शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

उष्माघातासाठी प्रत्येक पीएचसीत ‘कोल्ड रूम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 20:47 IST

उन्हाळा आता आपल्या रंगात येत आहे. रविराज आग ओकू लागल्याने तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून उष्माघाताचा धोका वाढत चालला आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात कोल्ड रूम (वातानुकुलीत कक्ष) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देमागील वर्षी उष्माघाताचे १६ रूग्ण : केटीएसमध्ये अतिदक्षता कक्षाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळा आता आपल्या रंगात येत आहे. रविराज आग ओकू लागल्याने तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून उष्माघाताचा धोका वाढत चालला आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात कोल्ड रूम (वातानुकुलीत कक्ष) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रकारे, येथील वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहे. सहा बेडची व्यवस्था असलेले हे कक्ष आवश्यक असलेल्या सर्व सुविधांनी सज्ज आहे.उन्हाळ््यात उष्माघाताची समस्या नेहमीच गंभीर रूप धारण करते. उष्माघाताने जीव जाण्याचा धोका नसला तरिही वेळीच उपचार व आवश्यकती काळजी न घेतल्यास उष्माघाताने जीवही जातो. हे प्रकार जिल्ह्यातही घडतात. जिल्ह्याचे तापमान उन्हाळ््यात ४७ डिग्री पर्यंत गेल्याचीही नोंद आहे. त्यामुळे उन्हाळा म्हटला की, गोंदिया सर्वाधीक तापमान असलेल्या शहरांच्या यादीत हमखास दरवर्षी दिसून येतो.यंदाही आतापासून उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. सुर्यदेव आता कोपू लागल्याने तापमानात झपाट्याने वाढ होत असून घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. आताच्या स्थितीत जिल्ह्याचे तापमान ४२ अंशाच्या वर गेले असून उन्हाची तिरीप बघताच घाम फुटू लागतो. वाढत्या उन्हामुळे जीव कासावीस होऊ लागला आहे. वाढत्या तापमानाच्या या पाशातून मुक्तता शक्य नाही व येथेच येवून उष्माघाताची शक्यता बळावते. यामुळेच आरोग्य विभागाने वाढत्या उन्हाळ््याचे चित्र बघता उष्माघाताच्या या समस्येवर तोडगा म्हणून पाऊल उचलले आहेत.यांतर्गत, येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात विशेष उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहे. सहा बेड असलेल्या या कक्षात औषध, कक्ष थंड ठेवण्यासाठी कुलर व डॉक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज पडल्यास अतिदक्षता विभागही उपलब्ध करवून देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी दिली.मागील वर्षी ४७ डिग्रीजिल्ह्यातील तापमान उन्हाळ्यात ४७ डिग्रीपर्यंत जाते. मात्र आश्चर्याची बाब अशी की, आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार १९ मे २०१५ रोजी गोंदियाचे तापमान ४८ डिग्री एवढे होते. यातून देशातील अतिउष्ण शहरांच्या यादीत गोंदियाची नोंदणी झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले हे तापमान बघता आतापासूनच जास्तीतजास्त वृक्षारोपण व पाण्याचा अपव्यय टाळण्यास सुरूवात करणे हितावह ठरणार आहे. मागील वर्षीचे सर्वाधीक तापमान ४७ डिग्री होते.डॉक्टर्सना दिले प्रशिक्षणउष्माघातावर काय करावे व काय नाही याबाबत रूग्णालयातील डॉक्टर्सना प्रशिक्षण देण्यात आले आहे. रूग्णालयात उष्माघाताचे रूग्ण आल्यास डॉक्टर्सही सज्ज असावे या दृष्टीकोणातून आरोग्य विभागाने हे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे उष्माघाताच्या या समस्येला घेऊन आरोग्य विभाग आतापासूनच चौकस असून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.मागील वर्षी १६ जणांना उष्माघातउष्माघाताची लक्षणे असलेल्या व्यक्तीला अस्वस्थपणा व थकवा जाणवतो. शरीर तापू लागते, अशक्तपणा व मळमळ येऊन अंग व डोकेदुखी होते. अशा वेळेस थंड जागेत व थंड वातावरणात रहावे, लहान मुले-मुली, वृद्ध व्यक्ती व गरोदर माता यांची विशेष काळजी घ्यावी. मागील वर्षी जिल्ह्यात १६ जणांना उष्माघात झाल्याचे आढळले आहे.तहान लागलेली असो किंवा नाही भरपूर थंड पाणी प्यावे. सैल व फिकट रंगाचे कपडे घालवे, कापडाने डोके झाकावे, थंड पाण्याने डोक्यावरून आंघोळ करावी. भर दुपारी उन्हात काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी.-डॉ. भुमेश्वर पटलेजिल्हा साथरोग अधिकारी, जि.प. गोंदिया.

टॅग्स :Healthआरोग्यweatherहवामान