शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ग्राहकांनी हक्काबाबत जागरूक असावे

By admin | Updated: March 16, 2015 00:03 IST

समाजातील प्रत्येक व्यक्तीचा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ग्राहक म्हणून संबध येतो. अनेक बनावट व भेसळ वस्तूंपासून तसेच जाहिरातींच्या माध्यमातून त्याची फसवणूक होवू शकते.

गोंदिया : समाजातील प्रत्येक व्यक्तीचा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ग्राहक म्हणून संबध येतो. अनेक बनावट व भेसळ वस्तूंपासून तसेच जाहिरातींच्या माध्यमातून त्याची फसवणूक होवू शकते. अशी फसवणूक झाल्यानंतर न्याय मिळण्यासाठी ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी अभ्यासुवृत्ती जोपासून जागरूक असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी केले. गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात रविवारी (दि.१५) जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी तिरोडाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, गोरेगावच्या तहसीलदार शिल्पा सोनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आळशी पुढे म्हणाले, ग्राहक हा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे. जो वस्तु विकत घेतो तो ग्राहक, वस्तु घेतांना त्याचे वजन योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. वस्तूंवरील किंमतीपेक्षा अधिक दराने वस्तू खरेदी करू नये, जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे सांगितले. ग्राहकांनी अन्याय सहन करू नये असे सांगून आळशी म्हणाले, एका ग्राहकाने दुसऱ्या ग्राहकाला मदत करावी. ग्राहकांची नेहमीच फसवणूक होत असते. त्यासाठी ग्राहकांना जागृत राहण्यासाठी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून महिरे म्हणाले, काळाबाजार, भेसळ, फसवणूक, ग्राहकांवर होणार अन्याय थांबविण्यासाठी ग्राहकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे. काळे म्हणाले, ग्राहकांच्या सरंक्षणाच्या १९८६ चा ग्राहक सरंक्षण कायदा आहे. या कायद्याची आपण अंमलबजावणी केली पाहिजे. जास्तीत जास्त नागरिकांना विशेषत: ग्रामीण भागात या कायद्याची माहिती व्हावी, लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येकाने जागृत असले पाहिजे असे सांगून राजीव गांधी जीवनदायी योजनेचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविकातून तहसीलदार सोनाळे म्हणाल्या, ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ रोजी अस्तित्वात आला. ग्राहकांचे सरंक्षण करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला आहे. त्यासाठी प्रत्येकाने नेहमी जागरूक असायला पाहिजे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये. ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्काबाबत जनजागृती निर्माण करून त्यांचे सरंक्षण करण्यासाठी ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष राठौड म्हणाले, ग्राहकांना त्यांचे मुलभूत अधिकार माहित होणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच अखिल भारतीय ग्राहक पंचायत भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा असतो. परंतु ग्राहकांनी आपले कर्तव्य विसरू नये असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी गोरेगाव येथील भारत गॅस एजन्सी, वजनमाप कार्यालय गोंदिया, जय गायत्री आॅटोमोबाईल्स मुंडीपार यांचे ग्राहक प्रबोधन प्रदर्शन स्टॉल्स लावण्यात आले होते. संचालन अशोक चेपटे व युवराज माने यांनी केले. आभार युवराज बडे यांनी मानले. कार्यक्रमास नायब तहसीलदार के. बी. शर्मा, जि.प. सदस्या सीता रहांगडाले, जिल्हा ग्राहक सरंक्षणाचे चिंतामण बिसेन, गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रदीप जैन व नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी पुरवठा निरीक्षक एस.एम. शुक्ला, अर्चना पारधीकर, एस.एम. मिर्झा, रमीता आगाशे, तिवारी व दलदले यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)