शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

जिल्ह्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांवर उपासमारीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील ५७६ ग्रामपंचायतींमधील ५७६ संगणक परिचालक सध्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यामातून सन २०११ पासून संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) व सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत’ प्रकल्पात ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक म्हणून संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम नियमितपणे करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालक मागील ४ महिन्यांपासून पगाराविना काम करीत आहेत. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. यामुळे या संगणक परिचालकांत रोष व्याप्त असून लवकरच पगार न मिळाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा संगणक परिचालक संघटनेने दिला आहे. जिल्ह्यातील ५७६ ग्रामपंचायतींमधील ५७६ संगणक परिचालक सध्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यामातून सन २०११ पासून संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) व सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत’ प्रकल्पात ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक म्हणून संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम नियमितपणे करीत आहेत. या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, ही यंत्रणा राबवण्यासाठी एकाच कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून या कंपनीकडून परिचालकांचे मानधन वेळेवर देण्यात आलेले नाही. शिवाय, ग्रामपंचायतींना लागणारी स्टेशनरी पुरविण्याचे कंत्राट देखील या कंपनीला देण्यात आले आहे. परिणामी आता पूर्ण परिस्थिती पाहता संबंधित कंपनी तुपाशी तर संगणक परिचालक उपाशी अशीच सध्याची अवस्था आहे. संगणक परिचालक ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी बांधकाम परवान्यासह २९ प्रकारचे परवाने, जमा-खर्चाची नोंद, ग्रामसभा, मासिक सभेचे ऑनलाईन कामकाज, जनगणना, घरकूल सर्व्हे, प्रधानमंत्री पीकविमा योजना इत्यादी कामे करीत आहेत. 

ऑक्टोबरपासून पगाराविना - संगणक परिचालकांना ऑक्टोबर महिन्यापासून पगार मिळालेला नाही. यावर संगणक परिचालक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न नेला होता. यावर त्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते; मात्र काहीच झालेले नाही. वर्षाकाठी संबंधित कंपनीला १ वर्षाची सर्व ग्रामपंचायतीकडून ॲडव्हान्स रक्कम दिली जाते. तरीही आम्हाला पगार मिळालेला नसल्याने घर कसे चालवायचे अशा प्रश्न संगणक परिचालक करीत आहेत. अशात संगणक परिचालक संघटनेने गटविकास अधिकारी बोरकर व तालुका व्यवस्थापक महेश शेंडे यांना निवेदन दिले असून ३-४ दिवसांत पगार न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र साखरे, तालुकाध्यक्ष रोहित पांडे व सर्व संगणक परिचालकांनी दिला आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत