत अर्जुनी मोरगाव यांनी दिलेला जागेचा दाखला जुन्या गावातील आबादीचा असून लाभार्थ्यांने वेगळ्या ठिकाणेी बरडटोली येथे बांधकाम केले म्हणून सचिवाने बांधकाम केलेल्या जागेची शहनिशा न करता लाभार्थ्याला बांधकाम केल्याचे दोन दाखले दिल्यामुळे प्रथमदर्शनी सचिव हे दोषी आढळून येत असल्याचा चौकशी अहवाल १९ एप्रिल रोजी दिला. खंडविकास अधिकाऱ्यांनी २२ एप्रिल रोजी सचिवांना स्पष्टीकरण विचारले. या स्पष्टीकरणात लाभार्थ्याने ग्रामपंचायतीची दिशाभूल केली. पं.स. कार्यालयाने पोलिसात तक्रार नोंद करण्याचे नमूद आहे. खंडविकास अधिकाऱ्यांनी लाभार्थ्याला २७ नोव्हेंबर रोजी पत्र देऊन रमाई आवास योजनेंतर्गत उचल केलेल्या ५० हजार रुपयांचा भरणा करण्याचे आदेश दिले. याच पत्रात लाभार्थ्याने अंदाजे ५-६ लाख रुपयांचे घरकुल बांधले आहे. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी एवढ्या रकमेचे घरकुल बांधू शकत नाही. यावरून दारिद्र्य रेषेच्या सर्वेक्षणामध्ये चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल करुन नाव दाखल केले आहे असा ठपका ठेवला आहे. हे घरकुल शिक्षक निकाळे यांना भाड्याने दिल्याचेही चौकशीत निष्पन्न झाल्याचे या पत्रात नमूद आहे.गोंदिया जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी १७ सप्टेंबर रोजी खंडविकास अधिकाऱ्यांना एक पत्र दिले. यात सचिव व लाभार्थ्यावर शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करावी व तसा अहवाल देण्याचे आदेश दिले. मात्र खंडविकास अधिकाऱ्यांनी कसलीच कारवाई केली नाही. शेवटी तक्रारकर्ता कुदरुपाका यांनी १ डिसेंबर रोजी पं.स. कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. घरकुल लाभार्थ्यांवर १० डिसेंबरपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच सचिवावर निलंबन व पोलीस तक्रार करण्याविषयीचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, असे लेखी पत्रात आश्वासन दिले. मात्र हे आश्वासन पाळले नाही. म्हणून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. (तालुका प्रतिनिधी)