शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या पोळा सणावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोळा घरीच साजरा करून बैलांना पोळ्यात घेवून जाऊ नका आणि बैलांची पूजा घरीच करायची आहे. या आदेशाने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी जून व जुलै महिन्यात रोवणीचे काम आटोपून श्रावण महिन्याच्या शेवटी पोळा मोठ्या थाटात शेतकरी साजरा करतात. बैलांना सजवून त्यांचे मालक आपली जोडी घेवून तोरणात जातात.

ठळक मुद्देसाधेपणाने साजरा करण्याचे आदेश : शेतकऱ्यांत निरूत्साहाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा बुजरुक : शेतकऱ्यांचा साथीदार बैलांच्या पोळा सणावर सातत्याने कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशी अनेक संकटे पाहावयास मिळतात. तर यावर्षी कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे पोळावर संकट आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोळा घरीच साजरा करून बैलांना पोळ्यात घेवून जाऊ नका आणि बैलांची पूजा घरीच करायची आहे. या आदेशाने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी जून व जुलै महिन्यात रोवणीचे काम आटोपून श्रावण महिन्याच्या शेवटी पोळा मोठ्या थाटात शेतकरी साजरा करतात. बैलांना सजवून त्यांचे मालक आपली जोडी घेवून तोरणात जातात.गावच्या चौकात गावातील सर्व शेतकरी व ग्रामस्थ एकत्र येवून एकमेकांना आलींगन देत गळा भेट घेतात. बैलांची पूजा व झळत्या म्हणून बैलांचे लग्न लागायचे. परंतु कोरोनामुळे पोळावर सुद्धा विरजन पडले. कोरोणामुळे शेतकऱ्यांचे व ग्रामीण भागातील जनतेचे मोठे नुकसान झाले. रोजगार संपले व हाताला काय नाही तर पैसा कुठून येणार.पोळानिमित्त बाजारपेठा सजल्या असल्या तरिही शेतकरी रिकामा असल्याने आपल्या सर्जा-राजासाठी काही घेऊही शकत नाही. बाजारातील साहित्ये विक्रेते सुद्धा चिंतेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.यंदा सामूहिक पोळा भरणार नाही यामुळेही शेतकरी निरुत्साही आहे. कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट उपसणाºया सर्जा-राजाचा पोळा यंदा मंगळवारी (दि.१८) आहे. वर्षभर राबराब राबणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस शेतकऱ्यांसाठी खुप महत्वाचा असतो.एक दिवस आधी बैलांना आंघोळ करुन त्याची पूजा करुन पिठाचे लाडू खायला दिले जाते त्याला मोहबैल असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी बैलांना सजवून त्याची ओवाळणी करुन मनोभावे पूजा केली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला जसा फटका बसला तसाच किंबहूना सर्वाधिक फटकाही शेतीला बसला आहे. कोरोनामुळे सर्वांचेच अर्थचक्र बिघडले आहे. त्यात शेतकरी देखील अपवाद नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी