शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

पावसाच्या तांडवाने शेतकरी रडकुळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST

गेल्या ८ दिवसांपासून परिसरात दरदिवशी वादळ वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत असून परतीच्या पावसाने तांडव घातले आहे. हाताशी येणारे हलक्या जातीचे धानपीक मातीमोल होत आहेत. भारी (जड) जातीचे धान येणाऱ्या वाऱ्यामुळे झोपून गेले आहेत. त्यामुळे भारी जातीचे धान फोल होण्याची भिती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी व मळणी करुन वाळत घातले असता धानावर पाणी जावून ओलेचिंब झाले.

ठळक मुद्देधान पिकाचे नुकसान। भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : खरीप हंगामातील परिपक्व झालेल्या हलक्या धान पीकाची कापणी व मळणी या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र परतीच्या पावसाने घातलेल्या रोजच्या तांडवामुळे हलक्या धान पीकाचे अतोनात नुकसान केले आहे. हातामध्ये येणारे धान पीकाचे नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत असल्याचे दिसून येत आहे. पावसाने होणाऱ्या धान पीक नुकसानीचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.गेल्या ८ दिवसांपासून परिसरात दरदिवशी वादळ वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत असून परतीच्या पावसाने तांडव घातले आहे. हाताशी येणारे हलक्या जातीचे धानपीक मातीमोल होत आहेत. भारी (जड) जातीचे धान येणाऱ्या वाऱ्यामुळे झोपून गेले आहेत. त्यामुळे भारी जातीचे धान फोल होण्याची भिती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी व मळणी करुन वाळत घातले असता धानावर पाणी जावून ओलेचिंब झाले. त्यामुळे त्या धानावर काळीबुरशीजन्य परिस्थिती निर्माण होवून धानातून वास येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.हलक्या जातीचे धान पीक विक्रीला दिले असते. परंतु अजूनही आदिवासी विकास महामंडळाचे धान्य खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. खाजगी व्यापाऱ्यांना विकल्यास योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.यापूर्वी वेळोवेळी बदलणाऱ्या निसर्गरम्य लहरीपणामुळे धानपीकावर तुडतुड, करपा, खोडकिडा या रोगांचा प्रार्दुभाव होवून धानपीक नष्ट झाले. पावसाने तांडव घालून या परिसरातील शेतकऱ्यांना रडकुळीस आणले आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी पुरता घाबरला असून पावसाने केलेल्या नुकसानीचे कृषी विभागाने सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती