शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

अक्षय्यतृतीयेला बालविवाह करणाऱ्यांवर थेट कारवाई; महिला व बालविकास विभाग सतर्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 16:41 IST

Gondia : महिला व बालविकास विभाग अलर्ट मोडवर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाह पार पडतात. हे बालविवाह लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभाग अॅक्शन मोडवर आले आहे. या दिवशी बालविवाह झाल्यास थेट कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी दिल्या आहेत.

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. यात ग्रामीण भागातील बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१२ बालविवाह रोखलेमागील सव्वा तीन वर्षांत जिल्ह्यात प्रशासनाला १२ बालविवाह थांबविण्यात यश आले. सन २०२२मध्ये २, २०२३ ३, २०२४ मध्ये २, तर २०२५ मध्ये ५ बालविवाह थांबविण्यात आले. यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६मधील कलम १६ (१) नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांनी दिली.

पंडित, छायाचित्रकारांवर होणार कारवाईबालविवाहात सहभागी होणारे व सहकार्य करणाऱ्या व्यक्ती, धार्मिक गुरू, पंडित, सेवा देणारे व्यावसायिक, मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन मालक यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

शुभ मुहूर्ताचा गैरफायदाअक्षय्यतृतीयेचा संपूर्ण दिवस साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक मानला जातो. या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.बालविवाह रोखण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइनचा टोल फ्री क्रमांक १०९८ अथवा ११२ यावर माहिती नोंदविता येणार आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारी