शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

डॉ.आंबेडकरांना अभिप्रेत समाज निर्माण झाला नाही

By admin | Published: March 01, 2016 1:10 AM

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हावा आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र दिला.

पालकमंत्र्यांची खंत : चिचगड येथे भीम मेळावागोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हावा आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र दिला. त्यांना या देशात धर्मनिरपेक्ष समाज रचना निर्माण करायची होती. १९५६ मध्ये बुध्द धम्माचा स्विकार करून त्यांनी समाजाच्या प्रगतीचे स्वप्न बघितले. परंतू त्यांना अभिप्रेत असलेला समाज आजवर निर्माण झाला नाही, अशी खंत पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्ती केली.देवरी तालुक्यातील चिचगड येथील भीमभूमीवर रविवारी बौध्द समाज संस्था चिचगडच्या वतीने आयोजित भीम मेळाव्यात अध्यस्थानावरून बडोले बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन खा.अशोक नेते यांनी केले. आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा परिषद सदस्य अलताफभाई हमीद, उषा शहारे, भाजपाचे महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, किसन जांभूळकर, नरेंद्र शहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री पुढे म्हणाले, समाजातील ९० टक्के लोक भूमीहीन आहेत. देशातील ओबीसी, एससी व एसटी हा समाज मागास नसला पाहिजे हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. आजही त्यात फार बदल झालेला नाही. मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांसाठी बाबासाहेबांनी त्या काळात आंदोलने केली. आरक्षणामुळे समाजाची स्थिती फार मोठी बदललेली नाही. दारिद्रयरेषेखाली राज्यात एससी एसटीची संख्या मोठी आहे. शिक्षणामुळेच समाजाची प्रगती शक्य आहे. भारतीय संविधानात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी बांधवांसाठी प्रथम तरतूद केली. त्यानंतर एससी व एसटी प्रवर्गासाठी केली, असे सांगून बडोले म्हणाले, सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारली तरच प्रगती होईल. हे केवळ शिक्षणामुळेच शक्य आहे. भीमभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण छत्तीसच्या छत्तीसही योजनेतून जास्तीत जास्त मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही पालकमंत्री बडोले यांनी दिली. उद्घाटक म्हणून बोलताना खा.नेते म्हणाले, येथील भिमभूमीच्या बांधकामासाठी १० लक्ष रु पये निधी देण्यात येईल अशी घोषणा केली. आमदार पुराम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आमदार झालो. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराचा मी पाईक आहे. समाजाने पोटजातीत भेदभाव करु नये. आदिवासी व दलीत बांधवांचा विकास झाला पाहिजे. कोणत्याही धर्मावर टिका करु नका असे सांगून भीमभूमीच्या बांधकामासाठी ५ लक्ष रुपये निधी देणार असल्याचे पुराम यांनी सांगितले. महापुरुषांचे पुतळे गावोगावी उभारण्यापेक्षा त्यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचे जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे म्हणाल्या. या कार्यक्रमाला देवरीसह अन्य तालुक्यातील बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)