शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

७७ गावांची भूजल पातळी वाढल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून अनियमित पाऊस पडत आहे. परिणामीे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यानंतरही कृषी विभागाने सन २०१६-१७ या कालावधीत ७७ गावे वॉटर न्यूट्रल व भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केला आहे. त्यामुळे यावर ...

ठळक मुद्देकृषी विभाग : संरक्षित सिंचन क्षेत्र वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून अनियमित पाऊस पडत आहे. परिणामीे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यानंतरही कृषी विभागाने सन २०१६-१७ या कालावधीत ७७ गावे वॉटर न्यूट्रल व भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केला आहे. त्यामुळे यावर प्रश्न निर्माण झाला आहे.दुष्काळी परिस्थितीवर कायम स्वरुपी मात व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात केली.या अभियानातंर्गत २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये जलयुक्त शिवारची विविध कामे करण्यात आली. यामुळे ही गावे वॉटर न्युट्रल झाली असून या गावांमधील भूजल पातळीत सुध्दा अर्धा ते एक मीटरने वाढ झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये ७७ गावे वॉटर न्युट्रल झाली आहेत. यात आमगाव तालुक्यातील ९ गावे, सडक-अर्जुनी १०, देवरी ११, सालेकसा ८, तिरोडा ९, गोरेगाव ११, गोंदिया १० व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी साठ्याची क्षमता २०५४२.०६ टीसीएम आहे. तर प्रत्यक्ष निर्माण झालेला पाणीसाठा २०६९६.८८ टीसीएम आहे. त्यामुळे १४ हजार ४६५ हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सन २०१६-१७ च्या प्रगती अहवालानुसार, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुधारित प्रस्तावित कामांची संख्या २७६३ होती. २७५९ कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. तर सर्व योजना मिळून २७५२ कामांच्या अंदाज पत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. २७४९ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. यात २६२३ कामे सुरू करून २६१९ कामे पूर्ण करण्यात आली. चार कामे प्रगतीपथावर आहे.

टॅग्स :Waterपाणी