शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

काँग्रेसच देऊ शकते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 9:34 PM

राज्यातील विद्यमान भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा करुन दोन वर्षांचा काळ लोटला.मात्र अद्यापही पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. भाजप सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल । मोरवाही येथे प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील विद्यमान भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा करुन दोन वर्षांचा काळ लोटला.मात्र अद्यापही पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. भाजप सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केवळ काँग्रेस सरकारच देऊ शकते असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.आसोली जि.प.पोटनिवडणुकीकरिता आघाडीचे उमेदवार सुरजलाल महारवाडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी मोरवाही येथे आयोजित प्रचारसभे ते बोलत होते. या वेळी जि.प.सभापती रमेश अंबुले, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, हरिभाऊ कावळे, बंटी भेलावे, सरपंच उर्मिला महारवाडे, भोजराज चुटे, अनिता शिवणकर, रामदास गणविर, सुरेश चुटे, प्रतिमा कांबळे, सविता कावडे, सुरेखा डोंगरे, छाया चुटे, छाया शिवणकर, विजय पाथोडे, शिवशंकर हुमने, भुमेश चौरे, अनंतराम पाथोडे, गणपत पाथोडे, देवानंद कावडे, महेंद्र कोरे सेवंतबाई हेमने, शाम हेमने, कातांबाई भांडारकर, धनलाल गौतम, विनोद ठाकूर, योगराज रिनाईत, मोरोती हेमने, इंदूबाई ठाकूर, कविता कावळे उपस्थित होते.आ.अग्रवाल म्हणाले गोंदिया जि.प.आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. आसोली जि.प.क्षेत्रातून काँग्रेसचे शेखर पटले हे निवडून आले होते. मात्र त्यांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक होत आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादाच्या मुद्दावर जनतेची दिशाभूल करुन सत्ता स्थापन केली. मात्र अद्यापही २०१७ मधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. २० हजाराहून अधिक घरकुल लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे भाजप सरकारने दिलेली सर्व आश्वासन फोल ठरत आहेत. जनतेने अशा विश्वासघाती सरकारपासून सावध राहण्याचे आवाहन केले. काँग्रेस सरकारच्या काळात सर्वाधिक विकास कामे झाले असे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल