शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

दुसऱ्यांदा सोडले पुजारीटोला धरणाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:51 IST

शहराला पाणी पुरवठा करणाºया डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पहिल्या टप्प्यात २.३३ दलघमी पाणी सोडले होते.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात २.३३ दलघमी पाणी : शहराला दिवसातून एकच वेळ पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाºया डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पहिल्या टप्प्यात २.३३ दलघमी पाणी सोडले होते. मात्र हा पाणीसाठा संपल्याने शनिवारी (दि.११) पुन्हा पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासीयांवरील पाणी टंचाईचे संकट पूर्णपणे दूर झालेले नाही.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. प्रती व्यक्ती १३५ लिटर पाणी याप्रमाणे दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले त्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली.यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन व मजीप्राने ९० कि.मी.अंतरावरील पुजारीटोला धरणातून कालव्याव्दारे पाणी आणून ते डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्यात आले. मागील महिन्यात पहिल्या टप्प्यात पुजारीटोला धरणात २.३३ दलघमी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे हे पाणी महिनाभर पुरले. पण पाणीसाठ्यात पुन्हा घट झाल्यामुळे पुजारीटोला धरणातून शनिवारी (दि.१२) सकाळी पाणी सोडण्यात आले. एक दोन दिवसात हे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचेल.त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. तीन वर्षांपूर्वीच १०० कोटी रुपये खर्चून नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. मात्र ही योजना कार्यान्वीत झाल्याच्या पहिल्याच वर्षीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. त्यामुळे या योजनेवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी सुध्दा पुजारीटोला धरणातून दोनदा पाणी सोडण्यात आले होते. दोन टप्प्यात ५.५३२ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. तर यंदा पहिल्या टप्प्यात २.३३ आणि आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा सोडण्यात आले आहे. जवळपास मागील वर्षी एवढेच पाणी यंदा सुद्धा सोडावे लागणार आहे. अन्यथा शहरात पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यंदा तीनदा सोडावे लागू शकते पाणीमागील वर्षी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यानंतर दोनदा पुजारीटोला धरणाचे पाणी सोडून पाणी टंचाईवर मात करण्यात आली होती. मात्र यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर आहे.त्यामुळे महिनाभराच्या कालावधीत दुसऱ्यांदा पाणी सोडावे लागले आहे. हे पाणी जवळपास १० जून पर्यंत पुरेल. मात्र त्यानंतर पाऊस न झाल्यास पुन्हा तिसऱ्यांदा पुजारीटोला धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी सुध्दा आरक्षित करुन ठेवण्यात आले आहे.टिल्लू पंपांनी वाढविली समस्यामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून शहरवासीयांना आधीच दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे.त्यातही पुरवठा सुरू होताच काही ग्राहक टिल्लू पंप लावून पाणी खेचून घेत आहे.त्यामुळे सर्वांना पाणी मिळण्याची अडचण होत आहे. प्राधिकरणाने टिल्लू पंपधारकांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मागितली आहे. मंजुरी मिळताच कारवाईला सुरूवात करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई