शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

शासन निर्णयाची अवहेलना

By admin | Updated: May 11, 2017 00:27 IST

तिरोडा तालुक्याच्या गांगला ग्रा.पं.मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्राम उदय ते भारत उदय या शासनाच्या महत्वपूर्ण

गांगला ग्रामपंचायतमधील प्रकार : ग्राम उदय ते भारत उदय अभियानाचा फज्जा लोकमत न्यूज नेटवर्क काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या गांगला ग्रा.पं.मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्राम उदय ते भारत उदय या शासनाच्या महत्वपूर्ण घोषित निर्णयाची अवहेलना करण्यात आली. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार जि.प.च्या पत्रानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यात सदर कार्यक्रम घेण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली. भारत सरकार व राज्य शासनाने खास उपक्रम म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती भारतभर सर्व स्तरावर शासनाच्या परिपत्रकानुसार १४ एप्रिल ते २४ एप्रिल २०१६ या दरम्यान साजरी करावयाची होती. या कार्यक्रमाकरिता पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. शासनाच्या परिपत्रकाची व आदेशाची अवहेलना करून ग्रा.पं. गांगला येथे जयंतीनिमित्त साधे छायाचित्रही न लावता एक फूलसुध्दा अर्पण करण्यात आला नाही. याची तक्रार ११ मे २०१६, १३ जुलै २०१६ व १५ नोव्हेंबर २०१६ ला करण्यात आली होती. ३० नागरिकांच्या स्वाक्षरीनिशी तक्रार व निवेदन देवून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. उमुकाअ जि.प. गोंदिया यांच्या पत्रानुसार (साप्रवि/पंचा/कस/का-२८/कावि-४१५/२०१६ दि. १७/११/२०१६) चौकशी करून अहवाल सादर करण्याचे तिरोडा गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले होते. चौकशीत ग्रामसभेचे नियोजन न होणे व ग्राम उदय ते भारत उदय कार्यक्रमाची चौकशी करण्यात आली. यात काही बाबी उघड झाल्या आहेत. चौकशी विस्तार अधिकारी धारगावे यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ग्राम उदय ते भारत उदय या अभियानांतर्गत ग्रा.पं. गांगला येथे ग्रामसभेचे नियोजन व आदरांजली कार्यक्रम घेण्यात आले नाही. १४ ते २४ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम घ्यायचे होते. मात्र एकही कार्यक्रम न घेतल्याने सरपंच व ग्रामसेवकाने शासनाचे घोषित निर्णय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. २५ मे २०१६ ची ग्रामसभा ३१ मे रोजी तहकुब सभा घेण्यात आली. ती कायदा व नियमानुसार झाली नसल्याची तक्रार हगरु तुलाराम नंदेश्वर व सुखराम गणवीर यांनी केली होती. ग्रामसेवकांना नोव्हेंबर २०१५ व मे २०१६ ची ग्रामसभेचे प्रोसिडींग व हजेरी बुकची सत्यप्रत मागितली. परंतु देण्यात आली नाही, असे चौकशीत आढळले. सरपंच सविता चामट यांचे लेखी बयान नोंदविण्यात आले. सविता यांनी सांगितले की, ग्राम उदय ते भारत उदय या अभियानासंबंधी झालेल्या पं.स.च्या सभेची माहिती आपल्याला नव्हती. तत्कालीन ग्रामसेवक धुर्वे यांनी सांगितले, परंतु आपण गावात नसल्याने कार्यक्रमाविषयी माहिती नसल्याचे बयानात सांगितले. ग्रामसेवक पी.एम. चव्हाण यांनी लेखी बयान नोंदविले. ग्राम उदय ते भारत उदयकरिता पाच हजार रूपये प्राप्त झाले. कार्यक्रम झाले असल्याची कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे कार्यक्रमाकरिता निधी खर्च झाल्याची नोंद रोखरहीत नाही. ग्रामसेवक चव्हाण आणि सरपंच सविता चामट यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा हगरु नंदेश्वर, सुखराम गणवीर, जयभीम सांगोडे, के.आर. टेंभेकर सहीत शेकडो ग्रामस्थांनी दिला आहे. चौकशी समितीचा निष्कर्ष महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय (११७/परा-३ दि. ६ एप्रिल २०१६) प्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ग्राम उदय ते भारत उदय या अभियानांतर्गत ग्रामसभेचे नियोजन व आदरांजली कार्यक्रम १४ ते २४ एप्रिल २०१६ दरम्यान विविध कार्यक्रम घ्यायचे होते. यासाठी पाच हजार रुपयांची तरतूद होती. परंतु सदर कार्यक्रमाबद्दल ग्रा.पं. गांगला येथे कार्यक्रम झाल्याची कोणतीही नस्ती ठेवलेली नसून निधी खर्च झाल्याची नोंद रोखवहीत नाही. गटविकास अधिकाऱ्यांचा अभिप्राय सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतला शासन निर्णयानुसार ग्राम उदय ते भारत उदय या अभियानांतर्गत १४ ते २४ एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रम घ्यायचे होते. परंतु ग्रा.पं. गांगला येथे शासन निर्देशान्वये ग्रामसभेचे नियोजन व आदरांजली कार्यक्रम घेण्यात आले नाही. ग्रामसभा महा. ग्रा.पं.अधिनियम १९५८ चे कलम ७ अन्वये अंमलबजावणी करताना सरपंच व ग्रामसेवक यांना अपयश आल्याचे दिसून येते. सरपंचाला हार घालण्यास मज्जाव १४ एप्रिल २०१७ ला मागील वर्षी केलेल्या अवमाननेच्या रागापोटी यावर्षी सरपंचांस कोणतेही निमंत्रण देण्यात आले नसताना अचानक सरपंच सविता चामट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करायला आल्या. त्यावेळी सर्व बौध्द बांधवानी त्यांना हार घालण्यास मनाई केली. सन २०१६ मध्ये अपमान व अवहेलना केले असताना माफी न मागितल्याचे कारण सांगितले आहे.