शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटीबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 10:19 PM

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यावर आपला भर आहे. या योजनांचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री : मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यावर आपला भर आहे. या योजनांचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.गुरूवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी रोहन घुगे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक रामानुजम, उपवनसंरक्षक एस.युवराज, माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, माजी आ.खोमेश्वर रहांगडाले, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे,जि.प.अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हाश्मी, निवासी उपजिल्हाधिकारी हरीष धार्मिक, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, कार्यकारी अभियंता चव्हाण, गाणार, पठाण, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त वाळके, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालीनी भूत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी गजभिये, जिल्हा उपनिबंधक कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ढोणे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी वासनिक, शिक्षणाधिकारी हिवरे, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. फुके पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७७ हजार ४६४ खातेदार शेतकऱ्यांची २२३ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील १ लाख २२ हजार १४२ शेतकºयांना देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जसंधारण आणि मृदसंधारणामध्ये क्र ांती घडून आली आहे. या अभियानाला जिल्ह्यात लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाल्याने मागील चार वर्षात जिल्ह्यातील ३९९ गावात ८ हजार ९९२ कामे पूर्ण करण्यात आली. यामधून ८२ हजार ४९६ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून १ लाख ६४ हजार ९९३ हेक्टर क्षेत्र निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी मागील पाच वर्षात पुढाकार आला. जिल्ह्यातील विविध प्रकल्पातून १४ हजार ५६३ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. ११ हजार ८८४ शेतकºयांच्या कृषीपंपांना जुलै २०१९ पर्यंत वीजजोडणी दिल्यामुळे त्या शेतकºयांची शेती संरक्षित सिंचनाखाली आल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. डॉ. फुके पुढे म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चार वर्षात जिल्ह्यातील ४३० कि.मी.ग्रामीण रस्त्यांची ८१ कामे पूर्ण करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतुकीची चांगली सुविधा निर्माण झाली आहे. जिल्हा हागणदारी मुक्त झाला असून नादुरुस्त असलेली ४१ हजार ७९७ शौचालय दुरुस्त करुन वापरात आणण्यात यश आले आहे.जिल्ह्यातील मजुरांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना जिल्ह्यासाठी महत्वाची ठरली आहे. या योजनेतून पाच वर्षात ६ लाख ८९ हजार ७२९ कुटूंबाना रोजगार पुरविण्यात आल्याचे फुके यांनी सांगितले. प्रारंभी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करुन परेडचे निरीक्षण केले व मानवंदना स्विकारली.कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मंजूश्री देशपांडे यांनी मानले.पाच वर्षांत १७५९ कोटी रुपयांची धान खरेदीजिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार सक्षमपणे उभे आहे.मागील पाच वर्षात शासनाने १७५९ कोटी ९६ लाख रु पयांची धान खरेदी करुन ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. या धान उत्पादक शेतकऱ्यांना २१२ कोटी ६२ लाख रुपयांचे बोनस दिले आहे.१२ हजार हेक्टर वनक्षेत्र उपजीविकेसाठीवनहक्क कायदयाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून ८५६ सामूहीक वनहक्क दावे मान्य करु न ९८ हजार ५५५ हेक्टर तर ८ हजार ५०० वैयक्तिक दावेदारांना १२ हजार ६४ हेक्टर वनक्षेत्र त्यांच्या उपजिविकेसाठी वाटप करण्यात आले आहे. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा ५५६ शेतकºयांना लाभ दिला.५० कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १ कोटी ३९ लाख ९३ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.पर्यटन स्थळांचा सर्वांगिन विकासगोंदिया जिल्हा हा नैसिर्गकदृष्टया समृध्द आहे. जिल्ह्यात पर्यटन स्थळे, तीर्थस्थळे, वन्यजीव व स्थलांतरीत पक्षी मोठया प्रमाणात आहे. जिल्ह्याचे वैभव असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासोबतच जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांचा विकास करण्यासोबतच जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात कसे येतील व त्या माध्यमातून स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगार कसा उपलब्ध होईल. यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री फुके यांनी दिली.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनParinay Fukeपरिणय फुके