शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
4
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
5
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
6
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
7
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
8
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
9
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
10
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
11
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
12
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
13
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
14
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
15
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
16
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
17
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
18
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
19
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
20
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

शेतकऱ्यांनो, नफ्याच्या शेतीकडे वळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

शेतकऱ्याला व्यापारी होता आले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरकारने याकडे दुर्लक्ष केले. व्यापारी मोठे झाले, शेतकरी आहे तिथेच आहे. जो जोखीम पत्करतो, तो नफा कमावतो. यावर्षी टरबूज पीक घेणारे श्रीमंत झाले. आम्हाला धानाच्या मानसिकतेतून बाहेर पडून पीकबदल करीत नफ्याच्या शेतीकडे वळावे लागेल. जो शेतकरी अफाट कष्ट करतो, तो हिताच्या मार्गदर्शन मेळाव्यात तासभर बसू शकत नाही, ही शोकांतिका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव :  पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरी राबराब राबतो. मात्र, उत्पन्न आणि खर्चाचे गणित करीत नाही. शेतकऱ्याला व्यापारी होता आले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरकारने याकडे दुर्लक्ष केले. व्यापारी मोठे झाले, शेतकरी आहे तिथेच आहे. जो जोखीम पत्करतो, तो नफा कमावतो. यावर्षी टरबूज पीक घेणारे श्रीमंत झाले. आम्हाला धानाच्या मानसिकतेतून बाहेर पडून पीकबदल करीत नफ्याच्या शेतीकडे वळावे लागेल. जो शेतकरी अफाट कष्ट करतो, तो हिताच्या मार्गदर्शन मेळाव्यात तासभर बसू शकत नाही, ही शोकांतिका आहे. मेळाव्यामधून शेतकरी हिताचे ज्ञान मिळते. ज्ञानाची भूक नसणारा शेतकरी अज्ञानी होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. अधिक उत्पादन घेऊन समृद्ध व्हावे, असे मार्गदर्शन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित शेतकरी मेळावा व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभाच्या  उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रमोद लांजेवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, कृषितज्ज्ञ डॉ. सी. आर. श्यामकुवर, रंगनाथ कटरे, उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, शास्त्रज्ञ अनिल पाटील, नागपूर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य देवानंद पंचभाई, नगराध्यक्ष मंजूषा बारसागडे, उपसभापती सविता कोडापे, उपसभापती होमराज पुस्तोडे, नगरसेविका शीला उईके, कृउबास प्रशासक गिरीश पालीवाल, बन्सीधर लंजे, गटविकास अधिकारी विलास निमजे उपस्थित होते.पुढे बोलताना आ. चंद्रिकापुरे यांनी, माझ्या भागातील शेतकरी संपन्न होण्यासाठी या भागात उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेची गरज आहे. प्रत्येक शेतकरी उत्पादन करतो. मात्र, तो व्यापारी होऊ शकला नाही. इतर लोक मोठे होत असताना तो मोठा होऊ शकला नाही हे दुर्दैव आहे. जे शेतकरी नवीन प्रयोग करतात, ते प्रगतीच्या अश्वमेघावर आरूढ होतात. तंत्रज्ञानाचे नवे तंत्र वापरले पाहिजे. वातावरणानुसार कोणते व कसे पीक घेतले पाहिजे, मालाला कशी बाजारपेठ उपलब्ध होईल, यावर आधारित पिके घेतली पाहिजेत, असे सांगितले. मेळाव्यात डॉ. श्यामकुवर यांनी धान पीक, डॉ. भोसले यांनी पीक बदल व डॉ. खोब्रागडे यांनी भाजीपाला या विषयावर मार्गदर्शन केले. या भागातील मोहफुलावर आधारित वायनरी प्रोजेक्ट उभारण्याची माहिती दिली. कटरे यांनी राष्ट्रीय कृषी बाजारपेठ योजनेबद्दल माहिती दिली. प्रत्येकाने इनाम अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रशासक लोकपाल गहाणे यांनी मांडले. संचालन प्रशासक उद्धव मेहेंदळे यांनी केले. आभार संजय सिंगनजुडे यांनी मानले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती