शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

आयसीआयसीआय विमा कंपनीला ग्राहक मंचची चपराक

By admin | Updated: September 18, 2014 23:36 IST

शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याच्या एका प्रकरणातील विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीला ग्राहक मंचाने चांगलीच चपराक दिली.

गोंदिया : शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याच्या एका प्रकरणातील विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीला ग्राहक मंचाने चांगलीच चपराक दिली. सदर कंपनीला आता एक लाख रूपयांसह तक्रारींचा व इतर खर्चही द्यावा लागणार आहे. गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील रहिवासी आळकन पटले यांचे पती दुलीचंद लोंढू पटले हे शेतातील विहिरीतून पाणी काढत असताना तोल जावून पडले. त्यात त्यांचा ५ आॅक्टोबर २००५ त्यांचा मृत्यू झाला. पटले यांनी तहसीलदारांमार्फत शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा प्रस्ताव आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीकडे सादर केला. कंपनीने प्रस्ताव मंजूर-नामंजूर काहीही न कळविल्याने वकिलामार्फत नोटीस पाठविण्यात आली. मात्र विमा दावा निकाली न लागल्याने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात प्रकरण २० जून २०१२ रोजी दाखल करण्यात आले. मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर सदर कंपनीच्या व्यवस्थापक व शाखा व्यवस्थापकांचे लेखी जबाब दाखल करण्यात आले. तत्कालीन तहसीलदार हजर झाले नसल्याने प्रकरण एकतर्फीच चालविण्यात आले. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने आपल्या जबाबात सदर तक्रार मुदतीत दाखल न केल्यामुळे व संपूर्ण कागदपत्रे न दिल्यामुळे ती खारीज करण्याची विनंती केली. मात्र अळकनबाई यांनी ५ एप्रिल २००६ रोजीच विमा दावा मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबतचे गोरेगाव पोलीस ठाण्याची मर्ग सूचना, उत्तरीय तपासणी अहवाल, मृत्यूचा दाखला, सात-बाराचा उतारा, वारसान प्रमाणपत्र, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस व पोस्टाची पावती आदी कागदपत्रे तक्रारीसह दाखल केली होते. आळकनबाईचे वकील अ‍ॅड.उदय क्षीरसागर यांनी सर्व पुरावे सादर केले. विमा कंपनीचे वकील सचिन जायस्वाल यांनी लेखी जबाब हाच लेखी युक्तीवाद समजावा, अशी लेखी सूचना २५ फेब्रुवारी २०१३ रोजी दाखल केली. तसेच तोंडी युक्तीवादासाठी वारंवार संधी देवूनही विरूद्ध पक्षाचे वकील गैरहजर राहीले. त्यामुळे न्यायमंचाने कारणमिमांसा करून तोल जावून विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सिद्ध होते, असे सांगितले व आळकनबाईची तक्रार मान्य केली. त्यानुसार सदर विमा कंपनीने शेतकरी अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये, मृत्यू झाल्याच्या दिनांकापासून ९ टक्के दराने व्याज, शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून १० हजार रूपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने दिला. (प्रतिनिधी)