शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सणवार अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 9:25 PM

नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी अडचणीत असून त्यांचे सणवार अंधारात दिसून येत आहेत.मात्र यानंतरही नगर परिषदेकडून सदर एजंसीवर कुठली कारवाही करण्यात आली नसून उलट अभय दिले जात आहे.

ठळक मुद्देसंवेदनाहीन पालिका प्रशासन : सहा महिन्यापासून कंत्राटी कर्मचारी वेतनाविना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी अडचणीत असून त्यांचे सणवार अंधारात दिसून येत आहेत.मात्र यानंतरही नगर परिषदेकडून सदर एजंसीवर कुठली कारवाही करण्यात आली नसून उलट अभय दिले जात आहे.नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून विविध विभागांत कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोजी रोटीसाठी हे कर्मचारी इमानदारीने काम करीत आहे. मात्र त्यांचे मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार देण्यात आले नाही. नगर परिषदेची आर्थिक स्थिती हलाखीची असताना एखाद्यावेळेस पगार मागे-पुढे होणे या कर्मचाऱ्यांनाही मान्य आहे. मात्र पाच-सहा महिने पगार होत नसल्याने कर्मचाºयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.विशेष म्हणजे, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजंसीची नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्याची आर्थिक स्थिती नसताना त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी नियुक्त करण्याचे अधिकार कसे काय देण्यात आले हा मुद्दा देखील उपस्थित केला जात आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ वेतनापेक्षा पाच ते सात हजार रुपये कमी दिले जात असताना एजंसीवर कारवाही करण्याऐवजी नगर परिषदेचे पदाधिकारी व जिल्हा प्रशासन सुध्दा गप्प राहण्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार नसल्याने या कर्मचाऱ्यांवर उधार-उसनवारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. एवढा गंभीर प्रकार नगर परिषदेत घडत असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कुणीही काहीच करीत नसल्याने नगर परिषद प्रशासन संवेदनाहिन झाल्याचेही हे कर्मचारी बोलत आहेत. पुढे नवरात्र, रामनवमी व गुढीपाडवा हे सण असून हे सुद्धा अंधारातच दिसून येत आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कुणीच वाली नाहीनगर परिषेदेचे कामकाज चालविण्यासाठी कंत्राटी कर्मचारी काम करीत असताना त्यांच्या पगारासाठी कुणीही काहीच करीत नसल्याचे चित्र आहे. मुख्याधिकारी बेमुदत रजेवर गेले असून त्यांच्या आशिर्वादानेच हे सर्व काही होत असल्याचे कर्मचारी बोलत आहेत. शिवाय पदाधिकारीही डोळे मिटून आहेत. तर दुसरीकडे कंत्राटदार कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कामावरून काढण्याची धमकी देत आहे. अशात मात्र कर्मचाऱ्यांचा कुणीच वाली नाही. मात्र वेळीच यावर तोडगा न काढल्यास हे प्रकरण नगर परिषदेवर शेकण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी घेणार का दखलनगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या होत असलेल्या आर्थिक शोषणाबाबत लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह केली होती. मात्र अद्यापही कंत्राटदारावर कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आतातरी जिल्हाधिकारी याची दखल घेणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका