शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, नफ्याच्या शेतीकडे वळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

शेतकऱ्याला व्यापारी होता आले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरकारने याकडे दुर्लक्ष केले. व्यापारी मोठे झाले, शेतकरी आहे तिथेच आहे. जो जोखीम पत्करतो, तो नफा कमावतो. यावर्षी टरबूज पीक घेणारे श्रीमंत झाले. आम्हाला धानाच्या मानसिकतेतून बाहेर पडून पीकबदल करीत नफ्याच्या शेतीकडे वळावे लागेल. जो शेतकरी अफाट कष्ट करतो, तो हिताच्या मार्गदर्शन मेळाव्यात तासभर बसू शकत नाही, ही शोकांतिका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव :  पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरी राबराब राबतो. मात्र, उत्पन्न आणि खर्चाचे गणित करीत नाही. शेतकऱ्याला व्यापारी होता आले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरकारने याकडे दुर्लक्ष केले. व्यापारी मोठे झाले, शेतकरी आहे तिथेच आहे. जो जोखीम पत्करतो, तो नफा कमावतो. यावर्षी टरबूज पीक घेणारे श्रीमंत झाले. आम्हाला धानाच्या मानसिकतेतून बाहेर पडून पीकबदल करीत नफ्याच्या शेतीकडे वळावे लागेल. जो शेतकरी अफाट कष्ट करतो, तो हिताच्या मार्गदर्शन मेळाव्यात तासभर बसू शकत नाही, ही शोकांतिका आहे. मेळाव्यामधून शेतकरी हिताचे ज्ञान मिळते. ज्ञानाची भूक नसणारा शेतकरी अज्ञानी होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. अधिक उत्पादन घेऊन समृद्ध व्हावे, असे मार्गदर्शन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित शेतकरी मेळावा व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभाच्या  उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रमोद लांजेवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, कृषितज्ज्ञ डॉ. सी. आर. श्यामकुवर, रंगनाथ कटरे, उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, शास्त्रज्ञ अनिल पाटील, नागपूर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य देवानंद पंचभाई, नगराध्यक्ष मंजूषा बारसागडे, उपसभापती सविता कोडापे, उपसभापती होमराज पुस्तोडे, नगरसेविका शीला उईके, कृउबास प्रशासक गिरीश पालीवाल, बन्सीधर लंजे, गटविकास अधिकारी विलास निमजे उपस्थित होते.पुढे बोलताना आ. चंद्रिकापुरे यांनी, माझ्या भागातील शेतकरी संपन्न होण्यासाठी या भागात उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेची गरज आहे. प्रत्येक शेतकरी उत्पादन करतो. मात्र, तो व्यापारी होऊ शकला नाही. इतर लोक मोठे होत असताना तो मोठा होऊ शकला नाही हे दुर्दैव आहे. जे शेतकरी नवीन प्रयोग करतात, ते प्रगतीच्या अश्वमेघावर आरूढ होतात. तंत्रज्ञानाचे नवे तंत्र वापरले पाहिजे. वातावरणानुसार कोणते व कसे पीक घेतले पाहिजे, मालाला कशी बाजारपेठ उपलब्ध होईल, यावर आधारित पिके घेतली पाहिजेत, असे सांगितले. मेळाव्यात डॉ. श्यामकुवर यांनी धान पीक, डॉ. भोसले यांनी पीक बदल व डॉ. खोब्रागडे यांनी भाजीपाला या विषयावर मार्गदर्शन केले. या भागातील मोहफुलावर आधारित वायनरी प्रोजेक्ट उभारण्याची माहिती दिली. कटरे यांनी राष्ट्रीय कृषी बाजारपेठ योजनेबद्दल माहिती दिली. प्रत्येकाने इनाम अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रशासक लोकपाल गहाणे यांनी मांडले. संचालन प्रशासक उद्धव मेहेंदळे यांनी केले. आभार संजय सिंगनजुडे यांनी मानले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती