शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

लॉकडाउनमुळे शेतातच वाळली काकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

तालुक्यातील रेंगेपार, खडकी, बाम्हणी, चिखली येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली आहे. सुदैवाने यंदा काकडीचे पीक सुध्दा चांगले आहे. दरवर्षी मार्चपासून काकडीला लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी मोठी मागणी असते. मात्र यंदा कोरोनामुळे राज्यात २५ मार्चपासून लॉकडाऊन आहे.परिणामी उद्योग धंदे, बाजारपेठा सर्वच बंद असून लग्न समारंभ देखील रद्द झाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : लागवडखर्च भरुन निघणे झाले कठीण, आर्थिक मदतीची अपेक्षा

राजेश मुनिश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे. आठवडी बाजार देखील बंद असून लग्न समारंभ व सर्वत्र कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. यामुळे भाजीपाल्यासह इतर शेतमालाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. याचाच फटका तालुक्यातील काकडी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे काकडीची मागणी घटल्याने शेतातच काकडी वाळल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.तालुक्यातील रेंगेपार, खडकी, बाम्हणी, चिखली येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली आहे. सुदैवाने यंदा काकडीचे पीक सुध्दा चांगले आहे. दरवर्षी मार्चपासून काकडीला लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी मोठी मागणी असते. मात्र यंदा कोरोनामुळे राज्यात २५ मार्चपासून लॉकडाऊन आहे.परिणामी उद्योग धंदे, बाजारपेठा सर्वच बंद असून लग्न समारंभ देखील रद्द झाले आहे. त्यामुळे काकडीला बाजारपेठेत मागणीच नसल्याचे चित्र आहे. याचा फटका मात्र काकडी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. रेंगेपार येथील शेतकरी लहू डोंगरवार यांच्या पाच एकर शेतीत काकडीची लागवड करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगले उत्पन्न घेऊ, या आशेवर असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे शेतातील काकडी शेतात राहिली.मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी न तोडल्याने ती शेतातच वाळली.त्यामुळे त्यांनी काकडी लागवडीसाठी केलेला खर्च देखील वाया गेला. त्यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. आता काहीच उत्पन्न हाती येणार नसल्याने बँकेचे कर्ज आणि उधार उसणवारी घेतलेल्या पैशाची परतफेड कुठून करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. तर शेतात बहरुन आलेले काकडीचे पीक पूर्णपणे मातीमोल होत असल्याचे शेतकऱ्यांना पाहयला मिळत असल्याने त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू तरळत आहेत. काकडीचे उत्पादन घेण्यासाठी वर्षभर घेतलेली मेहनत सुध्दा पूर्णपणे व्यर्थ गेली आहे.शासनाकडून मदतीची अपेक्षाकोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भाजीपाला, काकडीसह इतर शेतमालाला मागणीच नसल्याने शेतकऱ्यांना ते फेकून द्यावे लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने शेतकºयांची दखल घेवून त्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.गेल्यावर्षी मी पाच एकर शेतीत काकडीची लागवड करुन पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न घेतले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे काकडी मागणी नसल्याने शेतातच काकडी सडत आणि वाळत चालली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.- लहू डोंगरवार, शेतकरी रेंगेपार..................................................रेंगेपार परिसरात बाराशे एकर शेतीत काकडी, टरबूज ,खरभूज, दोडका, कारली, ऊस आदी पिकांची लागवड केली जाते. माझ्याकडे सध्या ३६ एकरात ऊस व एक एकरात काकडी पिकाची लागवड केली आहे. मात्र मागणी नसल्याने हा माल शेतातच पडून आहे.- प्रभू डोंगरवार, प्रगतीशील शेतकरी रेंगेपार.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती