शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

छत्रपती शिवाजी राजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं (शिवाजी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : जगात त्याच व्यक्ती महापुरुष ठरतात ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जनतेच्या मनावर उमटवला. छत्रपती शिवाजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अर्जुनी-मोरगाव : जगात त्याच व्यक्ती महापुरुष ठरतात ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जनतेच्या मनावर उमटवला. छत्रपती शिवाजी महाराजांना जीवाला जीव देणाऱ्या माणसांची साथ होती. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे स्मरण करून प्रथम आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले पाहिजे. नाते जपा, जीवाला जीव द्या, ही शिकवण आपणाला महाराजांकडून मिळते. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, असे प्रतिपादन प्राचार्य वीना नानोटी यांनी केले.

सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा, सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट, जीएमबी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी पाहुणे म्हणून पर्यवेक्षिका छाया घाटे, मुख्याध्यापक हरिदास गहाणे, प्रा. यादव बुरडे, प्रा. टी. एस. बीसेन, जुगलकिशोर राठी, संजय बंगळे उपस्थित होते. कार्यक्रमात प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते देवी सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी घाटे, राठी, विष्णू चाचेरे, प्रा. जे. डी. पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगांना उजाळा दिला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत महाराजांच्या जीवनातील ‘गड आला पण सिंह गेला’, ‘धन्य धन्य शिवाजी शूर (पोवाडा)’, ‘अफजल खानाचा वध’, ‘शाहिस्तेखानाची फजिती’ आदी प्रसंगाचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

सूत्रसंचालन ज्ञानेश्वर रोकडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. इंद्रनील काशिवार, सांस्कृतिक प्रमुख कुंडलिक लोथे, सुजित जक्कुलवार, नंदा लाडसे, लोपामुद्रा क्षीरसागर, विष्णू चाचेरे, धनश्री चाचेरे, ज्योती झलके, विनाश मेश्राम, होमराज गजबे, भाग्यश्री सिडाम, महेश पालीवाल यांनी सहकार्य केले.