शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदा सोडले पुजारीटोला धरणाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:51 IST

शहराला पाणी पुरवठा करणाºया डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पहिल्या टप्प्यात २.३३ दलघमी पाणी सोडले होते.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात २.३३ दलघमी पाणी : शहराला दिवसातून एकच वेळ पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाºया डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पहिल्या टप्प्यात २.३३ दलघमी पाणी सोडले होते. मात्र हा पाणीसाठा संपल्याने शनिवारी (दि.११) पुन्हा पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासीयांवरील पाणी टंचाईचे संकट पूर्णपणे दूर झालेले नाही.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. प्रती व्यक्ती १३५ लिटर पाणी याप्रमाणे दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले त्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली.यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन व मजीप्राने ९० कि.मी.अंतरावरील पुजारीटोला धरणातून कालव्याव्दारे पाणी आणून ते डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्यात आले. मागील महिन्यात पहिल्या टप्प्यात पुजारीटोला धरणात २.३३ दलघमी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे हे पाणी महिनाभर पुरले. पण पाणीसाठ्यात पुन्हा घट झाल्यामुळे पुजारीटोला धरणातून शनिवारी (दि.१२) सकाळी पाणी सोडण्यात आले. एक दोन दिवसात हे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचेल.त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. तीन वर्षांपूर्वीच १०० कोटी रुपये खर्चून नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. मात्र ही योजना कार्यान्वीत झाल्याच्या पहिल्याच वर्षीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. त्यामुळे या योजनेवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी सुध्दा पुजारीटोला धरणातून दोनदा पाणी सोडण्यात आले होते. दोन टप्प्यात ५.५३२ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. तर यंदा पहिल्या टप्प्यात २.३३ आणि आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा सोडण्यात आले आहे. जवळपास मागील वर्षी एवढेच पाणी यंदा सुद्धा सोडावे लागणार आहे. अन्यथा शहरात पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यंदा तीनदा सोडावे लागू शकते पाणीमागील वर्षी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यानंतर दोनदा पुजारीटोला धरणाचे पाणी सोडून पाणी टंचाईवर मात करण्यात आली होती. मात्र यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर आहे.त्यामुळे महिनाभराच्या कालावधीत दुसऱ्यांदा पाणी सोडावे लागले आहे. हे पाणी जवळपास १० जून पर्यंत पुरेल. मात्र त्यानंतर पाऊस न झाल्यास पुन्हा तिसऱ्यांदा पुजारीटोला धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी सुध्दा आरक्षित करुन ठेवण्यात आले आहे.टिल्लू पंपांनी वाढविली समस्यामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून शहरवासीयांना आधीच दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे.त्यातही पुरवठा सुरू होताच काही ग्राहक टिल्लू पंप लावून पाणी खेचून घेत आहे.त्यामुळे सर्वांना पाणी मिळण्याची अडचण होत आहे. प्राधिकरणाने टिल्लू पंपधारकांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मागितली आहे. मंजुरी मिळताच कारवाईला सुरूवात करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई