शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
4
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
5
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
6
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
7
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
8
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
9
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
10
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी
13
कामगारांच्या कामाचे ९ चे झाले १२ तास, पण ओव्हरटाइमचा मिळणार जादा मोबदला; रजेचेही निकष बदलले
14
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
15
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
16
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
17
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
18
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
19
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
20
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेचा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:24 IST

गोंदिया जिल्ह्याची तलावांचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे.एकट्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३३३ तलाव आहेत. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे बहुतांशी तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. तर काही तलावात नादुरुस्तीमुळे पाणीसाठा राहात नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाव-दाभना मार्गावरील बोडीचे काम करण्याची गरज : अनेक वर्षांपासून दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्याची तलावांचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे.एकट्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३३३ तलाव आहेत. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे बहुतांशी तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. तर काही तलावात नादुरुस्तीमुळे पाणीसाठा राहात नसल्याचे चित्र आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तलावांचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.पाणी अडवा,पाणी जिरवा असे शासनाचे धोरण आहे.मात्र ही उक्ती सध्यातरी केवळ कागदोपत्रीच दिसून येत आहे. प्रशासनाच्याच मनात या दिशेने कार्य करण्याची इच्छा दिसून येत नाही.अर्जुनी मोरगाव ते दाभना या रस्त्यावर एक बोडी आहे.या बोडीत जंगलातील नाल्यांमधून पाणी येत असते.पावसाळ्यात तर अगदी तलावाचे स्वरुप येथे बघावयास मिळते. मात्र या बोडीचा सांडवा गेल्या काही वर्षापासून तुटून पडलेला आहे. यामध्ये जमा होणारे पाणी नाल्याद्वारे वाहून जाते. परिणामी या पाण्याचा उपयोगच होत नाही. सांडव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. याची प्रचिती त्यास्थळी गेल्यानंतर येते. सांडव्याच्या नजीक मोठ्या दगडांचे अस्तरीकरण (पिचिंग) करण्यात आले. अस्तरीकरणाच्या नावाखाली केवळ जमिनीत दगड मावेल एवढा खड्डा खोदून त्यात मोठे दगड पुरण्यात आले. यावरील माती वाहून गेल्याने त्याठिकाणी केवळ मोठ्या खड्यांचा खच दिसून येतो. सांडव्याच्या भिंतीला बुडाला सिमेंटचे काम न झाल्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत हा सांडवा कोलमडून पडला आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शासनाच्या उदात्त धोरणाला खीळ पडत आहे.सध्या ही बोडीची जागा एक रुक्ष वाळवंटासारखी झाली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणी अडवा पाणी जिरवा हा मंत्र इतरांना सांगण्यापेक्षा त्याचे स्वत:च पालन केल्यास मोठी समस्या मार्गी लागू शकते.सिंचन व वन्यप्राण्यांना होऊ शकते मदतसुमारे ४० एकर जागा असलेल्या या परिसरात गाळ उपसून सांडवा व तलावाची पाळ उंच केल्यास एक मोठे तलाव तयार होऊ शकते. या तलावाच्या पाण्याचा उपयोग वन्यप्राणी व सिंचनासाठी उपयुक्त ठरु शकते. मात्र या बोडीकडे कुणाचेच लक्ष नाही. बोडीचे काम केल्यास बारमाही पाणी याठिकाणी बघावयास मिळेल.मजुरीच्या खर्चातही बचत करण्यास वावयाच बोडीला लागून सागवन नर्सरी आहे आणि दुसºया बाजुला रोपवाटीका तयार करण्यात आली. या रोपवाटिकेत लागवड करण्यात आलेल्या झाडांसाठी सुमारे दोन कि.मी.अंतरावरुन पाणी आणले जाते. यासाठी मजुरांवर विनायास खर्च केला जात आहे. याठिकाणी पाणी आणण्यासाठी सुमारे ८ ते १० मजूर कामावर आहेत. जर या बोडीचा सांडवा व्यवस्थित असता तर अगदी ५० मिटर अंतरावर असलेल्या रोपवाटिकेतील झाडे जगविण्यासाठी २ कि.मी. अंतरावरुन पाणी आणण्याची वेळ आली नसती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई