शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित व्यक्तींना तसेच पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सुधारित निर्णय घेतला.ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही.

ठळक मुद्देधानपिक नुकसानीच्या सर्वेक्षणानंतरही मदत नाही : शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मधील अतिवृष्टी व पूरबाधित व्यक्तींन आणि पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांना ६९ कोटी रुपये मंजूर केले. मात्र गोंदिया जिल्ह्यात आॅगस्ट व सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या धानपिक नुकसानीचे सर्वेक्षण होऊनही मदत देण्यात आली नाही.या प्रकारामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित व्यक्तींना तसेच पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सुधारित निर्णय घेतला.ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही. परंतु त्यांच्या पिकांची अतिवृष्टी व पुरामुळे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना कमाल हेक्टरच्या मर्यादेत शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीनुसार अनुज्ञेय असलेल्या मदत दराच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून देण्यास मान्यता दिली आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी मागणी केलेला ६८ कोटी ९४ लक्ष २७ हजार रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.पूर्व विदर्भाच्या नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसानीचा लाभ मिळणार आहे. मात्र ऑगस्ट व सप्टेंबर २०१९ या महिन्यात गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर हानीमुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३ ते ६ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली.संबंधित विभागाद्वारे नुकसानीचे सर्वेक्षण होऊन अहवाल सादर करण्यात आला. यात जानवा, येगाव, खामखुरा, इसापूर, इटखेडा, डोंगरगाव, महागाव, सिरोली, नवनीतपूर, काटगाव, वडेगावबंध्या, बोळदे, करडगाव, माहूरकुडा, मालकनपुर, निलज, रामघाट, तुमडीमेंढा, गवरा भरनोली, केशोरी, परसोडी रयत, सिलेझरी अशा २३ गावातील ४५२ शेतकºयांच्या ६६.४८ हे आर शेतातील ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. तर या सर्व गावातील १०५.२९ हे.आर. शेत जमिनीतील धान पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. तसा अहवाल तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने सादर करण्यात आला. आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोंदिया तालुक्यात सुमारे १२०० हे.आर. शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे.त्यासाठी १.७५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.एवढे असतानाही शासनाने १७ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयात जी मदतीची आकडेवारी दर्शविण्यात आली आहे. त्यात गोंदिया जिल्ह्याला वगळण्यात आले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कालावधीत जिल्ह्यातील इतर तालुक्यात नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हानिहाय मिळालेल्या निधीचा गोषवारानागपूर      ९२०९८०० कोटीवर्धा           ३६७२०००भंडारा       ८३६५४०००गोंदिया     ०००००००चंद्रपूर        २०८१७००००गडचिरोली   ३०१८३३०००