शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

२४४ विहिरींचे बांधकाम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2017 01:40 IST

शेतीला जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ११ हजार सिंचन विहिरी हा

मागेल त्याला विहीर : ३०० लाभार्थ्यांची निवड, ९२ विहिरींचे खोदकाम पूर्ण, १२८ विहिरींना पुरेसे पाणी अमरचंद ठवरे । लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : शेतीला जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ११ हजार सिंचन विहिरी हा धडक कार्यक्रम आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहे. मागेल त्याला सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्याला ३०० सिंचन विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील २४४ विहिरींचे बांधकाम प्रगतीपथावर असून २२ विहिरींचे बांधकाम होवून १५० फूट बोअरसुद्धा मारण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या खरिपाच्या हंगामात भात शेतीच्या सिंचनासाठी विहिरींचा उपयोग करण्याची संधी मिळणार आहे. सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत शेतामध्ये विहिरींच्या माध्यमातून मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध झाल्याने लाभार्थी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वारंवारची नापिकी, कर्जबाजारी व आत्महत्याचे प्रकार वाढल्याने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ११ हजार सिंचन विहिरी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नामुळे गोंदिया जिल्ह्याला सुद्धा मागेल त्याला सिंचन विहीर या धडक कार्यक्रमाचा लाभ मिळाला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उपविभागीय अधिकारी लघू सिंचन जि.प. उपविभाग कार्यालयाच्या वतीने आॅनलाईन पद्धतीने तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. गरजू लाभार्थी शेतकऱ्यांकडून सिंचन विहिरीसाठी चांगलाच प्रतिसाद मिळाला. सदर सिंचन विहिरींसाठी शासनाकडून निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यास २ लाख ५० हजारांचे अनुदान त्यांच्या बँकेत बचत खात्यावर टप्या टप्याने वळते केले जाते. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. विहिरीमध्ये जलसाठा मुबलक रहावा म्हणून १५० फुटांचे बोअर विहिरीमध्ये मारणे आवश्यक केले आहे. तालुक्यातील निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी करारनामा करुन २४४ विहिरींच्या बांधकामाला सुरुवात झाल्याचे उपविभागीय अधिकारी (लपाजिप) घरतकर यांनी सांगितले. खोदकाम सुरू करण्यात आलेल्या १२८ विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी लागल्याचे सांगण्यात आले. सध्या ९२ विहिरींचे खोदकाम जवळपास पूर्ण झाले आहे. आजघडीला २२ विहिरी बोअरसह पूर्ण बांधकाम झाले. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी पहिल्या प्रथम उसणेउधारी करून विहिरीचे बांधकाम शेवटच्या टप्यापर्यंत नेले आहे. ३ कोटी ३ लाख १४ हजारांचे देयके मंजूर करुन लघु पाटबंधारे विभागाने पंचायत समितीकडे पाठविले. उर्वरित अनुदानाची वरिष्ठांकडे मागणी केल्याचे समजते. निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप बांधकामाच्या टप्प्यानुसार त्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर सरळ जमा करणे असा निकष असतानासुद्धा पंचायत समितीने काही शेतकऱ्यांना धनादेश देण्याची प्रथा अवलंबविल्याचे बोलल्या जाते. कित्येकांना धनादेशासाठी वारंवार पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याचे चित्र पहायला मिळते. परस्पर खात्यावर वळते करण्यास अडचण कोणती, हेच कळायला मार्ग नाही. अनेक गावे जलसिंचनापासून वंचित ४तालुक्यात इटियाडोह जलाशय, नवेगावबांध यासारखे मोठे जलाशय असले तरी तालुक्यातील कित्येक गावे जलसिंचनाच्या सोयीपासून आजही वंचित आहेत. एक दोन पाण्याच्या अभावाने हाती आलेल्या पिकापासून शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे. तालुक्यात मोठे धरण असतानाही हजारो शेतकरी पाण्यापासून मुकले जावून ‘सुजलाम सुफलाम’चे स्वप्न हवेतच विरत असल्याचे चित्र तालुक्यातील बहुतेक ठिकाणी दिसत आहे. ३.३७ कोटींचे अनुदान प्राप्त ४११ हजार सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुक्याचा समावेश झाल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळून जलसिंचनाची सोय उपलब्ध करण्याची संधी मिळाली. संपूर्ण तालुक्यात ३०० शेतकरी लाभार्थ्यांची सिंचन विहिरीसाठी निवड करण्यात आली. विहिरींच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या निधीपैकी ३ कोटी ३७ लाख ५० हजार रूपयांचे अनुदान पंचायत समितीला प्राप्त झाले आहे.