शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

शेतकºयांनो, सेंद्रिय शेतीची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:24 IST

गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करतात.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी काळे : कृषी विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे या उत्पादित धानातून एक प्रकारे विषच खाण्यात येत आहे. भविष्यातील धोके ओळखून व उत्पादित धानाला चांगला भाव मिळावा. आरोग्य सुदृढ राहावे आणि जमिनीची पोत सुधारावी यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.कारंजा येथील तालुका बीज गुणन प्रक्षेत्रातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालयाच्या वतीने प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी सेंद्रिय तांदळापासून तयार केलेला भात खाऊ घालण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधताना काळे बोलत होते. आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.टी. शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे उपस्थित होते. काळे म्हणाले, जिल्ह्यासाठी कृषी आयुक्तालयाने परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये २० गटांना मंजुरी दिली आहे.प्रती गट ५० शेतकºयांना व प्रती शेतकरी १ एकर याप्रमाणे योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येणाºया ३१ गटांना सन २०१७-१८ वर्षाकरिता सेंद्रिय शेती राबविण्याची मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात एकूण ५१ सेंद्रिय गटामध्ये २,३४६ शेतकरी सेंद्रिय शेती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. धान उत्पादक शेतकºयांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.दररोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेला भात हा विषमुक्त कसा राहील, याचे नियोजन करण्यात आले आहे. सेंद्रिय तांदूळ उत्पादनामुळे शेतकºयांना त्याची चांगली किंमत सुध्दा मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पादनसुध्दा वाढण्यास मदत होणार आहे. पक्षांनासुध्दा विषमुक्त अन्न मिळेल.जिल्हा नियोजन समितीतून तरतूदजिल्ह्यात सेंद्रिय शेतीची चळवळ बळकट व्हावी, यासाठी जिल्हा नियोजनसमितीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी निधीची तरतूद करणारा राज्यातील गोंदिया हा एकमेव जिल्हा आहे. सेंद्रिय शेतीमधील उत्पादित सेंद्रिय तांदूळ शिजवून खाऊ घालणे हा कार्यक्रम तालुका व जिल्हास्तरावर राबविण्यात येत आहे. आतापर्यंतच्या कार्यक्र मात जवळपास दीड हजारावर लोकांनी सेंद्रिय तांदळाचा आस्वाद घेतला आहे.२ हजार ३७२ शेतकरी वळले सेंद्रिय शेतीकडेजिल्ह्यातील २ हजार ३७२ शेतकरी ५१ गटामार्फत सेंद्रीय शेतीमधून तांदूळ उत्पादित करीत आहेत. परंतु यावर्षी कमी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जवळपास ११ हजार ६६० क्विंटल सेंद्रिय तांदळाचे उत्पादन होऊ शकते. यामधून जवळपास ७ हजार ११६ क्विंटल तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.