शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

मिरची मसाल्यांना बसतोय भाववाढीचा तडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले, ...

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले, तर महिन्याचा खर्च करताना गृहीणींनासुद्धा चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच मिरची मसाल्यांचे भाव वाढल्याने भाववाढीचा तडका बसल्याचे चित्र आहे. मसाल्यांचे नाव घेताच चविष्ट व्यंजनाची आठवण येते. उन्हाळ्याची चाहूल लागताच मिरची-मसाल्याचे दर वाढले आहे. दरवर्षीच दरवाढ होते; मात्र कोरोना काळातही या पदार्थांमध्ये दरवाढ झाल्याचे दिसून येते. कुठलीही भाजी असो त्यात स्वादानुसार, मसाले घातले जातात. शाकाहार असो की अन्य श्रेणीतील व्यंजन एकही मसाल्याची वस्तू कमी पडली की भाजीची चव बिघडतेच. गोंदिया शहरातील बाजारपेठेत मसाल्यांची आवक चांगल्या प्रमाणात आहेत. मसाल्याचा दर किलोमागे ५० ते १७० रुपये पर्यंत दरवाढ झाल्याचे दिसून आले. कोरोना संकटकाळात बहुतांश आस्थापने बंद असल्याने मालाची आवक पाहिजे त्या प्रमाणात विक्री झाली नाही. उत्पादनही व पुरवठाही कमी प्रमाणात झाला. आता कालांतराने यात वाढ झाली असून, हंगामाच्या तोंडावर मिरची व मसाल्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. सर्वसामान्यांचे आर्थिक बजेटही बिघडले आहे.

..........

केशोरी आणि नागपूर येथून येते मिरची

गोंदिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. केशोरीची मिरची अख्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तरीही जिल्ह्याची आवश्यकता लक्षात घेता, लाल मिरची ही नागपुरातून निर्यात केली जाते. नागपूर बाजारातील कॉटन मार्केटसह अन्य ठिकाणांहूनही मिरची जिल्ह्यात आणली जाते. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातूनही मिरचीचा पुरवठा केला जातो. याला मोठा ग्राहकवर्गही आहे.

.......

किचनमधील महत्त्वाचे व दररोज उपयोगात येत असलेल्या मसाल्यांचे दरही भरपूर वाढले आहेत. लग्नसराई व उन्हाळ्याची चाहूल लागताच ही दरवाढ निश्चित असते; पण मागील वर्षी यंदाची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. यात उत्पादकांना कमी लाभ, तर व्यापाऱ्यांना अधिक लाभ मिळतो.

- वैशाली कोहपरे, गृहिणी

........

स्वयंपाक घरातील महत्वाचे घटक म्हणजे मिरची व मसाले. या साहित्यांचे दर वाढले तर त्याचा फटका बसणारच. अत्यावश्यक असलेले हे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध असतातच, पण त्यात ऐन लग्नसराईच्या हंगामात झालेली दरवाढ दिलासा देणारी नसतेच. आवश्यक बाब असल्याने किमान या साहित्यांच्या भाव आटोक्यात हवे.

- प्रिया हरडे, गृहिणी,

.....