शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पस्तिशी ओलांडली, तरी नवरी मिळेना नवऱ्याला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 17:39 IST

कोरोनाच्या काळात अनेक तरुण बेरोजगार झाले. नोकरीसाठी जागाच निघाल्या नाहीत. बेरोजगारांची फौज तयार झाल्याने बेरोजगार मुलांना मुलगी कशी देणार हा प्रश्न मुलीचे आई-वडील करीत आहेत.

ठळक मुद्देरेशीमगाठी अडचणीत : मुलांना जॉब नसल्याने येतेय नैराश्य

गोंदिया : कमविणारा मुलगा, देखणा मुलगा, शहरात राहणारा आणि छोटे कुटुंब असलेला मुलगा आजघडीला मुलींना हवा आहे. आधी शिक्षण घेऊन नोकरीच्या नादात वेळ घालविणाऱ्या नवऱ्या मुलाने पस्तिशी ओलांडली तरी त्याला स्वत:च्याच जेवणाचे वांदे आहेत. अशा मुलांना नवरी मिळत नाही.

लग्नगाठी मुलाची आर्थिक मिळकत पाहूनच बांधल्या जातात. परंतु कोरोनाच्या काळात अनेक तरुण बेरोजगार झाले. नोकरीसाठी जागाच निघाल्या नाहीत. बेरोजगारांची फौज तयार झाल्याने बेरोजगार मुलांना मुलगी कशी देणार हा प्रश्न मुलीचे आई-वडील करीत आहेत.

पुरुषप्रधान संस्कृतीमुळे भारतात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान, शिक्षण व रोजगाराच्या समान संधीमुळे मुलांप्रमाणेच मुलीदेखील उच्चशिक्षित आणि कमावत्या झाल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होत नाही. त्या जॉबच्या शोधात जातात. कोरोनाच्या काळात मुलांना जॉब नसल्याने त्यांचे वय वाढत आहे. पस्तिशी ओलांडलेली मुले लग्न करण्यासाठी नवरीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतात. परंतु त्यांना मुली द्यायला मुलीचे वडील तयार नाहीत.

एकत्रित कुटुंबामध्ये नको गं बाई

आजघडीला संयुक्त कुटुंब पद्धती नाहीशीच झाल्यासारखी आहे. छोटे कुटुंब मुली पसंत करीत आहेत. नवरा शहरातील आणि कुटुंब छोटे किंवा त्याहूनही पुढे म्हणजे मी आणि माझा नवराच नोकरीच्या ठिकाणी राहू अशी समज अनेक मुलींची व तिच्या पालकांची असल्याने लग्न गाठी होत नाहीत.

लग्न लांबले कारण...

- मुलगा सुंदर, सुशील, नोकरीवाला असावा असे मुलींना वाटते. तर मुलाला आधी चांगली नोकरी किंवा जॉब असावा असे वाटते.

-पाच आकडी पगार असलेला नवराच बरा अशी मुलींची समज झाल्याने वयात येणाऱ्या मुलाला नोकरी अभावी मुली मिळत नाही.

शेतकरी मुलाचे तर आणखीणच कठीण

शेती करणाऱ्या मुलाला कुणीच मुलगी द्यायला तयार नाही. वावर आहे तर पाॅवर आहे असे फक्त पोकळच म्हटले जाते. शेतीत राबण्याची कोणत्याही मुलीची इच्छा नसल्यामुळे शेती करणाऱ्या मुलाला मुलगी मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात.

तरुण काय म्हणतात..

१) आम्ही शिक्षण घेतले. परंतु सरकारने रिक्त जागा भरल्याच नाहीत. त्यामुळे नोकरी मिळाली नाही. वाढते वय पाहून व्यवसायाकडे वळलो. परंतु व्यवसायाकडे पाहण्याचा नवऱ्या मुलीच्या वडिलाचा दृष्टीकोन हीन आहे. त्यामुळे नोकरीच्या नादात अडकलेल्या मुलांची वये वाढत आहेत. परंतु हे समाजस्वास्थासाठी चूक आहे.

सचिन तलमले, तरुण, पदमपूर

२) मुलीचे शिक्षण नसतानाही प्रत्येक मुलगी नोकरीवालाच नवरा मिळावा अशी अपेक्षा करते. आपल्या अपेक्षेनुरूप नवरा शाेधला तर ते योग्य. परंतु मुलीचे शिक्षण, नोकरी नसताना नुसता नोकरीवालाच मुलगा हवा ही अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे. यातून समाजाची घडली विस्कटत आहे.

- हिमालय राऊत, पोवारीटोला (पदमपूर)

तरुणी काय म्हणतात?

१) आम्ही शिक्षण घेतले. ज्याच्या घरी जाणार तो व्यक्ती कमविता तरी असावा. त्याने आपल्याला सुखात ठेवावे ही प्रत्येक मुलीची अपेक्षा असते. ही मुलींची अपेक्षा कुठे चूक आहे. मुलीच्या वडिलांनी कवडीही कमवित नसणाऱ्या मुलाच्या हातात मुलगी द्यावी काय?

- एक तरुणी, गोंदिया.

२) आई-वडील लहानपणापासून मुलीचा सांभाळ करून तिचे शिक्षण करून विवाहयोग्य झाल्यावर योग्य वर शोधण्याचा प्रयत्न करतात. ते प्रत्येक मुलीच्या आईवडिलांनी करणे योग्यच आहे. परंतु न कमविणाऱ्या मुलाच्या हातात कोणते वडील आपल्या मुलीला सोपवून आपलाच त्रास वाढवून घेतील.

- एक तरुणी, सडक-अर्जुनी

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिक