शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मृत घोषित केलेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 09:46 IST

मृत मुलाला जिवंत करण्याची हमी बालाघाट येथील डॉक्टरांच्या चमूने दिल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणारा मृतदेह स्मशानघाटावरून घरी आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घोटी येथे सोमवारी (दि.१५)उघडकीस आला.

ठळक मुद्देसर्पदंशाने मृत्यू घोषित अंत्यसंस्कारासाठी गेलेला मृतदेह परत आणला

- दिलीप चव्हाण 

गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथील आठ वर्षाच्या बालकाला १४ आॅक्टोबरला सकाळी ११.३० वाजता सर्पदंश झाला. त्या मुलाला उपचारासाठी गोंदियाच्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात आणले. परंतु गंगाबाईच्या बालरोग तज्ज्ञांनी त्याला मृत घोषित केले. परंतु त्या मृत मुलाला जिवंत करण्याची हमी बालाघाट येथील डॉक्टरांच्या चमूने दिल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणारा मृतदेह स्मशानघाटावरून घरी आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घोटी येथे सोमवारी (दि.१५)उघडकीस आला.आदित्य सुमेश गौतम (८) रा. घोटी असे मृत घोषित करण्यात आलेल्या बालकाचे नाव आहे. रविवारी सकाळी ११.३० वाजता त्याला सर्पदंश झाल्याने तासाभरानंतर त्याच्यावर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गोंदिया येथील बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. १४ आॅक्टोबरला दुपारी १.३० वाजता बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्पण चव्हाण यांनी त्याला मृत घोषित केले. आदित्य शिशू मंदिर येथील दुसऱ्या वर्गाचा विद्यार्थी होता. सर्पदंशाची घटना वाऱ्यासारखी तालुक्यात पसरताच म्हसगाव येथील एका इसमाने सर्पदंश झालेल्या इसमावर बालाघाट येथील डॉ. नवीन लिल्हारे (साईधाम) हे उपचार करतात अशी माहिती दिली. यावर गौतम कुटुंबीय व नातेवाईकांनी डॉ. लिल्हारे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून घडलेली घटना सांगितली. डॉ. नवीन लिल्हारे यांनी आदित्य गौतम यांच्या हाताची नस कापा असे सांगितले. हाताची नस कापली असता रक्त बाहेर आले हे सांगताच डॉ. नवीन लिल्हारे यांनी आदित्य जिवंत असल्याचे सांगत २४ तासात जिवंत करण्याचा दावा केला. त्यामुळे आदित्यला स्मशानभूमीतून घरी परत आणण्यात आले. आदित्यचे वडील सहा वर्षांपूर्वीच मृत्यू पावले आहे. आई शीला गौतम मजुरीचे काम करते. आदित्यला पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होत आहे.

उपचार करणाऱ्या चमूत पंधरा डॉक्टरसर्पदशांमुळे आदित्यचा मृत्यू झाल्याच्या घटनेला आता ३५ तासांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र यानंतरही तो जिवंत असल्याचे समजून त्याचा मृतदेह उपचारासाठी घरीच ठेवण्यात आला. मध्य प्रदेशातील १२ डॉक्टरांची चमू त्याच्यावर उपचार करणार असल्याचे सांगितले जाते. सध्या या चमूतील दोघेजण गोरेगाव येथे येऊन परत गेले असून सोमवारी रात्री उशिरा ते गोरेगाव घोटी येथे येणार असल्याची माहिती आहे.

मृत घोषित करताना चार डॉक्टरांची उपस्थितीबाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या बालरोग अतिदक्षता कक्षात सर्पदंश झालेल्या आदित्यवर उपचार करीत असताना तेथे डॉ. अर्पण चव्हाण, डॉ. माळी, डॉ.सागर सोनवाने व स्वत: बालरोग तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ.मनिंदरसिंग जुनेजा उपस्थित होते. त्यांच्यासमोरच आदित्यला मृत घोषित करण्यात आले.

आदित्यवर उपचार झाल्यानंतर तो जिवंत नसल्याचे लक्षात आल्यानंतरही एक तास डॉक्टरांनी वाट पाहिली. त्यानंतरच मृत घोषित करण्यात आले. ज्यांनी मृत घोषित केले ते एमडी डॉक्टर आहेत.- डॉ.मनिंदरसिंग जुनेजाबालरोग तज्ज्ञ विभाग प्रमुख बीजीडब्ल्यू गोंदिया.आदित्यला बीजीडब्ल्यू येथील डॉक्टरांनी रविवारी मृत घोषित केले. एकदा मृत झालेली व्यक्ती जिवंत होऊ शकत नाही. हा प्रकार अंधश्रद्धा वाढविणारा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार जिवंत व्यक्तीवर उपचार करताना कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र मृत व्यक्तीवर उपचार करणा-यावर कारवाई करण्याची तरतूद नाही. त्यामुळे सदर दावा आणि उपचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे याचा शोध घेतला जात आहे. सदर व्यक्तींवर निश्चित कारवाई केली जाईल.- जितेंद्र बोरकर, ठाणेदार गोरेगाव पोलीस स्टेशनमृत घोषित केलेला मुलगा जिवंत असून त्याच्या नाकातून रक्तस्राव सुरू आहे. या मुलावर उपचार करून त्याला उद्या (दि.१६) पर्यंत जिवंत करणार.- डॉ.नवीन लिल्हारे

टॅग्स :Healthआरोग्यCrime Newsगुन्हेगारी