शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

७७ गावांची भूजल पातळी वाढल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून अनियमित पाऊस पडत आहे. परिणामीे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यानंतरही कृषी विभागाने सन २०१६-१७ या कालावधीत ७७ गावे वॉटर न्यूट्रल व भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केला आहे. त्यामुळे यावर ...

ठळक मुद्देकृषी विभाग : संरक्षित सिंचन क्षेत्र वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून अनियमित पाऊस पडत आहे. परिणामीे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यानंतरही कृषी विभागाने सन २०१६-१७ या कालावधीत ७७ गावे वॉटर न्यूट्रल व भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केला आहे. त्यामुळे यावर प्रश्न निर्माण झाला आहे.दुष्काळी परिस्थितीवर कायम स्वरुपी मात व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात केली.या अभियानातंर्गत २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये जलयुक्त शिवारची विविध कामे करण्यात आली. यामुळे ही गावे वॉटर न्युट्रल झाली असून या गावांमधील भूजल पातळीत सुध्दा अर्धा ते एक मीटरने वाढ झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये ७७ गावे वॉटर न्युट्रल झाली आहेत. यात आमगाव तालुक्यातील ९ गावे, सडक-अर्जुनी १०, देवरी ११, सालेकसा ८, तिरोडा ९, गोरेगाव ११, गोंदिया १० व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी साठ्याची क्षमता २०५४२.०६ टीसीएम आहे. तर प्रत्यक्ष निर्माण झालेला पाणीसाठा २०६९६.८८ टीसीएम आहे. त्यामुळे १४ हजार ४६५ हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सन २०१६-१७ च्या प्रगती अहवालानुसार, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुधारित प्रस्तावित कामांची संख्या २७६३ होती. २७५९ कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. तर सर्व योजना मिळून २७५२ कामांच्या अंदाज पत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. २७४९ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. यात २६२३ कामे सुरू करून २६१९ कामे पूर्ण करण्यात आली. चार कामे प्रगतीपथावर आहे.

टॅग्स :Waterपाणी