शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमुळे शेतातच वाळली काकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

तालुक्यातील रेंगेपार, खडकी, बाम्हणी, चिखली येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली आहे. सुदैवाने यंदा काकडीचे पीक सुध्दा चांगले आहे. दरवर्षी मार्चपासून काकडीला लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी मोठी मागणी असते. मात्र यंदा कोरोनामुळे राज्यात २५ मार्चपासून लॉकडाऊन आहे.परिणामी उद्योग धंदे, बाजारपेठा सर्वच बंद असून लग्न समारंभ देखील रद्द झाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : लागवडखर्च भरुन निघणे झाले कठीण, आर्थिक मदतीची अपेक्षा

राजेश मुनिश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे. आठवडी बाजार देखील बंद असून लग्न समारंभ व सर्वत्र कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. यामुळे भाजीपाल्यासह इतर शेतमालाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. याचाच फटका तालुक्यातील काकडी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे काकडीची मागणी घटल्याने शेतातच काकडी वाळल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.तालुक्यातील रेंगेपार, खडकी, बाम्हणी, चिखली येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली आहे. सुदैवाने यंदा काकडीचे पीक सुध्दा चांगले आहे. दरवर्षी मार्चपासून काकडीला लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी मोठी मागणी असते. मात्र यंदा कोरोनामुळे राज्यात २५ मार्चपासून लॉकडाऊन आहे.परिणामी उद्योग धंदे, बाजारपेठा सर्वच बंद असून लग्न समारंभ देखील रद्द झाले आहे. त्यामुळे काकडीला बाजारपेठेत मागणीच नसल्याचे चित्र आहे. याचा फटका मात्र काकडी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. रेंगेपार येथील शेतकरी लहू डोंगरवार यांच्या पाच एकर शेतीत काकडीची लागवड करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगले उत्पन्न घेऊ, या आशेवर असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे शेतातील काकडी शेतात राहिली.मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी न तोडल्याने ती शेतातच वाळली.त्यामुळे त्यांनी काकडी लागवडीसाठी केलेला खर्च देखील वाया गेला. त्यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. आता काहीच उत्पन्न हाती येणार नसल्याने बँकेचे कर्ज आणि उधार उसणवारी घेतलेल्या पैशाची परतफेड कुठून करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. तर शेतात बहरुन आलेले काकडीचे पीक पूर्णपणे मातीमोल होत असल्याचे शेतकऱ्यांना पाहयला मिळत असल्याने त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू तरळत आहेत. काकडीचे उत्पादन घेण्यासाठी वर्षभर घेतलेली मेहनत सुध्दा पूर्णपणे व्यर्थ गेली आहे.शासनाकडून मदतीची अपेक्षाकोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भाजीपाला, काकडीसह इतर शेतमालाला मागणीच नसल्याने शेतकऱ्यांना ते फेकून द्यावे लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने शेतकºयांची दखल घेवून त्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.गेल्यावर्षी मी पाच एकर शेतीत काकडीची लागवड करुन पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न घेतले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे काकडी मागणी नसल्याने शेतातच काकडी सडत आणि वाळत चालली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.- लहू डोंगरवार, शेतकरी रेंगेपार..................................................रेंगेपार परिसरात बाराशे एकर शेतीत काकडी, टरबूज ,खरभूज, दोडका, कारली, ऊस आदी पिकांची लागवड केली जाते. माझ्याकडे सध्या ३६ एकरात ऊस व एक एकरात काकडी पिकाची लागवड केली आहे. मात्र मागणी नसल्याने हा माल शेतातच पडून आहे.- प्रभू डोंगरवार, प्रगतीशील शेतकरी रेंगेपार.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती