शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

मिरची मसाल्यांना बसतोय भाववाढीचा तडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले, ...

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले, तर महिन्याचा खर्च करताना गृहीणींनासुद्धा चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच मिरची मसाल्यांचे भाव वाढल्याने भाववाढीचा तडका बसल्याचे चित्र आहे. मसाल्यांचे नाव घेताच चविष्ट व्यंजनाची आठवण येते. उन्हाळ्याची चाहूल लागताच मिरची-मसाल्याचे दर वाढले आहे. दरवर्षीच दरवाढ होते; मात्र कोरोना काळातही या पदार्थांमध्ये दरवाढ झाल्याचे दिसून येते. कुठलीही भाजी असो त्यात स्वादानुसार, मसाले घातले जातात. शाकाहार असो की अन्य श्रेणीतील व्यंजन एकही मसाल्याची वस्तू कमी पडली की भाजीची चव बिघडतेच. गोंदिया शहरातील बाजारपेठेत मसाल्यांची आवक चांगल्या प्रमाणात आहेत. मसाल्याचा दर किलोमागे ५० ते १७० रुपये पर्यंत दरवाढ झाल्याचे दिसून आले. कोरोना संकटकाळात बहुतांश आस्थापने बंद असल्याने मालाची आवक पाहिजे त्या प्रमाणात विक्री झाली नाही. उत्पादनही व पुरवठाही कमी प्रमाणात झाला. आता कालांतराने यात वाढ झाली असून, हंगामाच्या तोंडावर मिरची व मसाल्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. सर्वसामान्यांचे आर्थिक बजेटही बिघडले आहे.

..........

केशोरी आणि नागपूर येथून येते मिरची

गोंदिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. केशोरीची मिरची अख्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तरीही जिल्ह्याची आवश्यकता लक्षात घेता, लाल मिरची ही नागपुरातून निर्यात केली जाते. नागपूर बाजारातील कॉटन मार्केटसह अन्य ठिकाणांहूनही मिरची जिल्ह्यात आणली जाते. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातूनही मिरचीचा पुरवठा केला जातो. याला मोठा ग्राहकवर्गही आहे.

.......

किचनमधील महत्त्वाचे व दररोज उपयोगात येत असलेल्या मसाल्यांचे दरही भरपूर वाढले आहेत. लग्नसराई व उन्हाळ्याची चाहूल लागताच ही दरवाढ निश्चित असते; पण मागील वर्षी यंदाची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. यात उत्पादकांना कमी लाभ, तर व्यापाऱ्यांना अधिक लाभ मिळतो.

- वैशाली कोहपरे, गृहिणी

........

स्वयंपाक घरातील महत्वाचे घटक म्हणजे मिरची व मसाले. या साहित्यांचे दर वाढले तर त्याचा फटका बसणारच. अत्यावश्यक असलेले हे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध असतातच, पण त्यात ऐन लग्नसराईच्या हंगामात झालेली दरवाढ दिलासा देणारी नसतेच. आवश्यक बाब असल्याने किमान या साहित्यांच्या भाव आटोक्यात हवे.

- प्रिया हरडे, गृहिणी,

.....