शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित व्यक्तींना तसेच पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सुधारित निर्णय घेतला.ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही.

ठळक मुद्देधानपिक नुकसानीच्या सर्वेक्षणानंतरही मदत नाही : शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मधील अतिवृष्टी व पूरबाधित व्यक्तींन आणि पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांना ६९ कोटी रुपये मंजूर केले. मात्र गोंदिया जिल्ह्यात आॅगस्ट व सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या धानपिक नुकसानीचे सर्वेक्षण होऊनही मदत देण्यात आली नाही.या प्रकारामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित व्यक्तींना तसेच पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सुधारित निर्णय घेतला.ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही. परंतु त्यांच्या पिकांची अतिवृष्टी व पुरामुळे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना कमाल हेक्टरच्या मर्यादेत शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीनुसार अनुज्ञेय असलेल्या मदत दराच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून देण्यास मान्यता दिली आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी मागणी केलेला ६८ कोटी ९४ लक्ष २७ हजार रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.पूर्व विदर्भाच्या नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसानीचा लाभ मिळणार आहे. मात्र ऑगस्ट व सप्टेंबर २०१९ या महिन्यात गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर हानीमुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३ ते ६ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली.संबंधित विभागाद्वारे नुकसानीचे सर्वेक्षण होऊन अहवाल सादर करण्यात आला. यात जानवा, येगाव, खामखुरा, इसापूर, इटखेडा, डोंगरगाव, महागाव, सिरोली, नवनीतपूर, काटगाव, वडेगावबंध्या, बोळदे, करडगाव, माहूरकुडा, मालकनपुर, निलज, रामघाट, तुमडीमेंढा, गवरा भरनोली, केशोरी, परसोडी रयत, सिलेझरी अशा २३ गावातील ४५२ शेतकºयांच्या ६६.४८ हे आर शेतातील ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. तर या सर्व गावातील १०५.२९ हे.आर. शेत जमिनीतील धान पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. तसा अहवाल तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने सादर करण्यात आला. आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोंदिया तालुक्यात सुमारे १२०० हे.आर. शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे.त्यासाठी १.७५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.एवढे असतानाही शासनाने १७ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयात जी मदतीची आकडेवारी दर्शविण्यात आली आहे. त्यात गोंदिया जिल्ह्याला वगळण्यात आले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कालावधीत जिल्ह्यातील इतर तालुक्यात नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हानिहाय मिळालेल्या निधीचा गोषवारानागपूर      ९२०९८०० कोटीवर्धा           ३६७२०००भंडारा       ८३६५४०००गोंदिया     ०००००००चंद्रपूर        २०८१७००००गडचिरोली   ३०१८३३०००