शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

दुसऱ्यांदा सोडले पुजारीटोला धरणाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:51 IST

शहराला पाणी पुरवठा करणाºया डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पहिल्या टप्प्यात २.३३ दलघमी पाणी सोडले होते.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात २.३३ दलघमी पाणी : शहराला दिवसातून एकच वेळ पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाºया डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पहिल्या टप्प्यात २.३३ दलघमी पाणी सोडले होते. मात्र हा पाणीसाठा संपल्याने शनिवारी (दि.११) पुन्हा पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासीयांवरील पाणी टंचाईचे संकट पूर्णपणे दूर झालेले नाही.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. प्रती व्यक्ती १३५ लिटर पाणी याप्रमाणे दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले त्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली.यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन व मजीप्राने ९० कि.मी.अंतरावरील पुजारीटोला धरणातून कालव्याव्दारे पाणी आणून ते डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्यात आले. मागील महिन्यात पहिल्या टप्प्यात पुजारीटोला धरणात २.३३ दलघमी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे हे पाणी महिनाभर पुरले. पण पाणीसाठ्यात पुन्हा घट झाल्यामुळे पुजारीटोला धरणातून शनिवारी (दि.१२) सकाळी पाणी सोडण्यात आले. एक दोन दिवसात हे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचेल.त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. तीन वर्षांपूर्वीच १०० कोटी रुपये खर्चून नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. मात्र ही योजना कार्यान्वीत झाल्याच्या पहिल्याच वर्षीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. त्यामुळे या योजनेवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी सुध्दा पुजारीटोला धरणातून दोनदा पाणी सोडण्यात आले होते. दोन टप्प्यात ५.५३२ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. तर यंदा पहिल्या टप्प्यात २.३३ आणि आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा सोडण्यात आले आहे. जवळपास मागील वर्षी एवढेच पाणी यंदा सुद्धा सोडावे लागणार आहे. अन्यथा शहरात पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यंदा तीनदा सोडावे लागू शकते पाणीमागील वर्षी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यानंतर दोनदा पुजारीटोला धरणाचे पाणी सोडून पाणी टंचाईवर मात करण्यात आली होती. मात्र यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर आहे.त्यामुळे महिनाभराच्या कालावधीत दुसऱ्यांदा पाणी सोडावे लागले आहे. हे पाणी जवळपास १० जून पर्यंत पुरेल. मात्र त्यानंतर पाऊस न झाल्यास पुन्हा तिसऱ्यांदा पुजारीटोला धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी सुध्दा आरक्षित करुन ठेवण्यात आले आहे.टिल्लू पंपांनी वाढविली समस्यामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून शहरवासीयांना आधीच दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे.त्यातही पुरवठा सुरू होताच काही ग्राहक टिल्लू पंप लावून पाणी खेचून घेत आहे.त्यामुळे सर्वांना पाणी मिळण्याची अडचण होत आहे. प्राधिकरणाने टिल्लू पंपधारकांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मागितली आहे. मंजुरी मिळताच कारवाईला सुरूवात करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई