शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

जिल्हा डासमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 22:03 IST

सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरियासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरियावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा, असे आवाहन जि.प.आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रमेश अंबुले यांनी केले.

ठळक मुद्देरमेश अंबुले : जागतिक हिवताप दिनानिमित्त अधिकारी-कर्मचारी सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरियासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरियावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा, असे आवाहन जि.प.आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रमेश अंबुले यांनी केले.जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात बुधवारी (दि.२५) जागतिक हिवताप दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते मार्गदर्शन करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी जि.प.महिला व बालकल्याण समितीचे सभापती लतादोनोडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी राऊत, एच.एच.पारधी यांची उपस्थिती होती.मलेरियासारख्या आजारावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्ष राहावे, असे सांगून अंबुले म्हणाले, सांडपाणी रस्त्याने वाहणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. ज्यांनी मलेरीया निर्मूलनासाठी चांगले काम केले आहे ते कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.दोनोडे म्हणाल्या, आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना आहेत. प्रत्येकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे. डासांची उत्पत्तीच होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य विभागाने ज्या गावामध्ये डास आहेत तेथे नियमित फवारणी करावी. त्यामुळे मलेरियासारखे आजार होणार नाही, असे त्यांनी सांगितले.पातुरकर म्हणाले, कुटूंब कल्याण व मलेरिया निर्मूलन कार्यक्रम बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. नियोजनात चुका झाल्या की रूग्णांच्या प्रमाणात वाढ होते. आरोग्य सेवा झपाट्याने या रोगावर मात करण्यासाठी काम करीत आहे. कायाकल्प योजना व लोकसहभागातून आरोग्य विभाग मलेरिया या आजारावर मात करण्यासाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. निमगडे म्हणाले, हिवताप हा आजार राज्याच्या काही भागात आहे. गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त असल्यामुळे आणि शेजारी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड हे दोन्ही राज्य लागून असल्यामुळे कामानिमित्त स्थलांतर करणाºयांचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: जिल्ह्यातील देवरी व सालेकसा तालुक्यात या आजाराचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. मलेरियाच्या डासापासून बचावासाठी मोठ्या प्रमाणात मच्छरदाण्यांचे सुध्दा या भागात वितरण करण्यात आले आहे. सांडपाण्याचे योग्य नियोजन केले तर डासांची उत्पत्ती होणार नाही व या आजारावर मात करता येईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.वाळके म्हणाले, मच्छरांपासून हा आजार होतो. मलेरियामुळे विकासात अडथळा निर्माण झाला आहे. या आजारावर मात करण्यासाठी आबालवृध्दांना आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी मांडले. संचालन किशोर भालेराव यांनी केले. आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा येळे यांनी मानले. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, आशा सेविका यांची उपस्थिती होती.उत्कृष्ट कार्याची दखलमलेरियाच्या निर्मूलनासाठी उत्कृष्ट कार्य करणारे दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ओ.जी. थोटे, डॉ. नरेश येरणे, मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विजय पटले, ककोडीचे डॉ. गजानन काळे, केशोरीचे डॉ. पिंकू मंडल, धाबेपवनीचे डॉ.ए.बी. हजारे, खोडशिवनीचे डॉ. खोटेले, शेंडाचे डॉ. डुंभरे, तसेच प्रत्येक तालुक्यातील तीन आशा कार्यकर्ती, एक़ आरोग्य सहायक, एक आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक व एक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचा व काही पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Healthआरोग्य