शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

आई-वडिलांच्या कष्टाचे झाले फलीत, शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 16:56 IST

एमपीएससी परीक्षा केली सर : येरंडी-बाराभाटीवासीयांची मान उंचावली

मुन्नाभाई नंदागवळी

बाराभाटी (गोंदिया) : परिश्रमाला जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड दिल्यास निश्चितच अपेक्षित फळ मिळते. परिस्थितीचा बाहू न करता, आहे त्या परिस्थितीशी दोन हात करून यश कसे पदरात पाडता येईल, हा विचार करणारेसुद्धा बरेच जण आहेत. आपण ठरविलेले ध्येय गाठायचेच हीच खूणगाठ बांधून परिश्रम घेणाऱ्या शेतमजुराच्या मुलाला अखेर यश आले असून, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून पोलिस उपनिरीक्षक होत आई-वडिलांच्या कष्टाचे फलीत केले आहे.

गिरीश प्यारेलाल रंगारी (रा. बाराभाटी, येरंडी, ता. अर्जुनी मोरगाव) असे पोलिस उपनिरीक्षक झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाचे नाव आहे. एमपीएससी परीक्षेचा निकाल चार दिवसांपूर्वीच जाहीर झाला. यात गिरीशने ही परीक्षा उत्तीर्ण केली असून, त्याची पोलिस उपनिरीक्षकपदासाठी निवड झाली आहे. गिरीश एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याची वार्ता गावात पसरताच गावकरी आणि त्याच्या मित्रांनी त्याचे घर गाठून कौतुक केले.

गिरीशचे आई-वडील हे शेतकरी आहेत. थोडीफार शेती आणि मोलमजुरी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गिरीशने सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण बाराभाटी येथील पंचशील विद्यालयात झाले. १२वीपर्यंतचे शिक्षण मिलिंद कला विद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात झाले. त्याने सन २०१७पासून यूपीएससी व २०२१ पासून एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. या कालावधीत त्याने विविध परीक्षा दिल्या. काही परीक्षांचे निकाल अजून यायचे आहेत. तर सहायक कमांडर पदाची मुलाखत २५ जुलै रोजी आहे. मात्र, त्यापूर्वीच त्याचा एमपीएससी परीक्षेचा निकाल आला, त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार, अभ्यासाच्या व्यासंगाची जाणीव ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. यासाठी पीआयटीसी नागपूर या सामाजिक सेवाभावी संस्थेची सुद्धा खूप मदत झाल्याचे गिरीश रंगारीने सांगितले.

मित्रांच्या मार्गदर्शनाची झाली अभ्यासासाठी मदत

नुकताच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेला गोंदिया येथील अमित उंदीरवाडे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा यासाठी दिलेल्या टिप्सची गिरीशला हे यश गाठताना खूप मदत झाली. गजू जिद्देवार, राहुल लांजेवार या मित्रांनी सुद्धा त्याला वेळाेवेळी मदत करीत त्याला प्रोत्साहान देण्याचे काम केल्याचे गिरीशने सांगितले.

अपयशाने खचू नका, अधिक परिश्रमाची तयारी ठेवा

अलीकडे शहरी भागासह ग्रामीण भागातील युवकांचा कल सुद्धा स्पर्धा परीक्षांकडे वाढत असून, यात त्यांना यश सुद्धा येत आहेे; पण काही युवक एक-दोन प्रयत्नात अपयश आल्यानंतर निराश होऊन दुसरा मार्ग निवडीत आहेत. मला सुद्धा आठ-दहा वेळा अपयश आले; पण मी खचलो नाही, माझ्याकडून नेमक्या काय चुका झाल्या, मी कुठे कमी पडलो, याचा शोध घेऊन व चुका सुधारून अधिक जोमाने अभ्यासाला लागलो त्याचीच पावती म्हणजे हे मिळालेले यश होय. त्यामुळे युवकांनो अपयशाने खचून जावू नका, अधिक परिश्रमाची तयारी ठेवा नक्कीच यश मिळेल.

- गिरीश रंगारी

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाPoliceपोलिसgondiya-acगोंदिया