शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

भूजल अधिनियमातील अटींचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:41 IST

शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदून भूगर्भातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. याचा परिणामी भूगर्भातील संरक्षीत पाणी साठ्यावर होत आहे. त्यामुळे भावी पिढीसाठी पाणी शिल्लक राहणार की यावर शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे याला प्रतिबंध लावण्यासाठी राज्य शासनाने भूजल अधिनियम लागू केला आहे. मात्र यातील काही जाचक अटींचा फटका शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देगंगाधर परशुरामकर : कायद्यावर आक्षेप घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदून भूगर्भातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. याचा परिणामी भूगर्भातील संरक्षीत पाणी साठ्यावर होत आहे. त्यामुळे भावी पिढीसाठी पाणी शिल्लक राहणार की यावर शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे याला प्रतिबंध लावण्यासाठी राज्य शासनाने भूजल अधिनियम लागू केला आहे. मात्र यातील काही जाचक अटींचा फटका शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने २५ जुलै २०१८ ला असाधारण भाग ४ ब मध्ये महाराष्ट्र भुजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियमाद्वारे अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसुचनेवर १ सप्टेंबर २०१८ पर्यंत नागरीकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यावर १५ आॅगस्टला होणाºया ग्रामसभेत विचार विनिमय करुन मुदतीचे आत सूचना व आक्षेप नोंदवावे. सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठवावेत. असे जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.राज्यात दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्याची झळ पिण्याच्या पाण्यापासून तर शेतीला लागणाऱ्या सिंचनालाही बसत आहे. पावसाचे प्रमाण कमी होत असले तरी विंधन विहिरीच्या माध्यमातून व इतर मार्गाने पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यावर काही बंधन आणण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलली आहेत. महाराष्ट्र भुजल अधिनियम २००९ मध्ये काही सुधारणा करुन नागरिकांनी त्यावर सूचना किंवा आक्षेप द्यावेत, असे २५ जुलैच्या अधिसूचनेत म्हटले आहे. राज्य शासनाचे २५ जुलैला प्रसिद्ध केलेल्या अधिसुचनेतील काही कलमे शेतकऱ्यांवर व सामान्य जनतेवर अन्याय करणारे आहेत. या अधिसुचनेतील कलमानुसार विंधन विहिरी खोदल्यावर बंधन येणार आहे. मात्र त्याला परवानगीसाठी लागणारी प्रक्रिया फारच किचकट आहे. तर दंडाची प्रक्रिया नागरिकांना अडचणीत आणणारी आहे. विद्यमान विहिरीची नोंदणी, पिण्याच्या पाण्यासाठी खोल विहिरीसाठी परवानगी, अधिसूचित क्षेत्रात जास्त पाणी लागणाºया पिकांची लागवडीसाठी परवानगी, यासारखे नियम असल्याचे कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे या अधिनियमाचा मसुदा भूजल सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त करुन त्यावर ग्रा.पं.मध्ये चर्चा करुन अन्यायकारक कलमावर आक्षेप नोंदविण्याची मागणी केली जात आहे.