शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

स्वयंघोषणापत्रांसाठी शेतकऱ्यांची सही ग्राह्य ! महसूल अधिकाऱ्यांच्या सहीची अट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:58 IST

शेतकऱ्यांची पायपीट दूर : महसूल, कृषी विभागाच्या योजनांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शेतकऱ्यांना महसूल प्रक्रियेत अधिक सुलभता मिळावी, यासाठी राज्य शासनाने स्वयंसाक्षांकित प्रती स्वीकृत करण्यासंदर्भात निर्णय काढला आहे. या निर्णयानुसार, निवडक महसूल व कृषी योजनांसाठी आवश्यक असलेल्या स्वयंघोषणापत्रांसाठी महसूल अधिकाऱ्यांची सही घेण्याची अट रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या सहीने अर्ज करता येणार आहे.

शेतकऱ्यांना महसूल कार्यालयांच्या फेऱ्यांपासून मुक्ती मिळणार असून, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक होणार आहे. मात्र, हा शासन निर्णय जवळपास दहा वर्षापासून अस्तित्वात असतानाही अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नाही. त्यामुळे या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. तहसीलदार मोनिका कांबळे यांनी सांगितले की, महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. स्वतःच्या सहीने स्वयंघोषणापत्र सादर करावेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचेल, तसेच अर्ज प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल.

डोकेदुखी झाली कमीकृषी, महसूल विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुर्वी महसूल अधिकाऱ्यांची सही घ्यावी लागत होती. पण आता शेतकऱ्यांना स्वतःच्या सहीने स्वंयघोषणापत्र भरता येणार असल्याने अडचण दूर झाली आहे. 

शेतकऱ्यांना होणारे फायदेमहसूल कार्यालयांच्या फेऱ्यांची गरज नाही, वेळ आणि आर्थिक खर्च वाचणार, शासकीय प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार, योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जलद आणि सोपी होणार.

खालील घोषणापत्रांचा असेल समावेशशासनाच्या निर्णयानुसार, शेतकऱ्यांना महसूल अधिकाऱ्यांची सही न घेता खालील स्वयंघोषणापत्रे स्वतःच्या सहीने थेट संबंधित कार्यालयात जमा करता येतील.

  • चतुःसीमा (नकाशा) संबंधित स्वयंघोषणापत्र
  • अल्पभूधारक असल्याचे स्वयंघोषणापत्र
  • भूमिहीन असल्याचे 3 स्वयंघोषणापत्र
  • ओलितासंबंधित स्वयंघोषणापत्र
  • विहीर नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र

शेतकऱ्यांना दिलासामहसूल विभाग आणि कृषी विभागानेही हा शासन निर्णय पूर्णतः अमलात आणण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना महसूल प्रक्रियेत मोठा दिलासा मिळणार आहे. महसूल आणि कृषी योजनांसाठी अर्ज करताना सोप्या प्रक्रियेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे शेतकऱ्यांची यासाठी होणारी पायपीट आता थांबली आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाfarmingशेती