शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मागणी १४० रुपयांची, मंजूर केले केवळ ४० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 15:59 IST

Gondia : धान भरडाई दरात वाढ राईस मिलर्समध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासकीय धान भरडाईच्या दरात शासनाने ४० रुपये वाढ करण्याचा निर्णय सोमवारी (दि.२३) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. मात्र, या निर्णयामुळे राईस मिलर्समध्ये नाराजीचा सूर आहे. राईस मिलर्सने १४० प्रतिक्विंटल भरडाई दर देण्याची मागणी केली होती, पण शासनाने केवळ ४० रु. दरात वाढ केल्याने धानाची भरडाई करायची कशीश, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यात पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी करते. 

यानंतर धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्ससह करार करून धानाची भरडाई करून सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. राईस मिलर्सला प्रति १ क्विंटल धानामागे भरडाई करून ६७ क्विंटल तांदूळ शासनाकडे जमा करावा लागतो, तर १ क्विंटल धानाच्या भरडाईसाठी ५० रुपये खर्च येतो, पण भरडाईदरम्यान तांदळाचा तुकडा कमी येतो. 

त्यामुळे तांद‌ळाची उतारी ही ५० ते ५५ किलोच्यावर जात नाही. परिणामी, राईस मिलर्सला नुकसान सहन करावे लागते. त्यामुळेच राईस मिलर्सकडून धानाच्या प्रतिक्विंटल भरडाईचे दर १४० रुपये देण्याची मागणी केली जात होती. तसेच १४० रुपये दर का हेसुद्धा राईस मिलर्सने शासनाकडे पत्रव्यवहार करून पटवून दिले होते. मात्र, यानंतरही शासनाने सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ ४० रुपये वाढ केली. 

त्यामुळे आता राईस मिलर्सला प्रतिक्विंटलमागे भरडाईसाठी ५० रुपये मिळणार आहे. मात्र, यानंतर राईस मिलर्सला नुकसान होणार असल्याने या निर्णयाने राईस मिलर्समध्ये नाराजीचा सूर आहे. 

११ वर्षांपासून भरडाई दरात वाढीची मागणी लगतच्या मध्य प्रदेशात शासकीय धानाचा प्रतिविचटल भरडाईचा दर २०० रुपये, तर छत्तीसगडमध्ये १३० रुपये प्रतिक्चिंटल आहे. मात्र, केवळ महारा- ष्ट्रातच प्रतिक्चिटल भरडाईचा दर ५० रुपये दिला जातो. या दरात वाढ करण्यात यावी यासाठी राईस मिलर्स असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या ११ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे, पण शासनाने अद्यापही १४० रुपये प्रतिक्विंटल दर दिला नाही.

त्यामुळे तांदळाच्या गुणवत्तेवर परिणाम भरडाईदरम्यान तांदळाची उतारी ५० ते ५५ किलो येत आहे, तर शासनाला प्रतिक्विंटलमागे ६७ क्विंटल तांदूळ जमा करावे लागत आहे. भरडाई दर कमी असल्याने व तूट अधिक असल्याने त्यात बाहेरून तांदूळ खरेदी करून तूट भरली जात आहे. यामुळे तांदळाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची माहिती आहे.

पर्याय नसल्याने भरडाई गेल्या सात-आठ वर्षांपासून पूर्व विदर्भातील राईस मिल उद्योग डबघाईस आला आहे. त्यामुळे शासकीय धानाची भरडाई हाच एकमेव उत्पन्नाचा स्रोत राईस मिलर्सला आहे. त्यामुळे परवडत नसले तरी ते धानाची भरडाई करीत असल्याची माहिती आहे. 

"राईस मिलर्स असोसिएशनच्या माध्यमातून धानाचा प्रतिक्विंटल भरडाईचा दर १४० रुपये करण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. सोमवारी शासनाने भरडाई दरात ४० रुपयांनी वाढ करून राईस मिलर्सच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे." - अशोक अग्रवाल, अध्यक्ष विदर्भ राईस मिलर्स असोसिएशन

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीgondiya-acगोंदिया