शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयातून मिळते सांत्वना

By admin | Updated: September 1, 2016 00:25 IST

जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रचिलत कायद्यांमध्ये वेळोवेळी परिवर्तन केल्या जाते.

न्यायाधीश गिरटकर यांचे प्रतिपादन : कायदेविषयक साक्षरता शिबीरगोंदिया : जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रचिलत कायद्यांमध्ये वेळोवेळी परिवर्तन केल्या जाते. कायद्यातील होणारे परिवर्तन सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचणे गरजेचे आहे. न्यायालयात फक्त शिक्षाच दिली जात नाही तर फौजदारी प्रक्रि या संहितेच्या कलम ३५७ अंतर्गत पिडित व्यक्ती किंवा बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सांत्वनेच्या स्वरूपात नुकसानभरपाई दिली जाते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.जी. गिरटकर यांनी केले. पोलिस मुख्यालय कारंजा येथे नुकतेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया ,जिल्हा वकील संघ आणि पोलिस विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक साक्षरता शिबिरात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर, सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. पी.एस.आगाशे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. टी.बी.कटरे, उपशिक्षणाधिकारी राजन घरडे उपस्थित होते. न्या. गिरटकर पुढे म्हणाले, प्रत्येक सुजाण नागरिकांनी कायद्याचे प्राथमिक ज्ञान ठेवणे गरजेचे आहे. दुचाकी,चारचाकी वाहने, वापरणा-या व्यक्तींनी त्यांचा वाहनाचा विमा काढावा अन्यथा त्यांच्या वाहनाने अपघात झाला व त्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पिडी व्यक्तीला देण्यात येणारी नुकसान भरपाई ही वाहन मालकाला द्यावी लागते. म्हणून कायदेविषयक ज्ञान असणे आवश्यक आहे. विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समित्यांना विविध योजना राबविण्यात येत आहेत. मोफत विधी सेवा व सहाय्य योजनेंतर्गत न्यायालयात प्रकरण दाखल करण्याकरीता प्रकरणासंबंधीत सर्व खर्च देणे, प्रकरणात वकीलांची मोफत नेमणूक करणे, प्रत्येक व्यक्तीला विधी सेवा मिळण्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विधी दक्षता व सहाय्यक केंद्रामार्फत मोफत विधी सेवा पुरविणे, कोणत्याही नागरिकांना कायदेविषयक अडचणी येत असतील तर पॅरा-लिगल व्हॉलेटीयर्स मार्फत त्यांना मदत करणे, लोकअदालत मध्यस्थी योजना राबविण्यात येत आहे. नागरिक, महिला,दुर्बल घटकातील व्यक्ति, बालक, व पिडितांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. डॉ. भूजबळ म्हणाले, सर्व शासकिय विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, सुजाण नागरिक, या सर्वानी योग्य समन्वय साधल्यास कोणतीही व्यक्ती न्यायापासून वंचित राहणार नाही. प्रा. सविता बेदरकर म्हणाल्या, ज्या महिलांना कायद्याचे ज्ञान नसते त्या महिलांवर अत्याचार होतात म्हणून महिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव असणे व महिला संरक्षक विषयक कायद्यांचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचे सांगितले. अ‍ॅड. आगाशे यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांनी कार्यान्वित केलेल्या ७ योजनांबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाला न्या. सागर इंगळे, न्या.खंडारे, न्या.वासंती माहुले, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते. पोलिस निरीक्षक दिनेश शुक्ला, पोलिस उपनिरिक्षक कुथे, पोलिस अधिकारी व कर्मचारी, पोलिस मित्र पॅरा-लिगल व्हालेंटिअर्स मोठया संख्येत उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा विकल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. टी.बी.कटरे, संचालन अ‍ॅड. शबाना अंसारी तर आभार बरकते यांनी मानले.यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणचे आर.जी.बोरिकर, एम. पी. पटले, शिवदास थोरात, पोलिस कल्याण शाखेचे राज वैद्य, सुनिल मेश्राम,सागर घोडे, पंकज पांडे, राजेश पटले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)