शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

पावसाअभावी धानाचे हेक्टरी उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:10 IST

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजावर विश्वास ठेवत शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खरिपाची तयारी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकºयांनी केलेली सर्व मेहनत वाया गेली.

ठळक मुद्दे६० टक्के पिकांचे नुकसान : उन्हाळी हंगाम धोक्यात

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजावर विश्वास ठेवत शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खरिपाची तयारी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकºयांनी केलेली सर्व मेहनत वाया गेली. पावसाअभावी ६० पिकांचे नुकसान झाले असून धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात १२ ते १५ क्ंिवटंलने घट होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकºयांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याचे संकट ओढवले आहे.गोंदिया जिल्ह्यातील धान हे मुख्य पीक असून खरिपात १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. पण, यंदा पावसाअभावी केवळ १ लाख ५२ हजार हेक्टरवर धानाची लागवड पूर्ण झाली. यापैकी जवळपास ३० ते ४० टक्के शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. तर ६० टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. जिल्ह्यात सरासरी १३२७ मि.मि.पाऊस पडतो. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ७५० मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.यंदा सरासरीच्या केवळ ४० ते ५० टक्के पाऊस झाल्याने ६० टक्के पिकांचे नुकसान झाले. कमी पावसामुळे धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात १२ ते १५ क्विंटलने घट होण्याची शक्यता आहे.दरवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतर प्रती हेक्टरी २४ क्विंटल धानाचे उत्पादन घेतले जात होते. पण, यंदा पावसाअभावी बिकट चित्र आहे. विशेष म्हणजे कोरडवाहू क्षेत्रात धानाचे प्रती हेक्टरी उत्पादन पाच ते सहा क्विंटल होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकºयांनी केलेला लागवड खर्च देखील भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. एकंदरीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी चिंतातूर आहे. तर काही शेतकरी सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या मदतीने पिके वाचविण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र आहे.७० हजार हेक्टरमधील पिके संकटातहवामान विभागाने सुध्दा आता पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केला. तर सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे सिंचनाची सोय नसलेल्या शेतकºयांची ७० हजार हेक्टरमधील पिके संकटात आल्याचे चित्र आहे.६० टक्के पिकांचे नुकसानपावसाअभावी यंदा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सुरूवातीला कृषी विभागाने पिकांचे नुकसान झाले नसल्याचे सांगत लागवड क्षेत्र सुध्दा अधिक दाखविले होते. मात्र लोकमतने याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील ६० पिकांचे नुकसान झाल्याची कबुली दिली असून तसा अहवाल सुध्दा शासनाकडे पाठविल्याची माहिती आहे.१९८५ नंतर प्रथमच स्थिती बिकटयंदा पावसाने पाठ फिरविल्याने सर्वच पिके धोक्यात आली आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा ३० ते ३५ टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे यंदा जिल्ह्यातील एकाही सिंचन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले नाही. १९८५ नंतर प्रथमच जिल्ह्यात अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.रब्बी हंगाम धोक्यातखरीप हंगामानंतर जिल्ह्यात रब्बीची पिकांची लागवड केली जाते. रब्बी हंगामात यंदा ३६ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाने सुरूवातीला वर्तविला होता. मात्र यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पिकांची लागवड होण्याची शक्यता आता कमी आहे.शेतकºयांचे लक्ष घोषणेकडेजिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीला घेवून सर्वच राजकीय पक्षांकडून जिल्हा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. तर प्रशासनातर्फे सप्टेंबरनंतर यावर निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सरकार काय निर्णय घेते, याकडे शेतकरी बांधवाचे लक्ष लागले आहे.