शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

७७ गावांची भूजल पातळी वाढल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:37 AM

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून अनियमित पाऊस पडत आहे. परिणामीे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यानंतरही कृषी विभागाने सन २०१६-१७ या कालावधीत ७७ गावे वॉटर न्यूट्रल व भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केला आहे. त्यामुळे यावर ...

ठळक मुद्देकृषी विभाग : संरक्षित सिंचन क्षेत्र वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून अनियमित पाऊस पडत आहे. परिणामीे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यानंतरही कृषी विभागाने सन २०१६-१७ या कालावधीत ७७ गावे वॉटर न्यूट्रल व भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केला आहे. त्यामुळे यावर प्रश्न निर्माण झाला आहे.दुष्काळी परिस्थितीवर कायम स्वरुपी मात व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात केली.या अभियानातंर्गत २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये जलयुक्त शिवारची विविध कामे करण्यात आली. यामुळे ही गावे वॉटर न्युट्रल झाली असून या गावांमधील भूजल पातळीत सुध्दा अर्धा ते एक मीटरने वाढ झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये ७७ गावे वॉटर न्युट्रल झाली आहेत. यात आमगाव तालुक्यातील ९ गावे, सडक-अर्जुनी १०, देवरी ११, सालेकसा ८, तिरोडा ९, गोरेगाव ११, गोंदिया १० व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी साठ्याची क्षमता २०५४२.०६ टीसीएम आहे. तर प्रत्यक्ष निर्माण झालेला पाणीसाठा २०६९६.८८ टीसीएम आहे. त्यामुळे १४ हजार ४६५ हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सन २०१६-१७ च्या प्रगती अहवालानुसार, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुधारित प्रस्तावित कामांची संख्या २७६३ होती. २७५९ कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. तर सर्व योजना मिळून २७५२ कामांच्या अंदाज पत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. २७४९ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. यात २६२३ कामे सुरू करून २६१९ कामे पूर्ण करण्यात आली. चार कामे प्रगतीपथावर आहे.

टॅग्स :Waterपाणी