शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जिल्ह्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांवर उपासमारीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील ५७६ ग्रामपंचायतींमधील ५७६ संगणक परिचालक सध्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यामातून सन २०११ पासून संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) व सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत’ प्रकल्पात ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक म्हणून संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम नियमितपणे करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालक मागील ४ महिन्यांपासून पगाराविना काम करीत आहेत. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. यामुळे या संगणक परिचालकांत रोष व्याप्त असून लवकरच पगार न मिळाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा संगणक परिचालक संघटनेने दिला आहे. जिल्ह्यातील ५७६ ग्रामपंचायतींमधील ५७६ संगणक परिचालक सध्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यामातून सन २०११ पासून संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) व सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत’ प्रकल्पात ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक म्हणून संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम नियमितपणे करीत आहेत. या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, ही यंत्रणा राबवण्यासाठी एकाच कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून या कंपनीकडून परिचालकांचे मानधन वेळेवर देण्यात आलेले नाही. शिवाय, ग्रामपंचायतींना लागणारी स्टेशनरी पुरविण्याचे कंत्राट देखील या कंपनीला देण्यात आले आहे. परिणामी आता पूर्ण परिस्थिती पाहता संबंधित कंपनी तुपाशी तर संगणक परिचालक उपाशी अशीच सध्याची अवस्था आहे. संगणक परिचालक ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी बांधकाम परवान्यासह २९ प्रकारचे परवाने, जमा-खर्चाची नोंद, ग्रामसभा, मासिक सभेचे ऑनलाईन कामकाज, जनगणना, घरकूल सर्व्हे, प्रधानमंत्री पीकविमा योजना इत्यादी कामे करीत आहेत. 

ऑक्टोबरपासून पगाराविना - संगणक परिचालकांना ऑक्टोबर महिन्यापासून पगार मिळालेला नाही. यावर संगणक परिचालक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न नेला होता. यावर त्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते; मात्र काहीच झालेले नाही. वर्षाकाठी संबंधित कंपनीला १ वर्षाची सर्व ग्रामपंचायतीकडून ॲडव्हान्स रक्कम दिली जाते. तरीही आम्हाला पगार मिळालेला नसल्याने घर कसे चालवायचे अशा प्रश्न संगणक परिचालक करीत आहेत. अशात संगणक परिचालक संघटनेने गटविकास अधिकारी बोरकर व तालुका व्यवस्थापक महेश शेंडे यांना निवेदन दिले असून ३-४ दिवसांत पगार न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र साखरे, तालुकाध्यक्ष रोहित पांडे व सर्व संगणक परिचालकांनी दिला आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत