शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

दारिद्र्याचे निर्मूलन करण्यात अपयश

By admin | Updated: May 11, 2015 00:34 IST

सरकार दारिद्रय निर्मूलनासाठी अनेक योजना राबवून नाना तऱ्हेचे प्रयत्न करीत असला तरी महाराष्ट्रात दारिद्रयाचे ...

ग्रामीण भागातील चित्र : ४० टक्के लोक योजनांपासून वंचितगोंदिया : सरकार दारिद्रय निर्मूलनासाठी अनेक योजना राबवून नाना तऱ्हेचे प्रयत्न करीत असला तरी महाराष्ट्रात दारिद्रयाचे निर्मूलन करण्यात शासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे अजूनही ४० टक्के लोक दारिद्रय रेषेखालील जीवन जगत असल्याचे विदारक चित्र आहे. या ४० टक्के लोकांना शासकीय योजनांचा पुरेपूर फायदा मिळत नसल्याने दारिद्रय निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा फज्जा उडल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.महाराष्ट्र शासन राज्याचा विकास झाला असल्याचा दावा करता असला तरी देशात सर्वाधिक दारिद्रय महाराष्ट्रात आहे. देशात महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न अधिक असूनही ग्रामीण भागात दारिद्रयाचे प्रमाण जास्त आहे. वाढत्या महागाईचा विपरीत परिणाम गरीब, कष्टकरी, शेतकरी, उपेक्षित दलित मध्यम वर्गावर होत आहे. उपभोग्य वस्तुंच्या किंमती सातत्याने वाढत राहिल्याने जीवनावश्यक गरजा भागविणे नागरिकांना कठीण झाले आहे. महाराष्ट्र शासन विकासाच्या बाता करीत असले तरी विकासाची फळे समाजातील उच्चभ्रू समाजाला चाखावयास मिळत आहेत. ९० टक्के उपन्न १० टक्के लोकांमध्ये व १० टक्के उत्पन्न ९० टक्के लोकांमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे.स्वातंत्र्योत्तर काळात नियोजनाद्वारे विकास होत असताना दारिद्रये निर्मूलनाच्या अनेक योजना राबवत असताना देखील दारिद्रय रेषेखालील राहणाऱ्यांची संख्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक होती. अन्न वस्त्र, निवारा अशा मुलभूत गरजा भागविण्याची क्षमता ज्या व्यक्तीकडे नाही. त्या व्यक्ती दारिद्रय रेषेखाली आहेत, असे समजले जाते. शासनाकडून या योजनाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत असली तरी जे शासनाचे प्रतिनिधी आहेत. ते लाभार्थ्यांपर्यंत पोहचवत नसल्याने दारिद्रय रेषेखाली जगणाऱ्या लोकांच्या संख्येत फार मोठी वाढ झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)दारिद्र्यावर मात करण्यासाठी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, किमान गरजा कार्यक्रम, विशेष पशुधन कार्यक्रम, अंत्योदय कार्यक्रम, काम करणाऱ्यांना अन्नधान्य वाटप कार्यक्रम, राष्ट्रीय रोजगार कार्यक्रम, भूमीहिन कार्यक्रम, रोजगार हमी कार्यक्रम, स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकाचे प्रशिक्षण इत्यादी अनेक योजना दारिद्रय निर्मूलनासाठी राबविल्या गेल्या.