शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी धानाचे हेक्टरी उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:10 IST

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजावर विश्वास ठेवत शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खरिपाची तयारी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकºयांनी केलेली सर्व मेहनत वाया गेली.

ठळक मुद्दे६० टक्के पिकांचे नुकसान : उन्हाळी हंगाम धोक्यात

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजावर विश्वास ठेवत शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खरिपाची तयारी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकºयांनी केलेली सर्व मेहनत वाया गेली. पावसाअभावी ६० पिकांचे नुकसान झाले असून धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात १२ ते १५ क्ंिवटंलने घट होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकºयांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याचे संकट ओढवले आहे.गोंदिया जिल्ह्यातील धान हे मुख्य पीक असून खरिपात १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. पण, यंदा पावसाअभावी केवळ १ लाख ५२ हजार हेक्टरवर धानाची लागवड पूर्ण झाली. यापैकी जवळपास ३० ते ४० टक्के शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. तर ६० टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. जिल्ह्यात सरासरी १३२७ मि.मि.पाऊस पडतो. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ७५० मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.यंदा सरासरीच्या केवळ ४० ते ५० टक्के पाऊस झाल्याने ६० टक्के पिकांचे नुकसान झाले. कमी पावसामुळे धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात १२ ते १५ क्विंटलने घट होण्याची शक्यता आहे.दरवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतर प्रती हेक्टरी २४ क्विंटल धानाचे उत्पादन घेतले जात होते. पण, यंदा पावसाअभावी बिकट चित्र आहे. विशेष म्हणजे कोरडवाहू क्षेत्रात धानाचे प्रती हेक्टरी उत्पादन पाच ते सहा क्विंटल होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकºयांनी केलेला लागवड खर्च देखील भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. एकंदरीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी चिंतातूर आहे. तर काही शेतकरी सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या मदतीने पिके वाचविण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र आहे.७० हजार हेक्टरमधील पिके संकटातहवामान विभागाने सुध्दा आता पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केला. तर सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे सिंचनाची सोय नसलेल्या शेतकºयांची ७० हजार हेक्टरमधील पिके संकटात आल्याचे चित्र आहे.६० टक्के पिकांचे नुकसानपावसाअभावी यंदा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सुरूवातीला कृषी विभागाने पिकांचे नुकसान झाले नसल्याचे सांगत लागवड क्षेत्र सुध्दा अधिक दाखविले होते. मात्र लोकमतने याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील ६० पिकांचे नुकसान झाल्याची कबुली दिली असून तसा अहवाल सुध्दा शासनाकडे पाठविल्याची माहिती आहे.१९८५ नंतर प्रथमच स्थिती बिकटयंदा पावसाने पाठ फिरविल्याने सर्वच पिके धोक्यात आली आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा ३० ते ३५ टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे यंदा जिल्ह्यातील एकाही सिंचन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले नाही. १९८५ नंतर प्रथमच जिल्ह्यात अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.रब्बी हंगाम धोक्यातखरीप हंगामानंतर जिल्ह्यात रब्बीची पिकांची लागवड केली जाते. रब्बी हंगामात यंदा ३६ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाने सुरूवातीला वर्तविला होता. मात्र यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पिकांची लागवड होण्याची शक्यता आता कमी आहे.शेतकºयांचे लक्ष घोषणेकडेजिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीला घेवून सर्वच राजकीय पक्षांकडून जिल्हा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. तर प्रशासनातर्फे सप्टेंबरनंतर यावर निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सरकार काय निर्णय घेते, याकडे शेतकरी बांधवाचे लक्ष लागले आहे.