शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मुसळधार पावसानंतरही तूट कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तसेच नदी-नाल्यांना पाणी आले. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातील पावसाने कहर केला असून मागील कित्येक वर्षांनंतर जिल्ह्यात पुराचा वेढा दिसला. सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतच्या या १० दिवसांत पावसाने जिल्ह्याला पार झोडपून काढले असून सर्वत्र पाणी-पाणी केले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला पुराचा वेढा : तरीही १९५ मिमीची तूट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरवड्यापासून जिल्ह्याला पावसाने पार झोडपून काढले आहे. आजही जिल्ह्यात दमदार पाऊस बरसत असून पुराने वेढा घातला आहे. मागील कित्येक वर्षांनंतर हे चित्र बघावयास मिळत आहे. मात्र असे असतानाही आजही सरासरी १९५ मिमी पावसाची तूट कायम आहे. पावसाने कहर क रून सोडला असताना आता उरलेल्या २० दिवसांत मात्र ही तूट भरते काय याकडे लक्ष लागले आहे.सुरूवातीच्या जून व जुलै महिन्यात पावसाने पाहिजे त्या प्रमाणात आपली हजेरी लावली नाही. परिणामी तेव्हापासूनच जिल्ह्यातील अपेक्षित व बरसलेल्या पावसात तूट दिसून आली. जून महिना कोरडाच गेला त्यानंतर जुलै महिन्यात काही पाऊस बरसला व तेव्हापासूनच हा फरक वाढू लागला.अशात आॅगस्ट महिन्यात वरूणराज जिल्ह्यावर मेहरबान झाले.याच महिन्यात जिल्हा सावरला.दमदार पावसाच्या हजेरीने शेतीची कामे उशीरा का होईना मात्र कशीतरी आटोपली. ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तसेच नदी-नाल्यांना पाणी आले. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातील पावसाने कहर केला असून मागील कित्येक वर्षांनंतर जिल्ह्यात पुराचा वेढा दिसला. सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतच्या या १० दिवसांत पावसाने जिल्ह्याला पार झोडपून काढले असून सर्वत्र पाणी-पाणी केले आहे. असे असताना मात्र आजही अपेक्षित व बरसलेल्या पावसात सरासरी १९५ मिमी तूट दिसून येत आहे.जिल्ह्यात ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७५ मिमी पाऊस बरसने अपेक्षित आहे. असे असताना मात्र जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९७७ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच, आजही सरासरी १९५ मिमी पावसाची तूट कायम आहे.मागील वर्षी ९ सप्टेंबरपर्यंत सरासरी १०४५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली होती.२० दिवसांत सरासरी ३५० मिमीची गरजहवामान खात्यानुसार,जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी १३२७ मिमी पाऊस बरसने अपेक्षित आहे. तर आतापर्यंत सरासरी ९७७ मीमी पाऊस बरसला आहे. आता पावसाचे २० दिवस शिल्लक असून यात कालावधीत सरासरी ३५० मिमी पावसाची गरज आहे.सध्या बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात ३५० मिमीचे टार्गेट सर करण्यासाठी पाऊस बरसल्यास काय स्थिती राहणार याची कल्पना न केलेलीच बरी.

टॅग्स :floodपूरwater shortageपाणीकपात