शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

आयसीआयसीआय विमा कंपनीला ग्राहक मंचची चपराक

By admin | Updated: September 18, 2014 23:36 IST

शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याच्या एका प्रकरणातील विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीला ग्राहक मंचाने चांगलीच चपराक दिली.

गोंदिया : शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याच्या एका प्रकरणातील विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीला ग्राहक मंचाने चांगलीच चपराक दिली. सदर कंपनीला आता एक लाख रूपयांसह तक्रारींचा व इतर खर्चही द्यावा लागणार आहे. गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील रहिवासी आळकन पटले यांचे पती दुलीचंद लोंढू पटले हे शेतातील विहिरीतून पाणी काढत असताना तोल जावून पडले. त्यात त्यांचा ५ आॅक्टोबर २००५ त्यांचा मृत्यू झाला. पटले यांनी तहसीलदारांमार्फत शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा प्रस्ताव आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीकडे सादर केला. कंपनीने प्रस्ताव मंजूर-नामंजूर काहीही न कळविल्याने वकिलामार्फत नोटीस पाठविण्यात आली. मात्र विमा दावा निकाली न लागल्याने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात प्रकरण २० जून २०१२ रोजी दाखल करण्यात आले. मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर सदर कंपनीच्या व्यवस्थापक व शाखा व्यवस्थापकांचे लेखी जबाब दाखल करण्यात आले. तत्कालीन तहसीलदार हजर झाले नसल्याने प्रकरण एकतर्फीच चालविण्यात आले. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने आपल्या जबाबात सदर तक्रार मुदतीत दाखल न केल्यामुळे व संपूर्ण कागदपत्रे न दिल्यामुळे ती खारीज करण्याची विनंती केली. मात्र अळकनबाई यांनी ५ एप्रिल २००६ रोजीच विमा दावा मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबतचे गोरेगाव पोलीस ठाण्याची मर्ग सूचना, उत्तरीय तपासणी अहवाल, मृत्यूचा दाखला, सात-बाराचा उतारा, वारसान प्रमाणपत्र, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस व पोस्टाची पावती आदी कागदपत्रे तक्रारीसह दाखल केली होते. आळकनबाईचे वकील अ‍ॅड.उदय क्षीरसागर यांनी सर्व पुरावे सादर केले. विमा कंपनीचे वकील सचिन जायस्वाल यांनी लेखी जबाब हाच लेखी युक्तीवाद समजावा, अशी लेखी सूचना २५ फेब्रुवारी २०१३ रोजी दाखल केली. तसेच तोंडी युक्तीवादासाठी वारंवार संधी देवूनही विरूद्ध पक्षाचे वकील गैरहजर राहीले. त्यामुळे न्यायमंचाने कारणमिमांसा करून तोल जावून विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सिद्ध होते, असे सांगितले व आळकनबाईची तक्रार मान्य केली. त्यानुसार सदर विमा कंपनीने शेतकरी अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये, मृत्यू झाल्याच्या दिनांकापासून ९ टक्के दराने व्याज, शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून १० हजार रूपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने दिला. (प्रतिनिधी)