शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

उमऱ्या पद्धतीने भाजीपाला पिकाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:07 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बाक्टी येथील जयगोपाल बनकर या प्रयोगशील शेतकऱ्यांनी धानाचे पीक न घेता एक एकर शेतीमध्ये उमºया पद्धतीने भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. माळी समाजाचे असलेले अल्पभूधारक बनकर हे बारमाही पीक घेतात.

ठळक मुद्देशेतकरी बनकर यांचा प्रयोग : शासकीय योजनांपासून अलिप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बाक्टी येथील जयगोपाल बनकर या प्रयोगशील शेतकऱ्यांनी धानाचे पीक न घेता एक एकर शेतीमध्ये उमऱ्या पद्धतीने भाजीपाला पिकांची लागवड केली आहे.माळी समाजाचे असलेले अल्पभूधारक बनकर हे बारमाही पीक घेतात. पावसाळ्याच्या हंगामात एक एकर शेतीमध्ये चवळीच्या शेंगा, भेंडी, कारली, काकडी, दोडके, दुधी या भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यासाठी जंगलातील खाकऱ्याचा उपयोग न करता उंबरठ्या पद्धतीचा अवलंब करुन भाजीपाला पिकाची लागवड त्यांनी केली आहे. स्वत:च्या शेतात पत्नी, मुलगा व सून यांच्यासह काही मोजक्या मजुरांच्या मदतीने स्वत:च्या प्रयोगशील कतृत्वाने हंगामानुसार विविध पिकांची लागवड जयगोपाल करतात.सध्या चवळी, काकडी, दोडके, दुधी, कारले या पिकांचे वेल जाण्यासाठी मांडव न करता त्यांनी सुत, नॉयलान केनचा वापर करुन बासावर पिकांचे वेल जाण्यासाठी आकर्षक मंडपाच्छादनासारखी व्यवस्था केली आहे.बाक्टी ते सोमलपूर मार्गावर असलेले त्यांचे शेत येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष केंद्रीय करीत आहे. शेतामध्ये पिकविण्यात येणाºया पिकांना घरच्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुळातच आम्ही माळी समाजाचे असल्याने भाजीपाला पीक घेण्यावरच आमचा कल असून त्याची विक्री सुद्धा घरच्या सदस्यांच्या सहाय्याने स्वत: करीत असतो असे ते म्हणाले.बारमाही उत्पादन घेणारे जयगोपाल बनकर यांनी शासकीय योजनांचा आजपावेतो कोणताही लाभ उचलला नसल्याचे आवर्जून सांगितले. अख्या कुटुंब शेतीमध्ये राबून नाविण्यपूर्ण पीके घेण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाच्या योजना पदरी पाडण्यासाठी वारंवार चकरा मारुनही हाती लागत नसल्याचा त्यांनी आपला अनुभव कथन केला. एकंदरीत जयगोपाल बनकर अंगमेहनतीने अल्पश: शेतजमिनीतून बारमाही नावीन्यपूर्व पिक घेऊन कुटुंबाचा चरितार्थ चालविताना दिसतात.

टॅग्स :vegetableभाज्याagricultureशेती