शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, OpenAI चा मोठा दावा...
2
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
4
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
5
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
6
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
7
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
8
प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी, अश्लिल व्हिडिओ प्रकरणी जर्मनीहून परतल्यावर SIT ने केली होती अटक
9
भारताच्या GDP मध्ये वाढ झाली! चौथ्या तिमाहीत विकास दर ७.८ टक्के होता; ८% च्या पुढे गेला
10
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
11
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
12
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
13
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
14
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
15
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
16
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
17
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
18
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
19
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 
20
'All Eyes On Rafah'चे स्टेटस ठेवणाऱ्यांना मराठी अभिनेत्याने सुनावलं, म्हणाला..

शेतकऱ्यांनो, तुम्ही बोगस बियाणे कसे ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 6:28 PM

Gondia : शेतकऱ्यांची सतर्कता महत्त्वाची कृषी विभागही 'अलर्ट मोड'वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगाम एका महिन्यावर येऊन ठेपला असून, यंदा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अनधिकृत, बोगस बियाण्यांची एन्ट्री होऊ नये म्हणून कृषी विभागाची सात भरारी पथकेही सतर्क झाली. शेतकऱ्यांनी अनधिकृत, बोगस बियाणे कसे ओळखावे? याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे.

निवडणूक आटोपल्यानंतर जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाने देखील 'अलर्ट मोड'वर येत खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू केली. शेतकरी देखील शेती मशागतीच्या कामांकडे वळले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामात १ लाख ९३ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले. हा धान उत्पादक भाग असल्याने यंदाही खरीप हंगामात धानाची सर्वाधिक १ लाख ८४ हजार हेक्टरवर लागवड होणार आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने बी बियाणे,  कीटकनाशके यांचे नियोजन केले आहे.

असे ओळखा बोगस बियाणेशासनाचा उत्पादन अथवा विक्री परवाना नसणे, बीज प्रमाणीकरण यंत्रणे- कडून प्रमाणित नसलेले बियाणे, तपासणी केल्याचा रिपोर्ट नसल्यास बियाणे अनधिकृत किंवा बोगस असल्याचे मानले जाते. बोगस बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली याचा उल्लेख नसतो. पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण नसते.

काळजी काय घ्यावी?अधिकृत परवानाधारक कृषी विक्रेत्यांकडून बियाणे, खते खरेदी करावी. खरेदीवेळी न चुकता पक्के बिल घ्यावे. देयकात पीक, वाण प्लॉट क्रमांक, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे नाव संपूर्ण नमूद असावे. कृषी केंद्रधारकाने पक्के बिल संपूर्ण विवरणासह न दिल्यास नजीकच्या कृषी विभागाकडे संपर्क साधावा.

नियंत्रण कक्षाची स्थापनाजिल्ह्यात खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कीटकनाशकाचा पुरवठा व निविष्ठांचा काळाबाजारावर प्रतिबंधासाठी तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) मध्ये तक्रार दाखल करावी. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व समस्यांचे निराकरण नियंत्रण कक्षात करण्यात येणार आहे. बियाणे, खते व कीटकनाशकांची खरेदी करतेवेळेस शेतकऱ्यांना विविध अडचणी येतात. या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनो येथे नोंदवा तक्रारनियंत्रण कक्षात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किमत, साठेबाजी व लिकिंगबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. अतिरिक्त दराने खताची विक्री होत असल्यास बियाणे, खते खरेदीचे बिल मिळत नसल्यास शेतकऱ्यांनी आपल्या नावासह व संपूर्ण पत्ता, तक्रारीचे स्वरूप यांची माहिती देऊन निवारण कक्षात तक्रार नोंदवावी.

खरीप हंगामासाठी खते, बियाणे यांची पुरेशा प्रमाणात मागणी नोंदविण्यात आली. उर्वरित लागणारे बियाणे शेतकऱ्यांकडे घरगुती पद्धतीने जतन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात अनधिकृत बियाण्यांचा शिरकाव होणार नाही याची दक्षता म्हणून आठ भरारी पथके सक्रिय ठेवण्यात आली. - हिंदूराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी