शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

शासन निर्णयाची अवहेलना

By admin | Updated: May 11, 2017 00:27 IST

तिरोडा तालुक्याच्या गांगला ग्रा.पं.मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्राम उदय ते भारत उदय या शासनाच्या महत्वपूर्ण

गांगला ग्रामपंचायतमधील प्रकार : ग्राम उदय ते भारत उदय अभियानाचा फज्जा लोकमत न्यूज नेटवर्क काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या गांगला ग्रा.पं.मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्राम उदय ते भारत उदय या शासनाच्या महत्वपूर्ण घोषित निर्णयाची अवहेलना करण्यात आली. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार जि.प.च्या पत्रानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यात सदर कार्यक्रम घेण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली. भारत सरकार व राज्य शासनाने खास उपक्रम म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती भारतभर सर्व स्तरावर शासनाच्या परिपत्रकानुसार १४ एप्रिल ते २४ एप्रिल २०१६ या दरम्यान साजरी करावयाची होती. या कार्यक्रमाकरिता पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. शासनाच्या परिपत्रकाची व आदेशाची अवहेलना करून ग्रा.पं. गांगला येथे जयंतीनिमित्त साधे छायाचित्रही न लावता एक फूलसुध्दा अर्पण करण्यात आला नाही. याची तक्रार ११ मे २०१६, १३ जुलै २०१६ व १५ नोव्हेंबर २०१६ ला करण्यात आली होती. ३० नागरिकांच्या स्वाक्षरीनिशी तक्रार व निवेदन देवून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. उमुकाअ जि.प. गोंदिया यांच्या पत्रानुसार (साप्रवि/पंचा/कस/का-२८/कावि-४१५/२०१६ दि. १७/११/२०१६) चौकशी करून अहवाल सादर करण्याचे तिरोडा गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले होते. चौकशीत ग्रामसभेचे नियोजन न होणे व ग्राम उदय ते भारत उदय कार्यक्रमाची चौकशी करण्यात आली. यात काही बाबी उघड झाल्या आहेत. चौकशी विस्तार अधिकारी धारगावे यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ग्राम उदय ते भारत उदय या अभियानांतर्गत ग्रा.पं. गांगला येथे ग्रामसभेचे नियोजन व आदरांजली कार्यक्रम घेण्यात आले नाही. १४ ते २४ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम घ्यायचे होते. मात्र एकही कार्यक्रम न घेतल्याने सरपंच व ग्रामसेवकाने शासनाचे घोषित निर्णय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. २५ मे २०१६ ची ग्रामसभा ३१ मे रोजी तहकुब सभा घेण्यात आली. ती कायदा व नियमानुसार झाली नसल्याची तक्रार हगरु तुलाराम नंदेश्वर व सुखराम गणवीर यांनी केली होती. ग्रामसेवकांना नोव्हेंबर २०१५ व मे २०१६ ची ग्रामसभेचे प्रोसिडींग व हजेरी बुकची सत्यप्रत मागितली. परंतु देण्यात आली नाही, असे चौकशीत आढळले. सरपंच सविता चामट यांचे लेखी बयान नोंदविण्यात आले. सविता यांनी सांगितले की, ग्राम उदय ते भारत उदय या अभियानासंबंधी झालेल्या पं.स.च्या सभेची माहिती आपल्याला नव्हती. तत्कालीन ग्रामसेवक धुर्वे यांनी सांगितले, परंतु आपण गावात नसल्याने कार्यक्रमाविषयी माहिती नसल्याचे बयानात सांगितले. ग्रामसेवक पी.एम. चव्हाण यांनी लेखी बयान नोंदविले. ग्राम उदय ते भारत उदयकरिता पाच हजार रूपये प्राप्त झाले. कार्यक्रम झाले असल्याची कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे कार्यक्रमाकरिता निधी खर्च झाल्याची नोंद रोखरहीत नाही. ग्रामसेवक चव्हाण आणि सरपंच सविता चामट यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा हगरु नंदेश्वर, सुखराम गणवीर, जयभीम सांगोडे, के.आर. टेंभेकर सहीत शेकडो ग्रामस्थांनी दिला आहे. चौकशी समितीचा निष्कर्ष महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय (११७/परा-३ दि. ६ एप्रिल २०१६) प्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ग्राम उदय ते भारत उदय या अभियानांतर्गत ग्रामसभेचे नियोजन व आदरांजली कार्यक्रम १४ ते २४ एप्रिल २०१६ दरम्यान विविध कार्यक्रम घ्यायचे होते. यासाठी पाच हजार रुपयांची तरतूद होती. परंतु सदर कार्यक्रमाबद्दल ग्रा.पं. गांगला येथे कार्यक्रम झाल्याची कोणतीही नस्ती ठेवलेली नसून निधी खर्च झाल्याची नोंद रोखवहीत नाही. गटविकास अधिकाऱ्यांचा अभिप्राय सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतला शासन निर्णयानुसार ग्राम उदय ते भारत उदय या अभियानांतर्गत १४ ते २४ एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रम घ्यायचे होते. परंतु ग्रा.पं. गांगला येथे शासन निर्देशान्वये ग्रामसभेचे नियोजन व आदरांजली कार्यक्रम घेण्यात आले नाही. ग्रामसभा महा. ग्रा.पं.अधिनियम १९५८ चे कलम ७ अन्वये अंमलबजावणी करताना सरपंच व ग्रामसेवक यांना अपयश आल्याचे दिसून येते. सरपंचाला हार घालण्यास मज्जाव १४ एप्रिल २०१७ ला मागील वर्षी केलेल्या अवमाननेच्या रागापोटी यावर्षी सरपंचांस कोणतेही निमंत्रण देण्यात आले नसताना अचानक सरपंच सविता चामट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करायला आल्या. त्यावेळी सर्व बौध्द बांधवानी त्यांना हार घालण्यास मनाई केली. सन २०१६ मध्ये अपमान व अवहेलना केले असताना माफी न मागितल्याचे कारण सांगितले आहे.