शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
3
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
4
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
5
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
8
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
9
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
10
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
11
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
12
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
13
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
14
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
15
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
16
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
17
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
18
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
19
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
20
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
Daily Top 2Weekly Top 5

टोळधाड आटोक्यात आल्याने संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात सर्वाधिक टोळधाडीचा प्रभाव दिसून आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. लगतच्या भंडारा जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण झाल्याने ती गोंदिया जिल्ह्यात केव्हाही दाखल होण्याची शक्यत लक्षात घेत कृषी विभागाने कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली होती.

ठळक मुद्देकृषी विभागाने केल्या प्रतिबंधात्मक उपयायोजना : शेतकऱ्यांना दिलासा, तीन गावात फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा जिल्ह्यातून पाच सहा दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेल्या टोळधाडीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने याची वेळीच दखल घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तीन गावांमध्ये फवारणी केल्याने जिल्ह्यातून टोळधाड आटोक्यात आली आहे. परिणामी खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर आलेले टोळधाडीचे संकट तूर्तास तरी टळले आहे.जिल्ह्यातील शेतकरी सध्या खरीप हंगामातील पेरणी आणि मशागतीच्या कामात व्यस्त आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे.त्या शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले आहे. तर काही शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र पाच दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातून टोळधाडीने गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केला.तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात सर्वाधिक टोळधाडीचा प्रभाव दिसून आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. लगतच्या भंडारा जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण झाल्याने ती गोंदिया जिल्ह्यात केव्हाही दाखल होण्याची शक्यत लक्षात घेत कृषी विभागाने कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली होती.तसेच टोळधाड जिल्ह्यात दाखल झाल्यास त्यावर वेळीच उपाययोजना करता याव्यात यासाठी किटकनाशक फवारणी आणि इतर उपाययोजना पूर्वीच करुन ठेवल्या होत्या. त्यामुळे टोळधाड तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात दाखल झाल्यानंतर ड्रोनव्दारे झाडांवर किटकनाशकांची फवारणी करुन टोळधाडीला जिल्ह्यातून परतावून लावण्यात कृषी विभागाला यश आले आहे.सध्या स्थितीत टोळधाड जिल्ह्यातून पूर्णपणे आटोक्यात आली आहे.टोळधाडीने मध्यप्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील मोठे संकट टळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.पऱ्ह्यांवरील संकट झाले दूरजिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी खरिपासाठी धानाची पºहे टाकले होते. काही शेतकºयांच्या पºहांची चांगली वाढ सुध्दा झाली आहे.मात्र याच दरम्यान टोळधाडीने आक्रमण केल्याने या पऱ्ह्यांवर संकट निर्माण झाले होते. मात्र वेळीच करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि टोळधाडीने मध्यप्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण केल्याने धानाच्या पºहांवरील संकट टळले आहे.जिल्ह्यातून टोळधाड आतापूर्ण आटोक्यात आली असून टोळधाडीच्या थव्यांनी मध्यप्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे. टोळधाडीचे पुन्हा आक्रमण झाल्यास वेळीच उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे.- गणेश घोरपडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती