शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाजार समितीत धानाची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 21:52 IST

कमी पाऊस व होत्या त्या धानावर कीड रोगांचा हल्ला यामुळे यंदा जिल्ह्यात धानाच्या उत्पादनात घट झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात धान उत्पादनात घट : धानाला भाव नसल्याचाही परिणाम

कपिल केकत।आॅनलाईन लोकमतगोंदिया : कमी पाऊस व होत्या त्या धानावर कीड रोगांचा हल्ला यामुळे यंदा जिल्ह्यात धानाच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक घटली असून बाजार समिती ओस पडली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा स्थिती अधीकच गंभीर असल्याचे दिसून येत आहे.धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे जिल्ह्याची ही ओळख आता हिरावत चालली आहे. यंदा पाऊस कमी पडल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात रोवणी झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील धानाचे उत्पादन घटणार हे कळून चुकले होते. मात्र लागलेल्या धानपिकावर कीड रोगांनी हल्ला चढवून उभ्या धानाची नासाडी केली. यामुळे अपेक्षीत उत्पन्नापेक्षाही कितीतरी पटीने धानाचे उत्पादन यंदा घटले.याचेच परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीत जाणवत आहे. यंदा बाजार समितीने आॅक्टोबर महिन्यापासून धान खरेदी सुरू केली. तेव्हापासूनच बाजार समितीत धानाची आवक घटल्याचे चित्र खुद्द बाजार समिती प्रशासनाला जाणवत आहे. मागील वर्षी याच दिवसांत जेथे बाजार समिती धानाने भरभरून होती. तेथेच आज बाजार समितीत शुकशुकाट जाणवत आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५० टक्के पेक्षाही कमी धान बाजार समितीत विक्रीला आल्याचे दिसून येत आहे.उत्पादनात घट असल्यास त्या वस्तूची मागणी वाढते असा नियम आहे. येथे मात्र धानाचे उत्पादन घटले असतानाही धानाचे भाव वाढलेले नाहीत. शिवाय कर्जमाफीचा गवगवा होत असतानाच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. यामुळे ही संपुर्ण स्थिती निर्माण झाल्याचेही बाजार समितीत बोलले जात आहे. विशेष म्हणजे, धान विक्रीला न येणे हे चित्र फक्त बाजार समितीतच नसून आधारभूत धान खरेदी केंद्रांचीही हीच स्थिती असल्याची माहिती आहे. यामुळेच आजघडीला बाजार समितीत धानाची आवक घटली आहे.धान खरेदीत मोठी घसरणमागील वर्षी सन २०१६ मध्ये आॅक्टोबर महिन्यात बाजार समितीत २२ हजार क्विंटल यात ३१ हजार ५४८ पोती धानाची खरेदी करण्यात आली होती. तर नोव्हेंबर महिन्यात ५१ हजार २७१ क्विंटल यात ७३ हजार २४४ पोती धानाची खरेदी करण्यात आली होती. यंदा मात्र सन २०१७ मध्ये आॅक्टोबर महिन्यात ८ हजार ६४० क्विंटल यात १२ हजार ३४२ पोती धानाची खरेदी करण्यात आली आहे. तर नोव्हेंबर महिन्यात ३५ हजार ५५८ क्विंटल यात ५० हजार ७९७ पोती धान खरेदी करण्यात आली आहे. वरिल आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बाजार समितीच्या धान खरेदीत मोठी घसरण दिसून येत आहे.