शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

टोळधाड आटोक्यात आल्याने संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात सर्वाधिक टोळधाडीचा प्रभाव दिसून आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. लगतच्या भंडारा जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण झाल्याने ती गोंदिया जिल्ह्यात केव्हाही दाखल होण्याची शक्यत लक्षात घेत कृषी विभागाने कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली होती.

ठळक मुद्देकृषी विभागाने केल्या प्रतिबंधात्मक उपयायोजना : शेतकऱ्यांना दिलासा, तीन गावात फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा जिल्ह्यातून पाच सहा दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेल्या टोळधाडीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने याची वेळीच दखल घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तीन गावांमध्ये फवारणी केल्याने जिल्ह्यातून टोळधाड आटोक्यात आली आहे. परिणामी खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर आलेले टोळधाडीचे संकट तूर्तास तरी टळले आहे.जिल्ह्यातील शेतकरी सध्या खरीप हंगामातील पेरणी आणि मशागतीच्या कामात व्यस्त आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे.त्या शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले आहे. तर काही शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र पाच दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातून टोळधाडीने गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केला.तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात सर्वाधिक टोळधाडीचा प्रभाव दिसून आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. लगतच्या भंडारा जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण झाल्याने ती गोंदिया जिल्ह्यात केव्हाही दाखल होण्याची शक्यत लक्षात घेत कृषी विभागाने कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली होती.तसेच टोळधाड जिल्ह्यात दाखल झाल्यास त्यावर वेळीच उपाययोजना करता याव्यात यासाठी किटकनाशक फवारणी आणि इतर उपाययोजना पूर्वीच करुन ठेवल्या होत्या. त्यामुळे टोळधाड तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात दाखल झाल्यानंतर ड्रोनव्दारे झाडांवर किटकनाशकांची फवारणी करुन टोळधाडीला जिल्ह्यातून परतावून लावण्यात कृषी विभागाला यश आले आहे.सध्या स्थितीत टोळधाड जिल्ह्यातून पूर्णपणे आटोक्यात आली आहे.टोळधाडीने मध्यप्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील मोठे संकट टळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.पऱ्ह्यांवरील संकट झाले दूरजिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी खरिपासाठी धानाची पºहे टाकले होते. काही शेतकºयांच्या पºहांची चांगली वाढ सुध्दा झाली आहे.मात्र याच दरम्यान टोळधाडीने आक्रमण केल्याने या पऱ्ह्यांवर संकट निर्माण झाले होते. मात्र वेळीच करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि टोळधाडीने मध्यप्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण केल्याने धानाच्या पºहांवरील संकट टळले आहे.जिल्ह्यातून टोळधाड आतापूर्ण आटोक्यात आली असून टोळधाडीच्या थव्यांनी मध्यप्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे. टोळधाडीचे पुन्हा आक्रमण झाल्यास वेळीच उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे.- गणेश घोरपडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती