शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, नफ्याच्या शेतीकडे वळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

शेतकऱ्याला व्यापारी होता आले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरकारने याकडे दुर्लक्ष केले. व्यापारी मोठे झाले, शेतकरी आहे तिथेच आहे. जो जोखीम पत्करतो, तो नफा कमावतो. यावर्षी टरबूज पीक घेणारे श्रीमंत झाले. आम्हाला धानाच्या मानसिकतेतून बाहेर पडून पीकबदल करीत नफ्याच्या शेतीकडे वळावे लागेल. जो शेतकरी अफाट कष्ट करतो, तो हिताच्या मार्गदर्शन मेळाव्यात तासभर बसू शकत नाही, ही शोकांतिका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव :  पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरी राबराब राबतो. मात्र, उत्पन्न आणि खर्चाचे गणित करीत नाही. शेतकऱ्याला व्यापारी होता आले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरकारने याकडे दुर्लक्ष केले. व्यापारी मोठे झाले, शेतकरी आहे तिथेच आहे. जो जोखीम पत्करतो, तो नफा कमावतो. यावर्षी टरबूज पीक घेणारे श्रीमंत झाले. आम्हाला धानाच्या मानसिकतेतून बाहेर पडून पीकबदल करीत नफ्याच्या शेतीकडे वळावे लागेल. जो शेतकरी अफाट कष्ट करतो, तो हिताच्या मार्गदर्शन मेळाव्यात तासभर बसू शकत नाही, ही शोकांतिका आहे. मेळाव्यामधून शेतकरी हिताचे ज्ञान मिळते. ज्ञानाची भूक नसणारा शेतकरी अज्ञानी होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. अधिक उत्पादन घेऊन समृद्ध व्हावे, असे मार्गदर्शन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित शेतकरी मेळावा व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभाच्या  उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रमोद लांजेवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, कृषितज्ज्ञ डॉ. सी. आर. श्यामकुवर, रंगनाथ कटरे, उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, शास्त्रज्ञ अनिल पाटील, नागपूर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य देवानंद पंचभाई, नगराध्यक्ष मंजूषा बारसागडे, उपसभापती सविता कोडापे, उपसभापती होमराज पुस्तोडे, नगरसेविका शीला उईके, कृउबास प्रशासक गिरीश पालीवाल, बन्सीधर लंजे, गटविकास अधिकारी विलास निमजे उपस्थित होते.पुढे बोलताना आ. चंद्रिकापुरे यांनी, माझ्या भागातील शेतकरी संपन्न होण्यासाठी या भागात उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेची गरज आहे. प्रत्येक शेतकरी उत्पादन करतो. मात्र, तो व्यापारी होऊ शकला नाही. इतर लोक मोठे होत असताना तो मोठा होऊ शकला नाही हे दुर्दैव आहे. जे शेतकरी नवीन प्रयोग करतात, ते प्रगतीच्या अश्वमेघावर आरूढ होतात. तंत्रज्ञानाचे नवे तंत्र वापरले पाहिजे. वातावरणानुसार कोणते व कसे पीक घेतले पाहिजे, मालाला कशी बाजारपेठ उपलब्ध होईल, यावर आधारित पिके घेतली पाहिजेत, असे सांगितले. मेळाव्यात डॉ. श्यामकुवर यांनी धान पीक, डॉ. भोसले यांनी पीक बदल व डॉ. खोब्रागडे यांनी भाजीपाला या विषयावर मार्गदर्शन केले. या भागातील मोहफुलावर आधारित वायनरी प्रोजेक्ट उभारण्याची माहिती दिली. कटरे यांनी राष्ट्रीय कृषी बाजारपेठ योजनेबद्दल माहिती दिली. प्रत्येकाने इनाम अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रशासक लोकपाल गहाणे यांनी मांडले. संचालन प्रशासक उद्धव मेहेंदळे यांनी केले. आभार संजय सिंगनजुडे यांनी मानले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती