शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
3
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
4
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
5
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
6
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
7
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
8
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
9
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
10
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
11
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
12
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
13
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
14
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
15
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
16
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
17
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
18
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
19
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
20
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...

मृत घोषित केलेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 09:46 IST

मृत मुलाला जिवंत करण्याची हमी बालाघाट येथील डॉक्टरांच्या चमूने दिल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणारा मृतदेह स्मशानघाटावरून घरी आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घोटी येथे सोमवारी (दि.१५)उघडकीस आला.

ठळक मुद्देसर्पदंशाने मृत्यू घोषित अंत्यसंस्कारासाठी गेलेला मृतदेह परत आणला

- दिलीप चव्हाण 

गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथील आठ वर्षाच्या बालकाला १४ आॅक्टोबरला सकाळी ११.३० वाजता सर्पदंश झाला. त्या मुलाला उपचारासाठी गोंदियाच्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात आणले. परंतु गंगाबाईच्या बालरोग तज्ज्ञांनी त्याला मृत घोषित केले. परंतु त्या मृत मुलाला जिवंत करण्याची हमी बालाघाट येथील डॉक्टरांच्या चमूने दिल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणारा मृतदेह स्मशानघाटावरून घरी आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घोटी येथे सोमवारी (दि.१५)उघडकीस आला.आदित्य सुमेश गौतम (८) रा. घोटी असे मृत घोषित करण्यात आलेल्या बालकाचे नाव आहे. रविवारी सकाळी ११.३० वाजता त्याला सर्पदंश झाल्याने तासाभरानंतर त्याच्यावर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गोंदिया येथील बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. १४ आॅक्टोबरला दुपारी १.३० वाजता बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्पण चव्हाण यांनी त्याला मृत घोषित केले. आदित्य शिशू मंदिर येथील दुसऱ्या वर्गाचा विद्यार्थी होता. सर्पदंशाची घटना वाऱ्यासारखी तालुक्यात पसरताच म्हसगाव येथील एका इसमाने सर्पदंश झालेल्या इसमावर बालाघाट येथील डॉ. नवीन लिल्हारे (साईधाम) हे उपचार करतात अशी माहिती दिली. यावर गौतम कुटुंबीय व नातेवाईकांनी डॉ. लिल्हारे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून घडलेली घटना सांगितली. डॉ. नवीन लिल्हारे यांनी आदित्य गौतम यांच्या हाताची नस कापा असे सांगितले. हाताची नस कापली असता रक्त बाहेर आले हे सांगताच डॉ. नवीन लिल्हारे यांनी आदित्य जिवंत असल्याचे सांगत २४ तासात जिवंत करण्याचा दावा केला. त्यामुळे आदित्यला स्मशानभूमीतून घरी परत आणण्यात आले. आदित्यचे वडील सहा वर्षांपूर्वीच मृत्यू पावले आहे. आई शीला गौतम मजुरीचे काम करते. आदित्यला पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होत आहे.

उपचार करणाऱ्या चमूत पंधरा डॉक्टरसर्पदशांमुळे आदित्यचा मृत्यू झाल्याच्या घटनेला आता ३५ तासांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र यानंतरही तो जिवंत असल्याचे समजून त्याचा मृतदेह उपचारासाठी घरीच ठेवण्यात आला. मध्य प्रदेशातील १२ डॉक्टरांची चमू त्याच्यावर उपचार करणार असल्याचे सांगितले जाते. सध्या या चमूतील दोघेजण गोरेगाव येथे येऊन परत गेले असून सोमवारी रात्री उशिरा ते गोरेगाव घोटी येथे येणार असल्याची माहिती आहे.

मृत घोषित करताना चार डॉक्टरांची उपस्थितीबाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या बालरोग अतिदक्षता कक्षात सर्पदंश झालेल्या आदित्यवर उपचार करीत असताना तेथे डॉ. अर्पण चव्हाण, डॉ. माळी, डॉ.सागर सोनवाने व स्वत: बालरोग तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ.मनिंदरसिंग जुनेजा उपस्थित होते. त्यांच्यासमोरच आदित्यला मृत घोषित करण्यात आले.

आदित्यवर उपचार झाल्यानंतर तो जिवंत नसल्याचे लक्षात आल्यानंतरही एक तास डॉक्टरांनी वाट पाहिली. त्यानंतरच मृत घोषित करण्यात आले. ज्यांनी मृत घोषित केले ते एमडी डॉक्टर आहेत.- डॉ.मनिंदरसिंग जुनेजाबालरोग तज्ज्ञ विभाग प्रमुख बीजीडब्ल्यू गोंदिया.आदित्यला बीजीडब्ल्यू येथील डॉक्टरांनी रविवारी मृत घोषित केले. एकदा मृत झालेली व्यक्ती जिवंत होऊ शकत नाही. हा प्रकार अंधश्रद्धा वाढविणारा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार जिवंत व्यक्तीवर उपचार करताना कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र मृत व्यक्तीवर उपचार करणा-यावर कारवाई करण्याची तरतूद नाही. त्यामुळे सदर दावा आणि उपचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे याचा शोध घेतला जात आहे. सदर व्यक्तींवर निश्चित कारवाई केली जाईल.- जितेंद्र बोरकर, ठाणेदार गोरेगाव पोलीस स्टेशनमृत घोषित केलेला मुलगा जिवंत असून त्याच्या नाकातून रक्तस्राव सुरू आहे. या मुलावर उपचार करून त्याला उद्या (दि.१६) पर्यंत जिवंत करणार.- डॉ.नवीन लिल्हारे

टॅग्स :Healthआरोग्यCrime Newsगुन्हेगारी