शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेचा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:24 IST

गोंदिया जिल्ह्याची तलावांचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे.एकट्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३३३ तलाव आहेत. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे बहुतांशी तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. तर काही तलावात नादुरुस्तीमुळे पाणीसाठा राहात नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाव-दाभना मार्गावरील बोडीचे काम करण्याची गरज : अनेक वर्षांपासून दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्याची तलावांचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे.एकट्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३३३ तलाव आहेत. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे बहुतांशी तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. तर काही तलावात नादुरुस्तीमुळे पाणीसाठा राहात नसल्याचे चित्र आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तलावांचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.पाणी अडवा,पाणी जिरवा असे शासनाचे धोरण आहे.मात्र ही उक्ती सध्यातरी केवळ कागदोपत्रीच दिसून येत आहे. प्रशासनाच्याच मनात या दिशेने कार्य करण्याची इच्छा दिसून येत नाही.अर्जुनी मोरगाव ते दाभना या रस्त्यावर एक बोडी आहे.या बोडीत जंगलातील नाल्यांमधून पाणी येत असते.पावसाळ्यात तर अगदी तलावाचे स्वरुप येथे बघावयास मिळते. मात्र या बोडीचा सांडवा गेल्या काही वर्षापासून तुटून पडलेला आहे. यामध्ये जमा होणारे पाणी नाल्याद्वारे वाहून जाते. परिणामी या पाण्याचा उपयोगच होत नाही. सांडव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. याची प्रचिती त्यास्थळी गेल्यानंतर येते. सांडव्याच्या नजीक मोठ्या दगडांचे अस्तरीकरण (पिचिंग) करण्यात आले. अस्तरीकरणाच्या नावाखाली केवळ जमिनीत दगड मावेल एवढा खड्डा खोदून त्यात मोठे दगड पुरण्यात आले. यावरील माती वाहून गेल्याने त्याठिकाणी केवळ मोठ्या खड्यांचा खच दिसून येतो. सांडव्याच्या भिंतीला बुडाला सिमेंटचे काम न झाल्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत हा सांडवा कोलमडून पडला आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शासनाच्या उदात्त धोरणाला खीळ पडत आहे.सध्या ही बोडीची जागा एक रुक्ष वाळवंटासारखी झाली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणी अडवा पाणी जिरवा हा मंत्र इतरांना सांगण्यापेक्षा त्याचे स्वत:च पालन केल्यास मोठी समस्या मार्गी लागू शकते.सिंचन व वन्यप्राण्यांना होऊ शकते मदतसुमारे ४० एकर जागा असलेल्या या परिसरात गाळ उपसून सांडवा व तलावाची पाळ उंच केल्यास एक मोठे तलाव तयार होऊ शकते. या तलावाच्या पाण्याचा उपयोग वन्यप्राणी व सिंचनासाठी उपयुक्त ठरु शकते. मात्र या बोडीकडे कुणाचेच लक्ष नाही. बोडीचे काम केल्यास बारमाही पाणी याठिकाणी बघावयास मिळेल.मजुरीच्या खर्चातही बचत करण्यास वावयाच बोडीला लागून सागवन नर्सरी आहे आणि दुसºया बाजुला रोपवाटीका तयार करण्यात आली. या रोपवाटिकेत लागवड करण्यात आलेल्या झाडांसाठी सुमारे दोन कि.मी.अंतरावरुन पाणी आणले जाते. यासाठी मजुरांवर विनायास खर्च केला जात आहे. याठिकाणी पाणी आणण्यासाठी सुमारे ८ ते १० मजूर कामावर आहेत. जर या बोडीचा सांडवा व्यवस्थित असता तर अगदी ५० मिटर अंतरावर असलेल्या रोपवाटिकेतील झाडे जगविण्यासाठी २ कि.मी. अंतरावरुन पाणी आणण्याची वेळ आली नसती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई