शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

सावधान... कोरोनाचा आकडा दररोज फुगतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून मागील तीन दिवसापासून दररोज पाचशेच्या वर रुग्णांची नोंद होत आहे. कोरोना ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून मागील तीन दिवसापासून दररोज पाचशेच्या वर रुग्णांची नोंद होत आहे. कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने फुगत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा थोडेही दुर्लक्ष कोरोनाच्या विस्फाेटास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शुक्रवारी (दि.९) जिल्ह्यात चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर ६६३ नवीन रुग्णांची भर पडली. उपचार घेत असलेल्या २७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या चार रुग्णांमध्ये दोन गोंदिया तालुक्यातील, १ गोरेगाव आणि सालेकसा तालुक्यातील १ रुग्णांचा समावेश असून हे सर्व रुग्ण ५२ ते ६५ वर्षे वयोगटातील आहे. यासर्व रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होता. जिल्ह्यात बाधित आणि मृतांची संख्या दररोज वाढत असल्याने जिल्हावासीयांच्या काळजीत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच दक्ष होत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ११३७१२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ९७५५८ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत १००४६४ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ९१५११ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९४५९ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १५७८४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ३४३४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १६५२ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रलबिंत आहे. २५३१ रुग्ण गृहविलगीकरणात असून उर्वरित रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत.

..................

९ दिवसात ३३९९ रुग्ण आणि १७ बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात १ ते ९ एप्रिल या कालावधीत ३३९९ कोरोना बाधितांची नोंद झाली असून १७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ९ दिवसांच्या कालावधीत तब्बल साडेतीन हजार रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करुन गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याची गरज आहे.

..................

कोरोना रुग्ण बरे हाेण्याचा दर ८५.७९ टक्के

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख दररोज उंचावत आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाची सुध्दा चिंता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुध्दा स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा कोरोना विस्फोटास तेच कारणीभूत ठरु शकतात. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८५.७९ टक्के आहे.

..............