शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसानंतरही तूट कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तसेच नदी-नाल्यांना पाणी आले. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातील पावसाने कहर केला असून मागील कित्येक वर्षांनंतर जिल्ह्यात पुराचा वेढा दिसला. सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतच्या या १० दिवसांत पावसाने जिल्ह्याला पार झोडपून काढले असून सर्वत्र पाणी-पाणी केले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला पुराचा वेढा : तरीही १९५ मिमीची तूट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरवड्यापासून जिल्ह्याला पावसाने पार झोडपून काढले आहे. आजही जिल्ह्यात दमदार पाऊस बरसत असून पुराने वेढा घातला आहे. मागील कित्येक वर्षांनंतर हे चित्र बघावयास मिळत आहे. मात्र असे असतानाही आजही सरासरी १९५ मिमी पावसाची तूट कायम आहे. पावसाने कहर क रून सोडला असताना आता उरलेल्या २० दिवसांत मात्र ही तूट भरते काय याकडे लक्ष लागले आहे.सुरूवातीच्या जून व जुलै महिन्यात पावसाने पाहिजे त्या प्रमाणात आपली हजेरी लावली नाही. परिणामी तेव्हापासूनच जिल्ह्यातील अपेक्षित व बरसलेल्या पावसात तूट दिसून आली. जून महिना कोरडाच गेला त्यानंतर जुलै महिन्यात काही पाऊस बरसला व तेव्हापासूनच हा फरक वाढू लागला.अशात आॅगस्ट महिन्यात वरूणराज जिल्ह्यावर मेहरबान झाले.याच महिन्यात जिल्हा सावरला.दमदार पावसाच्या हजेरीने शेतीची कामे उशीरा का होईना मात्र कशीतरी आटोपली. ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तसेच नदी-नाल्यांना पाणी आले. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातील पावसाने कहर केला असून मागील कित्येक वर्षांनंतर जिल्ह्यात पुराचा वेढा दिसला. सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतच्या या १० दिवसांत पावसाने जिल्ह्याला पार झोडपून काढले असून सर्वत्र पाणी-पाणी केले आहे. असे असताना मात्र आजही अपेक्षित व बरसलेल्या पावसात सरासरी १९५ मिमी तूट दिसून येत आहे.जिल्ह्यात ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७५ मिमी पाऊस बरसने अपेक्षित आहे. असे असताना मात्र जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९७७ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच, आजही सरासरी १९५ मिमी पावसाची तूट कायम आहे.मागील वर्षी ९ सप्टेंबरपर्यंत सरासरी १०४५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली होती.२० दिवसांत सरासरी ३५० मिमीची गरजहवामान खात्यानुसार,जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी १३२७ मिमी पाऊस बरसने अपेक्षित आहे. तर आतापर्यंत सरासरी ९७७ मीमी पाऊस बरसला आहे. आता पावसाचे २० दिवस शिल्लक असून यात कालावधीत सरासरी ३५० मिमी पावसाची गरज आहे.सध्या बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात ३५० मिमीचे टार्गेट सर करण्यासाठी पाऊस बरसल्यास काय स्थिती राहणार याची कल्पना न केलेलीच बरी.

टॅग्स :floodपूरwater shortageपाणीकपात