शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

आणेवारी पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: December 20, 2014 01:48 IST

ब्रिटिशांनी पिकाची आणेवारी काढण्यासाठी जी आणेवारी पद्धत अंमलात आणली, तीच पद्धत अजूनही शासनाने सुरु ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

केशोरी : ब्रिटिशांनी पिकाची आणेवारी काढण्यासाठी जी आणेवारी पद्धत अंमलात आणली, तीच पद्धत अजूनही शासनाने सुरु ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. ब्रिटिशकालीन आणेवारी काढण्याची पद्धत त्वरित बदलविण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.स्वातंत्र्यानंतरही इंग्रजांनी घालून दिलेल्या पद्धती व कायदे अंमलात आणणे सुरू असल्याने शासनाप्रति शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. निसर्गाच्या अवकृपेने शेत पिकाची नासाडी झाल्यास आणेवारी निश्चित करताना अद्यापही ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या निकषाचा उपयोग शासन करीत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा योग्य फायदा मिळत नाही.इंग्रजांच्या काळात शेतीचे उत्पन्न अल्प प्रमाणात होत होते. तेव्हा उद्योगांना श्रेष्ठ समजले जात असे. आता तर नवनवीन तंत्रज्ञानामुळे शेतीचा विकास होऊन उत्पन्नात कमालीची वाढ झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची फार मोठ्या प्रमाणात हानी होते. ब्रिटिशकालीन कालखंडात शेती करणाऱ्यांचा निम्नस्तर मानला जात होता. शेती उद्योगाला ब्रिटिशांकडून जाचक कायदे लावण्यात येत होते. त्यानुसारच आजही त्याच कायद्यानुसार शेतीची आणेवारी काढण्याची पद्धत असल्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळत नाही.या भागातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. शेतीचे तंत्र थोडे बिघडले तरी शेतकऱ्यांना वर्षभर त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी नवीन निकषाप्रमाणे आणेवारी काढण्याची पद्धत अंमलात आणावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)