शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंघोषणापत्रांसाठी शेतकऱ्यांची सही ग्राह्य ! महसूल अधिकाऱ्यांच्या सहीची अट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:58 IST

शेतकऱ्यांची पायपीट दूर : महसूल, कृषी विभागाच्या योजनांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शेतकऱ्यांना महसूल प्रक्रियेत अधिक सुलभता मिळावी, यासाठी राज्य शासनाने स्वयंसाक्षांकित प्रती स्वीकृत करण्यासंदर्भात निर्णय काढला आहे. या निर्णयानुसार, निवडक महसूल व कृषी योजनांसाठी आवश्यक असलेल्या स्वयंघोषणापत्रांसाठी महसूल अधिकाऱ्यांची सही घेण्याची अट रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या सहीने अर्ज करता येणार आहे.

शेतकऱ्यांना महसूल कार्यालयांच्या फेऱ्यांपासून मुक्ती मिळणार असून, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक होणार आहे. मात्र, हा शासन निर्णय जवळपास दहा वर्षापासून अस्तित्वात असतानाही अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नाही. त्यामुळे या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. तहसीलदार मोनिका कांबळे यांनी सांगितले की, महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. स्वतःच्या सहीने स्वयंघोषणापत्र सादर करावेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचेल, तसेच अर्ज प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल.

डोकेदुखी झाली कमीकृषी, महसूल विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुर्वी महसूल अधिकाऱ्यांची सही घ्यावी लागत होती. पण आता शेतकऱ्यांना स्वतःच्या सहीने स्वंयघोषणापत्र भरता येणार असल्याने अडचण दूर झाली आहे. 

शेतकऱ्यांना होणारे फायदेमहसूल कार्यालयांच्या फेऱ्यांची गरज नाही, वेळ आणि आर्थिक खर्च वाचणार, शासकीय प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार, योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जलद आणि सोपी होणार.

खालील घोषणापत्रांचा असेल समावेशशासनाच्या निर्णयानुसार, शेतकऱ्यांना महसूल अधिकाऱ्यांची सही न घेता खालील स्वयंघोषणापत्रे स्वतःच्या सहीने थेट संबंधित कार्यालयात जमा करता येतील.

  • चतुःसीमा (नकाशा) संबंधित स्वयंघोषणापत्र
  • अल्पभूधारक असल्याचे स्वयंघोषणापत्र
  • भूमिहीन असल्याचे 3 स्वयंघोषणापत्र
  • ओलितासंबंधित स्वयंघोषणापत्र
  • विहीर नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र

शेतकऱ्यांना दिलासामहसूल विभाग आणि कृषी विभागानेही हा शासन निर्णय पूर्णतः अमलात आणण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना महसूल प्रक्रियेत मोठा दिलासा मिळणार आहे. महसूल आणि कृषी योजनांसाठी अर्ज करताना सोप्या प्रक्रियेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे शेतकऱ्यांची यासाठी होणारी पायपीट आता थांबली आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाfarmingशेती