शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:03 PM

ग्रामीण भागाचा सर्वांगिन विकासासाठी भाजप सरकार कठिब्ध आहे. गावकºयांचे सहकार्य मिळाल्यास या भागाच्या विकासाला गती देण्यास अधिक मदत होईल. असे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी येथे आयोजित सभेत केले.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : तालुक्यातील अनेक गावांत साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागाचा सर्वांगिन विकासासाठी भाजप सरकार कठिब्ध आहे. गावकºयांचे सहकार्य मिळाल्यास या भागाच्या विकासाला गती देण्यास अधिक मदत होईल. असे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी येथे आयोजित सभेत केले.तिरोडा तालुक्यातील वडेगाव, बोदा, भजेपार, गोंडमोहाडी, मुंडीकोटा, देवटोला आदी गावांमध्ये विकास कामासंदर्भात सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. रहांगडाले म्हणाले, राज्यात आपली सत्ता असल्याने ४४ वर्षांपासून रखडलेल्या आंबेनाला (निमगाव) जलाशयाच्या कामाला शासनाकडून मंजुरी मिळवून देण्यात यश आले आहे. शेतकºयांच्या हिताकरिता धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. खळबंदा जलाशयात पाणी सोडले जात असून शेतकºयांना सिंचनाची सोय झाली आहे. तिरोडा क्षेत्रातील अनेक गावांत अनेक विकासकामे करण्यात आले. ३५ किमी रस्त्याचे कामे आटोपले. लवकरच बोदलकसा व चोरखमारा जलाशयात धापेवाडा प्रकल्पाचे पाणी सोडण्याकरिता टप्पा-२ चे काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.गावात विविध योजना आणण्याकरिता व त्या योग्यरित्या राबविण्याकरिता गावांतील जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले.अविकसित गावांना प्रवाहात आणणारदोन वर्षांच्या कार्यकाळ शिल्लक आहे. या कालावधीत तिरोडा शहराला व तिरोडा-गोरेगाव क्षेत्रातील अविकसीत गावांना विकास कामे करुन विकासाच्या प्रवाहात आणण्यास प्राधान्य देणार आहोत. यासाठी प्रत्येक गावाच्या नागरिकांनी सहकार्य करावे व साथ द्यावे. जनतेच्या सहकार्याशिवाय विकास कामांना गती मिळणे शक्य नसल्याचे रहांगडाले यांनी सांगितले.पक्षभेद विसरूनकरणार कामेगावात कोणत्याही पक्षाचे लोक असोत, आपण त्याला महत्व देत नसून गावाचा विकास महत्वाचा आहे. आपण गावात विविध योजना आणून अधिकाधिक विकास करण्याच्या प्रयत्नात आहोत. यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज आहे. जनतेने पक्षाचा विचार न करता गावाचा विकास कसा करता येईल, याकडे लक्ष द्यावे, असेही आमदार विजय रहांगडाले यांनी सभेत संबोधित केले.