शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

शेतकºयांनो, सेंद्रिय शेतीची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:24 IST

गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करतात.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी काळे : कृषी विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे या उत्पादित धानातून एक प्रकारे विषच खाण्यात येत आहे. भविष्यातील धोके ओळखून व उत्पादित धानाला चांगला भाव मिळावा. आरोग्य सुदृढ राहावे आणि जमिनीची पोत सुधारावी यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.कारंजा येथील तालुका बीज गुणन प्रक्षेत्रातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालयाच्या वतीने प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी सेंद्रिय तांदळापासून तयार केलेला भात खाऊ घालण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधताना काळे बोलत होते. आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.टी. शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे उपस्थित होते. काळे म्हणाले, जिल्ह्यासाठी कृषी आयुक्तालयाने परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये २० गटांना मंजुरी दिली आहे.प्रती गट ५० शेतकºयांना व प्रती शेतकरी १ एकर याप्रमाणे योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येणाºया ३१ गटांना सन २०१७-१८ वर्षाकरिता सेंद्रिय शेती राबविण्याची मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात एकूण ५१ सेंद्रिय गटामध्ये २,३४६ शेतकरी सेंद्रिय शेती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. धान उत्पादक शेतकºयांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.दररोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेला भात हा विषमुक्त कसा राहील, याचे नियोजन करण्यात आले आहे. सेंद्रिय तांदूळ उत्पादनामुळे शेतकºयांना त्याची चांगली किंमत सुध्दा मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पादनसुध्दा वाढण्यास मदत होणार आहे. पक्षांनासुध्दा विषमुक्त अन्न मिळेल.जिल्हा नियोजन समितीतून तरतूदजिल्ह्यात सेंद्रिय शेतीची चळवळ बळकट व्हावी, यासाठी जिल्हा नियोजनसमितीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी निधीची तरतूद करणारा राज्यातील गोंदिया हा एकमेव जिल्हा आहे. सेंद्रिय शेतीमधील उत्पादित सेंद्रिय तांदूळ शिजवून खाऊ घालणे हा कार्यक्रम तालुका व जिल्हास्तरावर राबविण्यात येत आहे. आतापर्यंतच्या कार्यक्र मात जवळपास दीड हजारावर लोकांनी सेंद्रिय तांदळाचा आस्वाद घेतला आहे.२ हजार ३७२ शेतकरी वळले सेंद्रिय शेतीकडेजिल्ह्यातील २ हजार ३७२ शेतकरी ५१ गटामार्फत सेंद्रीय शेतीमधून तांदूळ उत्पादित करीत आहेत. परंतु यावर्षी कमी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जवळपास ११ हजार ६६० क्विंटल सेंद्रिय तांदळाचे उत्पादन होऊ शकते. यामधून जवळपास ७ हजार ११६ क्विंटल तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.