शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

तुमच्या तोंडातून दुर्गंधी येते का? दातांची ही समस्या असेल प्रमुख कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:57 IST

तोंडाच्या आरोग्याची काळजी घ्या : वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : व्यक्तीच्या तोंडाच्या माध्यमातून संसर्ग त्याच्या शरीरात पसरत असल्याने मुख आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. झोपेतून उठल्यावर तोंडाची दुर्गंधी येणे सामान्य आहे. दात स्वच्छ केल्यावर दुर्गंधी बरी होते; पण जर दिवसभर तोंडाची दुर्गधी येत राहिली तर ते दातांच्या समस्येचे किंवा इतर आरोग्य स्थितीचे लक्षण असू शकते.

तोंडाचा कर्करोग : तुमच्या ओठांना, जिभेला किंवा तोंडाच्या आतील भागाला प्रभावित करू शकतो. त्याचे निदान बहुतेकदा उशिरा होते. त्यामुळे, यशस्वीरीत्या उपचार करणे कठीण होते. 

गिळण्यास अडचण डिसफॅगिया) : डिसफॅगिया म्हणजे जेव्हा तुम्हाला घन आणि द्रव गिळण्यास त्रास होतो. मज्जातंतूंत किंवा स्नायूंमध्ये समस्या, अन्ननलिकेतील समस्या या परिस्थितीत डिसफॅगिया होऊ शकतो. हा थिस्ट फंगसमुळे होणारा तोंडाचा संसर्ग आहे. तोंडात राहणाऱ्या सूक्ष्म जंतूंमध्ये बदल झाल्यास ही समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी तोंड, दात हे नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. 

मौखिक आरोग्य बिघडण्याची प्रमुख कारणेदात किडणे, हिरड्यांचा आजार, दातांची संवेदनशीलता, तोंडाची दुर्गंधी, तोंडाचे संक्रमण, धूम्रपान व तंबाखूचे सेवन, पोषक आहाराची कमतरता.

या आहेत समस्या

  • हिरड्या आणि दातांमधून रक्तस्त्राव : हिरड्यांचे आजार, दंत प्रक्रिया किंवा दुखापतींमुळे होऊ शकते. दातांवर व हिरड्यांवर प्लाक जमा होतो तेव्हा असे होते.
  • दात दुखणे : दातातील पोकळीमुळे दात किडणे, चिरलेले, तुटलेले दात, खराब झालेली फिलिंग, कैंप किंवा रोपण यामुळेसुद्धा दात दुखतात.
  • तोंडातील फोड किंवा व्रण :  अल्सर हा तोंडाच्या फोडाचा एक सामान्य प्रकार आहे. त्यामुळे दात घासणे, बोलणे, खाणे आणि पिणे यासारखी दैनंदिन कामे करणे अस्वस्थ होऊ शकतात. बहुतेक तोंडाचे व्रण एक किंवा दोन आठवड्यांत स्वतःहून बरे होतात.

मुख आरोग्य सुधारण्यासाठी उपाय

  • नियमित दंतचिकित्सकांना भेट देणे आवश्यक.
  • फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट व माउथवॉशचा वापर करणे.
  • व्हिटॅमिन 'बी' व 'सी'युक्त फळे व भाज्यांचा आहारात समावेश करणे.
  • नैसर्गिक दात स्वच्छ करणाऱ्या सफरचंद आणि गाजराचे सेवन करणे.
  • धूम्रपान व तंबाखूचे सेवन टाळणे. साखरेचे वारंवार सेवन टाळावे.

१४ दिवस तोंडाच्या आजाराकडे गांभीर्याने पाहातोंडाचे व्रण स्वतःहून बरे होतात. दात किडणे, हिरड्यांचे आजार आणि तोंडाचा संसर्ग यासारख्या दंत समस्या ओळखण्यासाठी नियमित दंतचिकित्सकांना भेट देणे. 

"तोंडाच्या आजारांमुळे तुम्ही कसे खाता, कसे बोलता, कसे संवाद साधता आणि भावना व्यक्त करता. यावर, परिणाम होऊ शकतो. निरोगी तोंड असणे तुमच्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे, दीर्घकालीन आजाराचा धोका कमी होऊ शकतो."- डॉ. अनिल आटे, दंतरोगतज्ज्ञ

टॅग्स :gondiya-acगोंदियाDental Care Tipsदातांची काळजी