शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मिरची मसाल्यांना बसतोय भाववाढीचा तडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले, ...

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले, तर महिन्याचा खर्च करताना गृहीणींनासुद्धा चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच मिरची मसाल्यांचे भाव वाढल्याने भाववाढीचा तडका बसल्याचे चित्र आहे. मसाल्यांचे नाव घेताच चविष्ट व्यंजनाची आठवण येते. उन्हाळ्याची चाहूल लागताच मिरची-मसाल्याचे दर वाढले आहे. दरवर्षीच दरवाढ होते; मात्र कोरोना काळातही या पदार्थांमध्ये दरवाढ झाल्याचे दिसून येते. कुठलीही भाजी असो त्यात स्वादानुसार, मसाले घातले जातात. शाकाहार असो की अन्य श्रेणीतील व्यंजन एकही मसाल्याची वस्तू कमी पडली की भाजीची चव बिघडतेच. गोंदिया शहरातील बाजारपेठेत मसाल्यांची आवक चांगल्या प्रमाणात आहेत. मसाल्याचा दर किलोमागे ५० ते १७० रुपये पर्यंत दरवाढ झाल्याचे दिसून आले. कोरोना संकटकाळात बहुतांश आस्थापने बंद असल्याने मालाची आवक पाहिजे त्या प्रमाणात विक्री झाली नाही. उत्पादनही व पुरवठाही कमी प्रमाणात झाला. आता कालांतराने यात वाढ झाली असून, हंगामाच्या तोंडावर मिरची व मसाल्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. सर्वसामान्यांचे आर्थिक बजेटही बिघडले आहे.

..........

केशोरी आणि नागपूर येथून येते मिरची

गोंदिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. केशोरीची मिरची अख्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तरीही जिल्ह्याची आवश्यकता लक्षात घेता, लाल मिरची ही नागपुरातून निर्यात केली जाते. नागपूर बाजारातील कॉटन मार्केटसह अन्य ठिकाणांहूनही मिरची जिल्ह्यात आणली जाते. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातूनही मिरचीचा पुरवठा केला जातो. याला मोठा ग्राहकवर्गही आहे.

.......

किचनमधील महत्त्वाचे व दररोज उपयोगात येत असलेल्या मसाल्यांचे दरही भरपूर वाढले आहेत. लग्नसराई व उन्हाळ्याची चाहूल लागताच ही दरवाढ निश्चित असते; पण मागील वर्षी यंदाची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. यात उत्पादकांना कमी लाभ, तर व्यापाऱ्यांना अधिक लाभ मिळतो.

- वैशाली कोहपरे, गृहिणी

........

स्वयंपाक घरातील महत्वाचे घटक म्हणजे मिरची व मसाले. या साहित्यांचे दर वाढले तर त्याचा फटका बसणारच. अत्यावश्यक असलेले हे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध असतातच, पण त्यात ऐन लग्नसराईच्या हंगामात झालेली दरवाढ दिलासा देणारी नसतेच. आवश्यक बाब असल्याने किमान या साहित्यांच्या भाव आटोक्यात हवे.

- प्रिया हरडे, गृहिणी,

.....