शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

चालक, वाहक म्हणतात मुंबईची ड्यूटी नको रे बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 05:00 IST

आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने मुंबई कार्यालयातून चालक- वाहकांना मुंबईला पाठविण्याचा आदेश निघणार असल्याची माहिती आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक चालक- वाहकांनी या बेस्टबस सेवेबद्दल चिंता व्यक्त केली असून, अनेक जण नापसंती दर्शवत आहेत. अजून प्रत्यक्षात गोंदिया आगाराला आदेश प्राप्त झाला नाही. मात्र, असा आदेश लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे. मुंबई येथील आदेश निघणार असल्याच्या माहितीने कर्मचारी संघटनेमध्ये चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देगोंदिया आगाराला आदेश नाही : तरिही मुंबईचे नाव ऐकताच नाही बसतोय फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई येथील बेस्टसेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या विविध विभागांतील चालक- वाहकांना मुंबई बेस्टसेवेसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील अनेक चालक- वाहक मुंबईची ड्यूटी नको रे बाबा, असे म्हणत नकार देत आहेत.   सुदैवाने गोंदिया आगारातील एकाही चालक, वाहकाची गतवर्षी  मुंबई येथील बेस्ट बससेवेसाठी ड्यूटी लागली नव्हती. राज्यातील महामंडळाच्या इतर विभागांतील पुणे, सातारा, कोल्हापूर, धुळे, नांदेड, लातूर, जालना, तसेच विदर्भातील अमरावती, अकोला असे इतर जिल्ह्यांतील अनेक चालक- वाहकांची मुंबई बेस्टसेवेसाठी ड्यूटी लागली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने मुंबई कार्यालयातून चालक- वाहकांना मुंबईला पाठविण्याचा आदेश निघणार असल्याची माहिती आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक चालक- वाहकांनी या बेस्टबस सेवेबद्दल चिंता व्यक्त केली असून, अनेक जण नापसंती दर्शवत आहेत. अजून प्रत्यक्षात गोंदिया आगाराला आदेश प्राप्त झाला नाही. मात्र, असा आदेश लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे. मुंबई येथील आदेश निघणार असल्याच्या माहितीने कर्मचारी संघटनेमध्ये चर्चा सुरू आहे. आजही एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह शासनाच्या इतर सुविधा मिळत नसल्याने कर्मचारी संतप्त आहेत. त्यातच शासनाने मुंबई येथील बससेवेसाठी कर्मचाऱ्यांना पाठविण्याचा आदेश दिल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारीही शासनाने घेण्याची गरज आहे. यासोबतच चालक, वाहकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यानंतरही कर्मचारी मात्र मुंबईचे नाव ऐकताच नाहीच म्हणत आहेत.

यावर्षी अद्यापतरी कर्मचाऱ्यांना पाठविण्याचे आदेश नाही

परराज्यातील मजुरांना सोडताना झाला होता त्रासमुंबईला कर्तव्यासाठी गेल्यावर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे अनेक जण मुंबईची ड्यूटी नको रे बाबा, असे म्हणू लागले आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांतील ज्या एसटीच्या चालक- वाहकांनी मुंबईला बेस्टसेवेसाठी कर्तव्य निभावले त्यातील अनेकांना कोरोनाने ग्रासले होते. आजही त्यांचे कुटुंबीय मदतीपासून वंचित असल्याची माहिती आहे.

सुदैवाने जिल्ह्यातील एकाचीही मुंबईला ड्यूटी लागलीच नाही मागील लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील अनेक चालक- वाहकांनी स्थलांतरित परराज्यातील मजुरांना सोडण्यासाठी कर्तव्य निभावले होते. यावेळी त्यांना पिण्याच्या पाण्यापासून घरी पोहोचेपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. मात्र, सुदैवाने जिल्ह्यातील एकाही चालक- वाहकाला मुंबई येथील बेस्टसेवेसाठी कर्तव्य निभावण्यासाठी जावेच लागले नसल्याने कर्मचारी निश्चिंत होते. मात्र, आता पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडून विविध विभागांतील चालक- वाहकांची नावे मागविण्यात येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा चिंता सतावू लागली आहे.

चालक-वाहकांच्या  प्रतिक्रिया

एकीकडे सरकार मुंबईला कर्तव्यासाठी बोलावत आहे; पण दुसरीकडे त्याच चालक- वाहकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांची जबाबदारी एसटी किंवा शासन घेत नाही. शिवाय मृतांच्या  कुटुंबीयांना नुकसानभरपाईही मिळत नसल्याने शासनाने चालक- वाहकांचा  विचार करण्याची गरज आहे.  - वाहक, गोंदिया आगार

गतवर्षी कोरोनाकाळात इतर राज्यांतील मजुरांना सोडण्याचे कर्तव्य निभावले. सुदैवाने मुंबईला जावे लागले नाही. मात्र, आता वय वाढत चालल्याने कोरोनाच्या संसर्गाची भीती वाटत आहे. ५० व यापुढील कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवू नये, अशी आमची चालक- वाहक संघटनेची शासनाकडे मागणी आहे.                  -चालक, गोंदिया आगार

 

टॅग्स :state transportएसटीBESTबेस्ट