शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांनो, सेंद्रिय शेतीची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:24 IST

गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करतात.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी काळे : कृषी विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे या उत्पादित धानातून एक प्रकारे विषच खाण्यात येत आहे. भविष्यातील धोके ओळखून व उत्पादित धानाला चांगला भाव मिळावा. आरोग्य सुदृढ राहावे आणि जमिनीची पोत सुधारावी यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.कारंजा येथील तालुका बीज गुणन प्रक्षेत्रातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालयाच्या वतीने प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी सेंद्रिय तांदळापासून तयार केलेला भात खाऊ घालण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधताना काळे बोलत होते. आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.टी. शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे उपस्थित होते. काळे म्हणाले, जिल्ह्यासाठी कृषी आयुक्तालयाने परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये २० गटांना मंजुरी दिली आहे.प्रती गट ५० शेतकºयांना व प्रती शेतकरी १ एकर याप्रमाणे योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येणाºया ३१ गटांना सन २०१७-१८ वर्षाकरिता सेंद्रिय शेती राबविण्याची मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात एकूण ५१ सेंद्रिय गटामध्ये २,३४६ शेतकरी सेंद्रिय शेती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. धान उत्पादक शेतकºयांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.दररोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेला भात हा विषमुक्त कसा राहील, याचे नियोजन करण्यात आले आहे. सेंद्रिय तांदूळ उत्पादनामुळे शेतकºयांना त्याची चांगली किंमत सुध्दा मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पादनसुध्दा वाढण्यास मदत होणार आहे. पक्षांनासुध्दा विषमुक्त अन्न मिळेल.जिल्हा नियोजन समितीतून तरतूदजिल्ह्यात सेंद्रिय शेतीची चळवळ बळकट व्हावी, यासाठी जिल्हा नियोजनसमितीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी निधीची तरतूद करणारा राज्यातील गोंदिया हा एकमेव जिल्हा आहे. सेंद्रिय शेतीमधील उत्पादित सेंद्रिय तांदूळ शिजवून खाऊ घालणे हा कार्यक्रम तालुका व जिल्हास्तरावर राबविण्यात येत आहे. आतापर्यंतच्या कार्यक्र मात जवळपास दीड हजारावर लोकांनी सेंद्रिय तांदळाचा आस्वाद घेतला आहे.२ हजार ३७२ शेतकरी वळले सेंद्रिय शेतीकडेजिल्ह्यातील २ हजार ३७२ शेतकरी ५१ गटामार्फत सेंद्रीय शेतीमधून तांदूळ उत्पादित करीत आहेत. परंतु यावर्षी कमी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जवळपास ११ हजार ६६० क्विंटल सेंद्रिय तांदळाचे उत्पादन होऊ शकते. यामधून जवळपास ७ हजार ११६ क्विंटल तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.