शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयातून मिळते सांत्वना

By admin | Updated: September 1, 2016 00:25 IST

जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रचिलत कायद्यांमध्ये वेळोवेळी परिवर्तन केल्या जाते.

न्यायाधीश गिरटकर यांचे प्रतिपादन : कायदेविषयक साक्षरता शिबीरगोंदिया : जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रचिलत कायद्यांमध्ये वेळोवेळी परिवर्तन केल्या जाते. कायद्यातील होणारे परिवर्तन सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचणे गरजेचे आहे. न्यायालयात फक्त शिक्षाच दिली जात नाही तर फौजदारी प्रक्रि या संहितेच्या कलम ३५७ अंतर्गत पिडित व्यक्ती किंवा बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सांत्वनेच्या स्वरूपात नुकसानभरपाई दिली जाते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.जी. गिरटकर यांनी केले. पोलिस मुख्यालय कारंजा येथे नुकतेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया ,जिल्हा वकील संघ आणि पोलिस विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक साक्षरता शिबिरात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर, सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. पी.एस.आगाशे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. टी.बी.कटरे, उपशिक्षणाधिकारी राजन घरडे उपस्थित होते. न्या. गिरटकर पुढे म्हणाले, प्रत्येक सुजाण नागरिकांनी कायद्याचे प्राथमिक ज्ञान ठेवणे गरजेचे आहे. दुचाकी,चारचाकी वाहने, वापरणा-या व्यक्तींनी त्यांचा वाहनाचा विमा काढावा अन्यथा त्यांच्या वाहनाने अपघात झाला व त्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पिडी व्यक्तीला देण्यात येणारी नुकसान भरपाई ही वाहन मालकाला द्यावी लागते. म्हणून कायदेविषयक ज्ञान असणे आवश्यक आहे. विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समित्यांना विविध योजना राबविण्यात येत आहेत. मोफत विधी सेवा व सहाय्य योजनेंतर्गत न्यायालयात प्रकरण दाखल करण्याकरीता प्रकरणासंबंधीत सर्व खर्च देणे, प्रकरणात वकीलांची मोफत नेमणूक करणे, प्रत्येक व्यक्तीला विधी सेवा मिळण्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विधी दक्षता व सहाय्यक केंद्रामार्फत मोफत विधी सेवा पुरविणे, कोणत्याही नागरिकांना कायदेविषयक अडचणी येत असतील तर पॅरा-लिगल व्हॉलेटीयर्स मार्फत त्यांना मदत करणे, लोकअदालत मध्यस्थी योजना राबविण्यात येत आहे. नागरिक, महिला,दुर्बल घटकातील व्यक्ति, बालक, व पिडितांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. डॉ. भूजबळ म्हणाले, सर्व शासकिय विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, सुजाण नागरिक, या सर्वानी योग्य समन्वय साधल्यास कोणतीही व्यक्ती न्यायापासून वंचित राहणार नाही. प्रा. सविता बेदरकर म्हणाल्या, ज्या महिलांना कायद्याचे ज्ञान नसते त्या महिलांवर अत्याचार होतात म्हणून महिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव असणे व महिला संरक्षक विषयक कायद्यांचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचे सांगितले. अ‍ॅड. आगाशे यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांनी कार्यान्वित केलेल्या ७ योजनांबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाला न्या. सागर इंगळे, न्या.खंडारे, न्या.वासंती माहुले, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते. पोलिस निरीक्षक दिनेश शुक्ला, पोलिस उपनिरिक्षक कुथे, पोलिस अधिकारी व कर्मचारी, पोलिस मित्र पॅरा-लिगल व्हालेंटिअर्स मोठया संख्येत उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा विकल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. टी.बी.कटरे, संचालन अ‍ॅड. शबाना अंसारी तर आभार बरकते यांनी मानले.यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणचे आर.जी.बोरिकर, एम. पी. पटले, शिवदास थोरात, पोलिस कल्याण शाखेचे राज वैद्य, सुनिल मेश्राम,सागर घोडे, पंकज पांडे, राजेश पटले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)