शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

जिल्हा डासमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 22:03 IST

सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरियासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरियावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा, असे आवाहन जि.प.आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रमेश अंबुले यांनी केले.

ठळक मुद्देरमेश अंबुले : जागतिक हिवताप दिनानिमित्त अधिकारी-कर्मचारी सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरियासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरियावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा, असे आवाहन जि.प.आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रमेश अंबुले यांनी केले.जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात बुधवारी (दि.२५) जागतिक हिवताप दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते मार्गदर्शन करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी जि.प.महिला व बालकल्याण समितीचे सभापती लतादोनोडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी राऊत, एच.एच.पारधी यांची उपस्थिती होती.मलेरियासारख्या आजारावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्ष राहावे, असे सांगून अंबुले म्हणाले, सांडपाणी रस्त्याने वाहणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. ज्यांनी मलेरीया निर्मूलनासाठी चांगले काम केले आहे ते कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.दोनोडे म्हणाल्या, आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना आहेत. प्रत्येकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे. डासांची उत्पत्तीच होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य विभागाने ज्या गावामध्ये डास आहेत तेथे नियमित फवारणी करावी. त्यामुळे मलेरियासारखे आजार होणार नाही, असे त्यांनी सांगितले.पातुरकर म्हणाले, कुटूंब कल्याण व मलेरिया निर्मूलन कार्यक्रम बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. नियोजनात चुका झाल्या की रूग्णांच्या प्रमाणात वाढ होते. आरोग्य सेवा झपाट्याने या रोगावर मात करण्यासाठी काम करीत आहे. कायाकल्प योजना व लोकसहभागातून आरोग्य विभाग मलेरिया या आजारावर मात करण्यासाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. निमगडे म्हणाले, हिवताप हा आजार राज्याच्या काही भागात आहे. गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त असल्यामुळे आणि शेजारी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड हे दोन्ही राज्य लागून असल्यामुळे कामानिमित्त स्थलांतर करणाºयांचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: जिल्ह्यातील देवरी व सालेकसा तालुक्यात या आजाराचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. मलेरियाच्या डासापासून बचावासाठी मोठ्या प्रमाणात मच्छरदाण्यांचे सुध्दा या भागात वितरण करण्यात आले आहे. सांडपाण्याचे योग्य नियोजन केले तर डासांची उत्पत्ती होणार नाही व या आजारावर मात करता येईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.वाळके म्हणाले, मच्छरांपासून हा आजार होतो. मलेरियामुळे विकासात अडथळा निर्माण झाला आहे. या आजारावर मात करण्यासाठी आबालवृध्दांना आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी मांडले. संचालन किशोर भालेराव यांनी केले. आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा येळे यांनी मानले. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, आशा सेविका यांची उपस्थिती होती.उत्कृष्ट कार्याची दखलमलेरियाच्या निर्मूलनासाठी उत्कृष्ट कार्य करणारे दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ओ.जी. थोटे, डॉ. नरेश येरणे, मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विजय पटले, ककोडीचे डॉ. गजानन काळे, केशोरीचे डॉ. पिंकू मंडल, धाबेपवनीचे डॉ.ए.बी. हजारे, खोडशिवनीचे डॉ. खोटेले, शेंडाचे डॉ. डुंभरे, तसेच प्रत्येक तालुक्यातील तीन आशा कार्यकर्ती, एक़ आरोग्य सहायक, एक आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक व एक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचा व काही पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Healthआरोग्य