शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

२८ जुलै चा शासन निर्णय रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST

कोविड-१९ या महामारीमुळे लॉकडाऊन काळात करवसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाने एकीकडे ऑनलाईन वेतनासाठी कर वसुलीची शर्त रद्द केली तर दुसरीकडे वेतनासाठीे ग्रामपंचायतच्या उत्पन्नाची अट लादली. २८ जुलैचा शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ५० टक्क्यांहूनही कमी ऑनलाईन वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे झाले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संप : संपामुळे ग्रामपंचायतची कामे पडली ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १०० टक्के ऑनलाईन वेतन मिळण्यासाठी अडथळा निर्माण करणारा तथा वसुलीची आणि उत्पन्नाची अट घालणारा २८ जुलै २०२० चा शासन निर्णय रद्द करणे या सह अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२८) संप पाळला.यामुळे ग्रामपंचायतींची कामे ठप्प पडली. दरम्यान, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व ग्राम विकास विभागाचे सचिव यांना निवेदन पाठविण्यात आले.कोविड-१९ या महामारीमुळे लॉकडाऊन काळात करवसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाने एकीकडे ऑनलाईन वेतनासाठी कर वसुलीची शर्त रद्द केली तर दुसरीकडे वेतनासाठीे ग्रामपंचायतच्या उत्पन्नाची अट लादली. २८ जुलैचा शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ५० टक्क्यांहूनही कमी ऑनलाईन वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे झाले आहे.या निर्णयाच्या दुष्परिणामामुळे ४ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. म्हणून कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतलेला २८ जुलैच्या सरकारी निर्णय रद्द करणे व पूर्ण ऑनलाईन वेतन मिळणे, १० ऑगस्टचे नवीन किमान वेतन लागू करून संपुर्ण वेतन शासनाने अदा करावे यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी (दि.२८) जिल्ह्यातील ९० टक्के कर्मचारी संपावर होते.दरम्यान, राज्य महासंघाचे संघटन सचिव मिलिंद गणविर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी व खंडविकास अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सुखदेव शहारे, विनोद शहारे, महेंद्र भोयर, दिप्ती राणे, सुनील लिल्हारे, जगदीश ठाकरे, देवेंद्र मेश्राम, मुकेश कापगते, यशवंत दमाहे, भाऊराव कटंगकार यांचा शमावेश होता. गोरेगांव तालुक्यात उत्तम डोंगरे बुधराम बोपचे व निलेश मस्के, सडक-अजुर्नी येथे चत्रुघन लांजेवार, विष्णू हत्तीमारे, मुकेश कापगते, खुशाल बनकर, अर्जुनी-मोरगाव येथे उपविभागीय अधिकारी व बिडीओ यांना ईश्वरदास भंडारी व खोजराम दरवडे यांच्या नेतृत्वात, आमगाव येथे किसन उके, नरेश कावळे व नितेश बावंनथडे, तिरोडा येथे रविंद्र किटे, आशिष उरकुडे, धनेश्वर जमईवार यांच्या नेतृत्वात एसडीओ व बिडीओ यांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत