शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

विलिनीकरणात अडकला शेतकऱ्यांचा सन्मान निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:33 IST

नवेगावबांध : देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये मागील दोन वर्षांपूर्वी विलिनीकरण झाले. त्यामुळे खातेदारांचे खाते नंबर बदलले आहेत. परिणामी ...

नवेगावबांध : देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये मागील दोन वर्षांपूर्वी विलिनीकरण झाले. त्यामुळे खातेदारांचे खाते नंबर बदलले आहेत. परिणामी गेल्या आठ - नऊ महिन्यांपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. लाभार्थी खातेदारांचा नवीन खाते नंबर लिंक करण्याच्या कामात अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालयातून विलंब होत आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून, बँका आणि तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची पायपीट सुरु आहे.

नोव्हेंबर २०२०मध्ये पूर्वाश्रमीच्या देना बँकेच्या खातेदारांचे खाते नंबर व आयएफएससी कोडमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे खाते नंबर चुकीचा आहे, असे मेसेज येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन खाते लिंक करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दिला आहे. परंतु नवीन खाते लिंक करण्याचे काम सध्या संथ गतीने सुरू असल्याने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना गेल्या वर्षीपासून तीन हप्त्यात मिळणारा दोन हजार रुपये शेतकरी सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात झाला नाही. परिणामी अनेक वृद्ध शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज भरून किंवा लेखी अर्जाद्वारे आपले नवीन खाते नंबर व बदललेला आयएफएससी कोड यात बदल करण्यात यावा, नवीन खाते नंबर जोडण्यात यावे, यासाठी गेल्या आठ - नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, अर्जुनी मोरगाव येथे अर्ज केले आहे. परंतु तहसील कार्यालयाच्या दप्तर दिरंगाईमुळे अनेक वृद्ध शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यापासून वंचित आहेत.

.............

हे आमचे काम नाही

हे आमचे नाही. परंतु आता करावे लागत आहे. कार्यालयाची कामेही करावी लागतात. त्यामुळे या कामाला वेळ लागत आहे. आम्ही नवीन कॉम्प्युटर ऑपरेटर या ठिकाणी कामाला लावू शकत नाही, असे उत्तर संबंधित लिपिकाकडून शेतकऱ्यांना दिले जाते, अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे.

...........

आम्ही कुठवर वाट पाहायची?

निधीअभावी वृद्ध लाभार्थ्यांची आर्थिक अडचण होत आहे. सध्या धान पिकांवर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. त्यात खते, औषधी यावर भरपूर खर्च होत आहे. परंतु शेतकरी सन्मान निधी जमा न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाने शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थ्यांचे नवीन खाती लिंक करण्याची मागणी केली आहे.