शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

ज्येष्ठांच्या देखभालीकडे होतेय मुलांचे दुर्लक्ष, तक्रारीत झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:40 IST

ज्येष्ठांची हेळसांड : म्हातारपणात होतोय त्रास

नरेश रहिले लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : माणूस आयुष्यभर धनसंचयाच्या मागे धावत असल्याने याच्या नादात लेकरांवर संस्कार करण्यात कमी पडतात. यामुळे कमावलेले धनही त्यांना उतार वयात उपभोगता येत नाही. त्यासाठी दोन पैसे कमी कमवा, परंतु मुलांना संस्कारक्षम बनवा, असे अनेक वृध्दांना आता वाटत आहे. आयुष्याच्या सायंकाळी ज्येष्ठांना आधाराची गरज असताना घरातीलच लोकांकडून त्यांची उपेक्षा होत असल्याने आता काय करू साहेब, असा सवाल वृध्द मंडळी करीत आहेत.

जसजसे वय वाढत जाते, तसतसे विविध आजार जडतात. वृद्धापकाळात मुलगा, सुनेचा आधारच हवा असतो. मात्र, बऱ्याच वेळा ज्येष्ठांना समजून घेतले जात नाही. त्यामुळे रक्ताची नाती त्यांच्यापासून दुरावतात. मुलगा, सूनही लक्ष देत नाहीत. अशावेळी ज्येष्ठांना पोलिस ठाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यानंतर घरच्यांच्या विरोधात तक्रार केली जाते. काही वृध्द अन्याय मुकाट्याने सहन करून आत्महत्येचाही मार्ग पत्करतात. आयुष्यात धन कमावण्याकडे लक्ष देऊन मुलांना संस्कार देण्याची वेळ गमावल्याने म्हातारपणात आपल्याच घरात त्यांना अपमान सहन करावा लागतो. 

३२० तक्रारी गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांची परिस्थिती पाहता ३२० तक्रारी वृध्दांनी डायल ११२ वर केल्या आहेत. या तक्रारीचे निवारण केले जात आहे.

ज्येष्ठांच्या तक्रारी काय?उतारवय आले की, त्या व्यक्तीचे कुणीच ऐकायला तयार नाही. आपल्या हातात पैसा असला तर मुलगा आणि सून काही प्रमाणात त्यांचे करते. पेन्शन नसलेल्या व्यक्तींची उपेक्षा मोठ्या प्रमाणात होते. सून सासू - सासऱ्यांना हिन वागणूक देते. त्या वागणुकीतून वृध्दांच्या डोळ्यात अश्रू येतात. काही सुना आपल्या सासू -सासऱ्यांना धक्काबुक्की देतात. हाताचा ठोसा मारतात. जेवण देत नाही, असा अनेक प्रकारचा छळ करतात, अशा तक्रारी आहेत.

समुपदेशनातून केली जातेय अनेक प्रकरणात तडजोडज्येष्ठांच्या तक्रारी पोलिस ठाण्यापर्यंत आल्या तरी त्या सहजतेने मिटतात. आपणच जन्माला घातलेली मुले आपल्यासोबत गैरव्यवहार करतात, त्यात आपणच त्यांना संस्कार देण्यात कुठे तरी कमी पडलो. त्यांनी आपल्याला नाकारले तर या वयात आपल्याला मदत कोण करणार, अंगात ताकद नाही, मग जीवन कसे जगाणार, यामुळे ते तडजोड करतात. 

वृध्दांना मुलांकडून देखरेखीची अपेक्षा, पण होतेय निराशाआयुष्यभर मर-मर करून कमावलेले धन हे माझ्या मुला-बाळांना व्हावे, यासाठी झटणारे आई - वडील उतारवयात घरातच परके होऊन जातात. ज्यांनी आपल्या हातावर कमावलेले धन मुलांना होईलच, परंतु आपल्याही कामात येईल, मी कमावले माझे धन अखेरपर्यंत माझ्याही कामात यावे, मुला-बाळांनी माझी देखरेख करावी, अशी अपेक्षा वृध्दांना असते. पण त्यांची ही अपेक्षा फोल ठरत असल्याचे वृध्दांच्या वाढत्या तक्रारींवरुन दिसून येत आहे. त्यामुळे मुलांनी आपल्या आई-वडीलांची त्यांच्या उतारवयात काळजी घेण्याची गरज आहे.

"माणसाची खरी संपत्ती हे त्याचे पूत्रधन आहे. परंतु, मुलांना योग्यवेळी योग्य संस्कार न दिल्यास उतारवयात त्या मुलांकडून पालकांना अपमानित केले जाते. यासाठी धन संचयापेक्षा मुलांमध्ये संस्कार रूजवा, तर उतारवयात त्रास होणार नाही."- ह.भ.प. मुक्ता हत्तीमारे, खोबा-कोकणा 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया