शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
5
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
6
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
7
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
8
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
10
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
11
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
12
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
13
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
14
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
15
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
16
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
17
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
18
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
19
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
20
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:40 AM

मागील वर्षी कीडरोगामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान शासनाने कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे पाठविला होता.

ठळक मुद्देसाडेपाच हजार लाभार्थी प्रतीक्षेत : खाते क्रमांक चुकीचे

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मागील वर्षी कीडरोगामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान शासनाने कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे पाठविला होता. शासनाने कीडरोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली. मात्र सहा महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांची पायपीट सुरू आहे.तालुक्यात मागील वर्षी झालेल्या गारपीट व मावा तुडतुडा या कीडरोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शासनाने प्रत्येक तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचा अहवाल पाठविण्याचे निर्देश तहसील कार्यालयाला दिले. गोरेगाव तहसील कार्यालयाने याचा अहवाल शासनाकडे पाठविला. मात्र याला सहा महिन्याचा कालावधी लोटूनही ३ हजार ८८० दुष्काळग्रस्त व १६३५ गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तालुक्यात एकूण १९ हजार ८५२ दुष्काळग्रस्त लाभार्थी आहेत. यासाठी तहसील कार्यालयाला ७२ लाख १६ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी १५ हजार ९७२ लाभार्थ्यांना सहा कोटी ३८ लाख ९९ हजार ४८४ रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वळता करण्यात आला. मात्र अद्यापही ३ हजार ८८० लाभार्थी शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत असून त्यांना १ कोटी ३३ लाख १६ हजार ५१६ रुपये मिळणे बाकी आहे. तर गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी १ कोटी ८३ लाख १६ हजार ८८२ निधी प्राप्त झाला. यातील चार हजार ३३४ लाभार्थ्यांपैकी केवळ २ हजार ६९९ लाभार्थ्यांना १ कोटी १३ लाख ९१ हजार ६०४ वाटप करण्यात आल. तर १६३५ लाभार्थ्यांना ६ कोटी ९२ लाख ५ हजार २७८ एवढ्या रक्कमेचे वाटप होणे बाकी आहे. तर मावा तुळतुडा या कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गोरेगाव तहसील कार्यालयाला २४ व २५ मे रोजी ३ कोटी ६३ लाख ६५ हजार ८५६ रुपये प्राप्त झाले.नुकसान भरपाईसाठी १५ हजार ७४० शेतकरी पात्र ठरले होते. त्यातील १२ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित ३ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांची तहसील कार्यालय आणि बँकामध्ये पायपीट सुरू आहे.शेतकरी लाभार्थ्यांनी चुकीचे बँक खाते क्रमांक व काही लाभार्थ्यांच्या खात्यात त्रुट्या असल्यामुळे पैसे जमा करण्यास अडचण होत आहे. लवकरच त्रृट्या दूर करुन लाभ देण्यात येईल.-अरविंद हिंगे,तहसीलदार, गोरेगाव

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती